AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज माझा भरून आला आहे ऊर, कारण पाठीशी उभं आहे वाळूज पंढरपूर, रामदास आठवलेंनी जिंकलं औरंगाबादकरांचं मन

राज्यातील मॉल आणि सुपरमार्केटमध्ये वाइन विक्रीच्या धोरणावर बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री स्वतः दारू घेत नाहीत मग जनतेला का दारू पाजताहेत? असा सवाल रामदास आठवले यांनी वाळूज येथील कार्यक्रमात केला.

आज माझा भरून आला आहे ऊर, कारण पाठीशी उभं आहे वाळूज पंढरपूर, रामदास आठवलेंनी जिंकलं औरंगाबादकरांचं मन
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 22, 2022 | 9:43 AM
Share

औरंगाबादः केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी औरंगाबादमधील वाळूज परिसरात (Waluj MIDC Aurangabad) एका कार्यक्रमात त्यांच्या खुमासदार शैलीत कविता (Ramdas Athavale poem) सादर करून वाळूजकरांची मनं जिंकली. वाळूजमधील बजाजनगर येथील आम्रपाली बुद्धविहारात सोमवारी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. आठवले हे दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सोमवारच्या कार्यक्रमात त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर त्यांच्या शैलीत भाष्य केले. राज्यातील मॉल आणि सुपरमार्केटमध्ये वाइन विक्रीच्या धोरणावर बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री स्वतः दारू घेत नाहीत मग जनतेला का दारू पाजताहेत? या वेळी व्यासपीठावर बाबूराम कदम पप्पू कागदे, मिलिंद शेळके, संजय ठोकळ, प्रवीण नितनवरे, शरद कीर्तिकर, अनिल चोरडिया, संतोष लाठे आदींची उपस्थिती होती.

….वाळूजकर खळखळून हसले

मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी वाळूजकरांवर कविता सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. ती कविता पुढीलप्रमाणे-

आज माझा भरून आला आहे ऊर कारण माझ्या पाठीशी उभं आहे वाळूज-पंढरपूर मी तर आहे भीमाच्या तालमीत तयार झालेला शूर म्हणून मी बदलून टाकणार आहे वाळूज-पंढरपूरचा नूर तुम्ही सर्वांनी लावलात माझ्या खांद्याला खांदा म्हणून मी करून टाकला आहे बऱ्याच लोकांचा वांदा…

प्रकाश आंबेडकरांवर निशाणा

वाळूज येथील कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधला. ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी आता ऐक्य आम्हाला मान्य नाही, ही भूमिका सोडली पाहिजे. ऐक्याचा विषय मी मांडलेला आहे. पण प्रकाश आंबेडकर हे भेटण्यासाठी वेळ देतील असं वाटत नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय ऐक्य शक्य नाही.

शिवसेना-भाजप भांडण मिटले पाहिजे- आठवले

दरम्यान, ठाकरे सरकारवर टीका करताना रामदास आठवले म्हणाले, सरकार मॅनेजमेंट करण्यापेक्षा एकमेकांना मॅनेज करण्यात व्यस्त आहे. सरकारकडून विकास कामांचा योग्य आढावा घेतला जात नाही. सरकार पाडण्यासाठी संजय राऊत यांच्यावरील आरोप निरर्थक आहेत. तसेच शिवसेना आणि भाजपचे भांडण मिटले पाहिजे, असं आम्हाला वाटतं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत पुढाकार घ्यावा, संजय राऊत यांना समज द्यावी, शिवसेना भाजप एकत्र आले पाहिजे. दोन्ही काँग्रेससोबत राहिल्यास शिवसेनेचे नुकसान होईल. तसेच जुन्या फॉर्म्युल्यावर एकमत झाल्यास भाजपसुद्धा तयार होईल, अशी शक्यता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. औरंगाबाद येथील सुभेदारी विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं.

इतर बातम्या-

Travel Special: दक्षिण भारतातील निसर्गाचे सौंदर्य बघायचे आहे? मग ‘या’ 5 ठिकाणांना नक्की भेट द्या!

दोघे भाऊ बहिणीच्या घरी भांड-भांड-भांडले, वादात मध्यस्थी करणाऱ्या भावोजींची हत्या

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या