AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज माझा भरून आला आहे ऊर, कारण पाठीशी उभं आहे वाळूज पंढरपूर, रामदास आठवलेंनी जिंकलं औरंगाबादकरांचं मन

राज्यातील मॉल आणि सुपरमार्केटमध्ये वाइन विक्रीच्या धोरणावर बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री स्वतः दारू घेत नाहीत मग जनतेला का दारू पाजताहेत? असा सवाल रामदास आठवले यांनी वाळूज येथील कार्यक्रमात केला.

आज माझा भरून आला आहे ऊर, कारण पाठीशी उभं आहे वाळूज पंढरपूर, रामदास आठवलेंनी जिंकलं औरंगाबादकरांचं मन
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 22, 2022 | 9:43 AM
Share

औरंगाबादः केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी औरंगाबादमधील वाळूज परिसरात (Waluj MIDC Aurangabad) एका कार्यक्रमात त्यांच्या खुमासदार शैलीत कविता (Ramdas Athavale poem) सादर करून वाळूजकरांची मनं जिंकली. वाळूजमधील बजाजनगर येथील आम्रपाली बुद्धविहारात सोमवारी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. आठवले हे दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सोमवारच्या कार्यक्रमात त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर त्यांच्या शैलीत भाष्य केले. राज्यातील मॉल आणि सुपरमार्केटमध्ये वाइन विक्रीच्या धोरणावर बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री स्वतः दारू घेत नाहीत मग जनतेला का दारू पाजताहेत? या वेळी व्यासपीठावर बाबूराम कदम पप्पू कागदे, मिलिंद शेळके, संजय ठोकळ, प्रवीण नितनवरे, शरद कीर्तिकर, अनिल चोरडिया, संतोष लाठे आदींची उपस्थिती होती.

….वाळूजकर खळखळून हसले

मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी वाळूजकरांवर कविता सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. ती कविता पुढीलप्रमाणे-

आज माझा भरून आला आहे ऊर कारण माझ्या पाठीशी उभं आहे वाळूज-पंढरपूर मी तर आहे भीमाच्या तालमीत तयार झालेला शूर म्हणून मी बदलून टाकणार आहे वाळूज-पंढरपूरचा नूर तुम्ही सर्वांनी लावलात माझ्या खांद्याला खांदा म्हणून मी करून टाकला आहे बऱ्याच लोकांचा वांदा…

प्रकाश आंबेडकरांवर निशाणा

वाळूज येथील कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधला. ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी आता ऐक्य आम्हाला मान्य नाही, ही भूमिका सोडली पाहिजे. ऐक्याचा विषय मी मांडलेला आहे. पण प्रकाश आंबेडकर हे भेटण्यासाठी वेळ देतील असं वाटत नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय ऐक्य शक्य नाही.

शिवसेना-भाजप भांडण मिटले पाहिजे- आठवले

दरम्यान, ठाकरे सरकारवर टीका करताना रामदास आठवले म्हणाले, सरकार मॅनेजमेंट करण्यापेक्षा एकमेकांना मॅनेज करण्यात व्यस्त आहे. सरकारकडून विकास कामांचा योग्य आढावा घेतला जात नाही. सरकार पाडण्यासाठी संजय राऊत यांच्यावरील आरोप निरर्थक आहेत. तसेच शिवसेना आणि भाजपचे भांडण मिटले पाहिजे, असं आम्हाला वाटतं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत पुढाकार घ्यावा, संजय राऊत यांना समज द्यावी, शिवसेना भाजप एकत्र आले पाहिजे. दोन्ही काँग्रेससोबत राहिल्यास शिवसेनेचे नुकसान होईल. तसेच जुन्या फॉर्म्युल्यावर एकमत झाल्यास भाजपसुद्धा तयार होईल, अशी शक्यता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. औरंगाबाद येथील सुभेदारी विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं.

इतर बातम्या-

Travel Special: दक्षिण भारतातील निसर्गाचे सौंदर्य बघायचे आहे? मग ‘या’ 5 ठिकाणांना नक्की भेट द्या!

दोघे भाऊ बहिणीच्या घरी भांड-भांड-भांडले, वादात मध्यस्थी करणाऱ्या भावोजींची हत्या

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली