AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bee attack : पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, आरडाओरड, किंकाळ्या अन् धावाधाव, जखमी रुग्णालयात

त्या परिसरात आतापर्यंत आठ जणांवर हल्ला केला असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुध्दा या घटनेची मोठी चर्चा सुरु आहे.

Bee attack : पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, आरडाओरड, किंकाळ्या अन् धावाधाव, जखमी रुग्णालयात
bee attack Image Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 10, 2023 | 9:11 AM
Share

सोयगाव : तालुक्यातील (soygaon) अजिंठ्याच्या (Ajanta Caves) डोंगर रांगेत ऐतिहासिक पर्यटन स्थळ असलेल्या वेताळवाडी किल्ल्यावर रविवारी पर्यटक (tourists) भटकंती करीता येत असतात. तीन पर्यटक वेताळवाडी किल्ला बघण्यासाठी किल्ल्यावर असताना, दुपारी तीन-चार वाजेच्या दरम्यान अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये अशोक मोरे रा. जरंडी वय 45 वर्षे, राजेंद्र पाटील रा.जरंडी वय 43 वर्षे, मनोहर पाटणकर रा.शेंदुरणी, जि जळगाव, वय 29 वर्षे, हे तीन पर्यटक गंभीर जखमी झाले. मधमाशांनी हल्ला केल्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. त्यावेळेत आरडाओरड, किंकाळ्या अन् धावाधाव अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

दरम्यान सोयगाव-हळदा रस्ता हा वेताळवाडी किल्ल्या लगत असल्याने भिकन मंडवे वय 45, अनिता मंडवे वय 38, प्रेरणा मंडवे वय 15 व अभिजित मंडवे वय 11 वर्षे सर्व रा. गलवाडा (एस) हे आपली गावी हळद्याकडून येत असताना या मंडवे कुटुंबावर सुध्दा मधमाशांनी हल्ला केला. प्रदीप जाधव हा धावण्याचा सराव करण्यासाठी हळदा कडे धावत असताना त्याच्यावर पण मधमाशांनी हल्ला करीत जखमी केले. या आठही जखमींना सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील गाडे परिचारिका एस. ए. बोराडे यांनी उपचार केले, तर त्यांना के.जी.पाटील, निर्मलाबाई जेठे यांनी मदत केली.

त्या परिसरात आतापर्यंत आठ जणांवर हल्ला केला असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुध्दा या घटनेची मोठी चर्चा सुरु आहे. तीन वेगळ्या-वेगळ्या घटनांमध्ये नागरिकांवर मधमाशांनी हल्या केल्यामुळे त्या परिसरात नागरिक जाण्यास घाबरत आहेत. त्याचबरोबर जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पर्यटन ठिकाणी मधमाशांनी अनेकदा हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.