AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादः जानेवारीत राष्ट्रीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन, ऑटोमोबाइल कंपन्यांच्या प्रतिनिधींना ऑरिक सिटीची सफर

शहरातील सुविधांबाबत माहिती देऊन गुंतवणुकीसाठी या कंपन्यांना आकर्षित करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. हार्ले डेव्हिडसन, रिलायन्स, टाटा, फिरोदिया, सुझुकी, टीव्हीएस, ह्युंदाई, यामाहा, होंडासारख्या कंपन्यांच्या संचालकांना या परिषदेसाठी आमंत्रित केले जाणार आहे.

औरंगाबादः जानेवारीत राष्ट्रीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन, ऑटोमोबाइल कंपन्यांच्या प्रतिनिधींना ऑरिक सिटीची सफर
औरंगाबादेतील ऑरिक सिटीची सफर ऑटोमोबाइल कंपन्यांच्या प्रतिनिधींना घडवणार
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 12:33 PM
Share

औरंगाबादः बड्या कंपन्यांनी उद्योगनगरी औरंगाबादमध्ये (Aurangabad Industry) गुंतवणूक करावी, या उद्देशाने नोव्हेंबर महिन्यात शहरात राष्ट्रीय गुंतवणूक परिषदेचे (National Investment Conference) आयोजन करण्यात आले आहे. येत्या 14,15,16 जानेवारीला ही परिषद आयोजित करण्यात आली असून या वेळी बड्या उद्योगांच्या प्रतिनिधींना ऑरिक सिटीची सफर घडवून शहरातील शिक्षण, वैद्यकीय सुविधा, दळणवळण आदी सुविधांचीही माहिती दिली जाणार आहे.

हार्ले डेव्हिडसन, रिलायन्स, टाटा, सुझुकी कंपन्यांचे प्रतिनिधी येणार

औरंगाबादेत होऊ घातलेल्या राष्ट्रीय परिषदेत हार्ले डेव्हिडसन, रिलायन्स, टाटा, फिरोदिया, सुझुकी यांच्यासारख्या ख्यातनाम बड्या कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी ऑरिक सिटीची सफर घडवली जाईल. येत्या 15 दिवसांत या परिषदेची अंतिम रूपरेषा तयार होईल. जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी शहराच्या दौऱ्यावर असताना उद्योग जगतातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याशी या परिषदेविषयी प्राथमिक चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ऑटोमोबाइल हबची ओळख सांगणार

औरंगाबाद शहराची ओळख जागतिक पातळीवर ऑटोमोबाइल हब अशी आहे. वाहनांचे कारखाने तसेच सुट्या भागांचे अनेक कारखाने औरंगाबादेत आहेत. सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या शेंद्रा, बिडकीन येथील डीएमआयसीत कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर बड्या ऑटोमोबाइल कंपन्यांच्या संचालकांना या परिषदेच्या निमित्ताने शहरात आमंत्रित करून त्यांना डीएमआयसीतील उद्योगांसाठी पूरक असलेल्या पायाभूत सुविधा व शहरातील शैक्षणिक, वैद्यकीय सेवांसह इतर सुविधांबाबत माहिती देऊन गुंतवणुकीसाठी या कंपन्यांना आकर्षित करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. हार्ले डेव्हिडसन, रिलायन्स, टाटा, फिरोदिया, सुझुकी, टीव्हीएस, ह्युंदाई, यामाहा, होंडासारख्या कंपन्यांच्या संचालकांना या परिषदेसाठी आमंत्रित केले जाणार आहे.

पर्यटनस्थळांचेही प्रमोशन होणार

जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसास्थळांचे या संचालकांसमोर प्रमोशन केले जाईल. ड्रायपोर्ट, निर्यातीसाठीच्या सुविधा, होऊ घातलेल्या रस्ते, रेल्वे आणि विमानतळावरील सुविधांची माहितीही दिली जाईल. ऑरिक सिटीची सफर घडवून या ठिकाणच्या सुविधांची, विविध योजनांची माहितीही देण्यात येईल. इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरसाठीही उद्योजकांकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. अत्याधुनिक उपचार सुविधा असलेल्या औरंगाबादची मेडिकल टुरिझम डेस्टिनेशन म्हणूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आहे. मुंबई-पुण्याप्रमाणे दर्जेदार मात्र किमी किमतीत उपचार येथे मिळत असल्याने परदेशातूनही अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. अवयवदान मोहिमेतही शहराचे नाव अग्रेसर आहे. हे मुद्देही गुंतवणूकदारांना पटवून सांगितले जातील.

इतर बातम्या-

जन्मजात दोष असलेल्या बालकांवरील शस्त्रक्रियांना कवच मिळण्याचे प्रयत्न, बाल शल्यचिकित्सा परिषदेत विचार

VIDEO: शाहरुख खानने भाजपात प्रवेश केला तर कोकेन नाही, पिठी साखर सापडली म्हणून सांगतील; भुजबळांची जोरदार टोलेबाजी

Follow Us
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.