AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गंभीर! कोरोनाची लस न घेतलेल्या तिघांचा औरंगाबादेत मृत्यू, घाटी रुग्णालयात सुरु होते उपचार

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णांना सौम्य स्वरुपाची लक्षणे जाणवत असली तरीही लस न घेणे रुग्णांच्या जीवावर बेतू शकते. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात अशा तिन्ही रुग्णांचा गुरुवारी मृत्यू झाला.

गंभीर! कोरोनाची लस न घेतलेल्या तिघांचा औरंगाबादेत मृत्यू, घाटी रुग्णालयात सुरु होते उपचार
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 12:19 PM
Share

औरंगाबादः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रथमच शहरात तिघांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णांवर विषाणूचा प्रभाव कमी गंभीर स्वरुपाचा दिसून येत आहे. याचे प्रमुख कारण लसीकरण आहे. मात्र ज्या व्यक्तींनी लस घेतलेली नाही, त्यांना विषाणूसंसर्गाच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते. औरंगाबादमध्ये 13 जानेवारी रोजी अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 5 जानेवारी रोजी दोघांचे कोरोनामुळे प्राण गेले होते. गुरुवारी मरण पावलेले तिन्ही रुग्ण कोमॉर्बिड म्हणजेच विविध व्याधीग्रस्त होते.

घाटीत व्हेंटिलेटरवर सुरु होते उपचार

घाटी रुग्णालयात सदर तिन्ही रुग्णांवर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. यापैकी एका 65 वर्षांच्या महिलेवर 23 दिवसांपासून उपचार सुरु होते. ती गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथील रहिवासी होती. 20 डिसेंबर 2021 रोजी तिला घाटीच्या सुपस्पेशालिटी वॉर्डात दाखल करण्यात आले होते. तिला उच्च रक्तदाबाचा त्रास, मधुमेह, न्यूमोनिया असल्यामुळे श्वसनाचा त्रास होता. चिकलठाणा येथे आणखी एका 78 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांनाही हृदयविकार आणि मधुमेहाचा त्रास होता. तिसरा रुग्ण नायगाव येथील रहिवासी होते, त्यांचे वय 51 वर्षे होते. त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्याने डायलिसिस सुरु होते. तेदेखील गंभीर अवस्थेतच घाटी रुग्णालयात दाखल झाले होते.

लस न घेतल्यास जीवावर बेतू शकते!

सुपर स्पेशालिटीचे विशेष कार्याधिकारी डॉ. सुधीर चौधरी म्हणाले, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रथमच एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाला आहे. या तिन्ही रुग्णांनी लस घेतलेली नव्हती. तिसऱ्या लाटेत रुग्णांना कमी त्रास होत असला तरी ओमिक्रॉन विषाणूला कमी लेखणे जीवावर बेतू शकते. लस घेतलेली असेल तरच विषाणूची लक्षणे सौम्य दिसून येतात, हे नागरिकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच मास्क वापरणे, गर्दी टाळणे आदी नियमांचे पालन करणेही अत्यावश्यक आहे.

इतर बातम्या-

Kiran Mane | कोणतंही सरकार आलं तरी विरोधात पोस्ट लिहिणारच, तो माझा हक्कच; अभिनेता किरण माने भूमिकेवर ठाम

Nanded | नांदेड जिल्हयात गारपिटीसह जोरदार पाऊस, शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.