AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway: नवीन वर्षापासून मराठवाड्यातून पुण्यासाठी नवी रेल्वे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती

मराठवाड्यातील प्रवाशांना आता पुण्याला जाण्यासाठी नवीन वर्षात आणखी एक रेल्वे सुरु होणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतीच याबाबत माहिती दिली.

Railway: नवीन वर्षापासून मराठवाड्यातून पुण्यासाठी नवी रेल्वे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 18, 2021 | 9:40 AM
Share

औरंगाबादः मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे.  एक जानेवारीपासून नांदेड, जालना, औरंगाबादहून  पुण्याला जाण्यासाठी नवी रेल्वे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री राबवसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दिली. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात ही रेल्वे आठवड्यातून दोन दिवस धावेल आणि नंतर ती संपूर्ण आठवडाभर धावेल, असेही सांगण्यात आले आहे. येत्या आठवड्यात संबंधित रेल्वेचे वेळापत्रक रेल्वे विभागाच्या वतीने जारी करण्यात येईल.

औरंगाबाद ते अंकाई (मनमाड)चा मार्गही मोकळा

रेल्वे राज्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद ते अंकाई (मनमाड) या 98 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा मार्गही मोकळा झाला आहे. रेल्वे मंत्रालयाने या दुहेरीकरणासाठी अंतिम भूखंड सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे. त्यासाठी 1 कोटी 96 लाख रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. दक्षिण मध्य रेल्वेला शुक्रवारी दिलेल्या पत्रानुसार औरंगाबाद ते अंकाई या रेल्वेमार्गाला बायपाससह मंजुरी दिल्याचे समोर आले आहे. मात्र परभणी ते मनमाड या 291 किमी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण रेल्वे मंत्रालयाने गुंडाळले आहे.

औरंगाबाद ते अंकाई दुहेरीकरणाने काय फायदा?

औरंगाबादपासून अंकाईपर्यंतचा रेल्वे मार्ग दुहेरी झाल्यावर या मार्गावर अंकाई येथे बायपास होईल. यामुळे 32 किलोमीटर लांबीचा फेरा वाचेल. तसेच अंकाईला होणाऱ्या बायपासमुळे शिर्डीला जाणाऱ्या गाड्यांना 32 किमीचा फेरा वाचेल. गाड्या मनमाडला न जाता थेट अंकावरून बायपास होतील. या मार्गावर दुहेरीकरण झाल्याने रेल्वेगाड्यांची संख्या वाढण्यास मदत होईल. तसेच रेल्वेचा वेगही वाढेल. एकेरी मार्गावर एखादे रेल्वे इंजिन बंद पडले तर संपूर्ण वाहतूक विस्कळीत होते. हा प्रकार दुहेरीकरणामुळे थांबेल.

इतर बातम्या-

TET Exam : टीईटी घोटाळ्याचे रेट आधीच ठरले, ऑडिओ क्लिपने खळबळ; कशी झाली सेटिंग?

TET Exam : कोण आहेत तुकाराम सुपे?, ओळखपत्रांमुळे बिंग फुटले; रिचेकिंगच्या नावाखाली घोटाळा

Follow Us
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात