AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS: राजसाहेब माझं काय चुकलं? पुण्यानंतर औरंगाबाद मनसेतही अस्वस्थता, कुणाची होतेय घुसमट?

पुण्यातील मनसेच्या फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील यांनी मनसेतील अस्वस्थता बोलून दाखवत राष्ट्रवादीचा मार्ग स्वीकारला आहे. आता औरंगाबादेतही मनसेतील सुहास दाशरथे अस्वस्थ आहेत.

MNS: राजसाहेब माझं काय चुकलं? पुण्यानंतर औरंगाबाद मनसेतही अस्वस्थता, कुणाची होतेय घुसमट?
| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 10:48 AM
Share

औरंगबाादः पुण्यातील फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी मनसेतून राष्ट्रवादीचा (NCP) मार्ग स्वीकारला. आता त्यापाठोपाठ औरंगाबादमध्येही मनसेतील अस्वस्थता उघड झाली आहे. औरंगाबादेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे (Suhas Dashrathe) यांनी ही अस्वस्थता टीव्ही 9 च्या प्रतिनिधींसमोर बोलून दाखवली. दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा औरंगाबाद दौरा होता. या दौऱ्यात राज ठाकरेंनी औरंगाबादमधील कार्यकारिणीत तडकाफडकी बदल केले. 14 डिेसेंबर रोजी झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष पदावरून सुहास दाशरथे (Suhas Dashrathe) यांची उचलबांगडी केली. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेतून मनसेत आलेल्या सुहास दाशरथेंबाबत अशी कारवाई केल्याने त्यांच्या मनातील अस्वस्थता उघड झाली आहे.

सुहास दाशरथे अस्वस्थ, काय म्हणाले?

जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केल्यानंतर सुहास दाशरथे चांगेलच अस्वस्थ आहेत. माझं काय चुकलं, असा सवाल त्यांनी राज ठाकरे यांना केलाय. ते म्हणाले, मला पदावरून बाजूला केलं आहे. महाराष्ट्र सैनिक म्हणूनच काम करेन. पण माझा एकच प्रश्न आहे. साहेब माझं काय चुकलं. मी काम करतोय, पक्ष संघटना बांधणीसाठी काम करतोय, कालच्या दौऱ्यातही स्वागतापासून नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी झटलो. पण माझं काय चुकलं हा खूप मोठा प्रश्न मनात आहे.  ज ठाकरेंनी जी जबाबदारी आज माझ्यावर सोपवली आहे. ती निष्ठेनं पार पाडायला मी तयार आहे. मी पुन्हा महाराष्ट्रसैनिक म्हणून काम करायला, झेंडे बांधायला, संतरंज्या टाकायला तयार आहे. फक्त हे का घडलं, याचं स्पष्टीकरण मला हवं आहे.”

मनसे सोडण्याच्या तयारीत तुम्ही आहात का, असा प्रश्न विचारल्यावर सुहास दाशरथे म्हणाले, ‘माझ्याकडे आज फक्त दोन गोष्टी आहेत. निष्ठा आणि स्वाभिमान. शिवसेनेत असतानाही मी त्याच निष्ठेनं आणि स्वाभिमानानं काम केलं, आजही त्याच गोष्टींच्या आधारे काम करतोय. यावर राजसाहेब जो निर्णय घेतील, त्यानुसारच मी काम करेन. ‘

मनसेच्या कार्यकारिणीत कोणते बदल?

अनेक महिन्यानंतर औरंगाबादेत आलेल्या राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकारीणीत मोठे बदल केले. यात सर्वात मोठा बदल म्हणजे जिल्हाध्यक्ष पदावरून सुहास दाशरथे यांची उचलबांगडी केली. राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यात शहराध्यक्ष सतनाम गुलाटी यांना राज्य उपाध्यक्ष करण्यात आले. हे पद पूर्वी सुमित खांबेकर यांच्याकडे होते. आता सुमित खांबेकर हे पूर्व, पश्चिम, मध्य मतदार संघासाठी तर गंगापूर, वैजापूर, पैठणसाठी दिलीप बनकर आणि फुलंब्री, सिल्लोड, कन्नड तालुक्यासाठी वैभव मिटकर हे जिल्हाप्रमुख असतील. महानगरपर्मुख म्हणून बिपीन नाईक, शहराध्यक्ष आशिष सुरडकर, गजन गौडा यांच्यावर जबाबदादरी देण्यात आली. मध्य मतदार संघासाठी अद्याप कुणाचीही नेमणूक लेलेी नाही.

इतर बातम्या-

धक्कादायकः दहा रुपयांसाठी कुणी जीव जाईपर्यंत मारतं का? काय घडलं औरंगाबादेत?

Aurangabad: शहरात 70 हजार नागरिकांनी चुकवला दुसरा डोस, 44% लोकांचेच लसीकरण पूर्ण! आजपासून 500 रु. दंड!

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.