AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“बाबरी पाडताना त्या ठिकाणी कोण्या पक्षाचे बॅनर,झेंडा नव्हता”; शिवसेनेच्या आमदाराने चंद्रकांत पाटील यांच्या सूरात सूर मिसळले

तुम्हाला शरम वाटली पाहिजे ज्या शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये जाऊ नका म्हणाले होते तरीही तुम्ही तिथे गेला आहात.त्यामुळे सगळ्यात मोठे दोषी आणि गुन्हेगार तुम्ही आहात असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

बाबरी पाडताना त्या ठिकाणी कोण्या पक्षाचे बॅनर,झेंडा नव्हता; शिवसेनेच्या आमदाराने चंद्रकांत पाटील यांच्या सूरात सूर मिसळले
| Updated on: Apr 11, 2023 | 4:53 PM
Share

छत्रपती संभाजीनगर : बाबरी मशीद पाडली तेव्हा कोणीही शिवसैनिक म्हणून नाही तर हिंदू म्हणून होते, आणि विश्व हिंदू परिषद सगळ्यांचं नेतृत्व करत होती असं मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने आले आहेत. तर त्यांच्या या वक्तव्याचे समर्थन शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाठ यांनी केले आहे. त्यांचे समर्थन करताना ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य हे वैयक्तिक आहे. त्यामुळे कुणाच्या बाजूने आहे असे मला वाटत नाही असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

आमदार संजय शिरसाठ यांनी चंद्रकांत पाटील यांचे समर्थन करताना म्हणाले की, राम मंदिर उभारणी किंवा बाबरी पाडणे हे आंदोलन सर्व हिंदू धर्मियांचे होते.

त्या ठिकाणी कोण्या पक्षाचे बॅनर किंवा झेंडा नव्हता असे म्हणते शिवसेनेच्याच आमदाराने भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्या सूरात सूर मिसळले आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिदीच्या विषयावरून राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. त्यामुळे आता शिवसेना, भाजप आणि ठाकरे गट यामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगले आहे.

ज्यावेळी बाबरी ढाचा पाडला त्यावेळेस शिवसेनाप्रमुख म्हणाले होते की, माझ्या शिवसैनिकांनी जर बाबरी ढाचा पाडला असेल तर मला त्याचा अभिमान आहे या बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याचीही आठवण करून दिली जात आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा भाजप आणि ठाकरे गट वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे.

बाबरी ढाचा पाडला त्या आंदोलनाच्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हे गुन्हा दाखल झाला होता. आज जे बोलत आहेत की बाळासाहेबांचा अपमान झाला आहे.

बाळासाहेबांचा अपमान करण्याची हिम्मत या देशांमध्ये कोणाचेही नाही अशा शब्दात त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचेही त्यांनी समर्थन केले आहे.

यावेळी संजय शिरसाठ यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबो केला आहे. त्यांनी वक्तव्य केले होते की तुम्ही त्यांची नाडी धरून गेले होता का..? त्यावर शिरसाठ यांनी राऊत यांच्यावर तोफ डागली आहे.

तुमची नाडी आता शरद पवार यांनी काढली आहे, त्यामुळे तुमची अवस्था आता विनाड्याच्या पायजमासारखी झाली असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. तुम्ही शिवसेनाप्रमुखाच्या नावाने दुकानदाऱ्या चालवल्या आहात.

त्यामुळे आता टाळ्या वाजवत बसा, मात्रा आता तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी आम्हाला सांगू नका असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. आज जे बोलत आहेत मात्र त्यावेळेस त्या आंदोलनामध्ये कोणीच नव्हते त्यांना राम जन्मभूमी आणि कार सेवकांची माहिती सुद्धा नाही.

आम्ही दर्शनाला गेलो तरी तुमच्या पोटात दुखते आज आदित्य ठाकरे काय हैदराबादच्या शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हायला गेला काय अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

तुम्हाला शरम वाटली पाहिजे ज्या शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये जाऊ नका म्हणाले होते तरीही तुम्ही तिथे गेला आहात.त्यामुळे सगळ्यात मोठे दोषी आणि गुन्हेगार तुम्ही आहात असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.