AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गंभीर! कोरोनाची लस न घेतलेल्या तिघांचा औरंगाबादेत मृत्यू, घाटी रुग्णालयात सुरु होते उपचार

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णांना सौम्य स्वरुपाची लक्षणे जाणवत असली तरीही लस न घेणे रुग्णांच्या जीवावर बेतू शकते. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात अशा तिन्ही रुग्णांचा गुरुवारी मृत्यू झाला.

गंभीर! कोरोनाची लस न घेतलेल्या तिघांचा औरंगाबादेत मृत्यू, घाटी रुग्णालयात सुरु होते उपचार
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 12:19 PM
Share

औरंगाबादः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रथमच शहरात तिघांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णांवर विषाणूचा प्रभाव कमी गंभीर स्वरुपाचा दिसून येत आहे. याचे प्रमुख कारण लसीकरण आहे. मात्र ज्या व्यक्तींनी लस घेतलेली नाही, त्यांना विषाणूसंसर्गाच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते. औरंगाबादमध्ये 13 जानेवारी रोजी अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 5 जानेवारी रोजी दोघांचे कोरोनामुळे प्राण गेले होते. गुरुवारी मरण पावलेले तिन्ही रुग्ण कोमॉर्बिड म्हणजेच विविध व्याधीग्रस्त होते.

घाटीत व्हेंटिलेटरवर सुरु होते उपचार

घाटी रुग्णालयात सदर तिन्ही रुग्णांवर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. यापैकी एका 65 वर्षांच्या महिलेवर 23 दिवसांपासून उपचार सुरु होते. ती गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथील रहिवासी होती. 20 डिसेंबर 2021 रोजी तिला घाटीच्या सुपस्पेशालिटी वॉर्डात दाखल करण्यात आले होते. तिला उच्च रक्तदाबाचा त्रास, मधुमेह, न्यूमोनिया असल्यामुळे श्वसनाचा त्रास होता. चिकलठाणा येथे आणखी एका 78 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांनाही हृदयविकार आणि मधुमेहाचा त्रास होता. तिसरा रुग्ण नायगाव येथील रहिवासी होते, त्यांचे वय 51 वर्षे होते. त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्याने डायलिसिस सुरु होते. तेदेखील गंभीर अवस्थेतच घाटी रुग्णालयात दाखल झाले होते.

लस न घेतल्यास जीवावर बेतू शकते!

सुपर स्पेशालिटीचे विशेष कार्याधिकारी डॉ. सुधीर चौधरी म्हणाले, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रथमच एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाला आहे. या तिन्ही रुग्णांनी लस घेतलेली नव्हती. तिसऱ्या लाटेत रुग्णांना कमी त्रास होत असला तरी ओमिक्रॉन विषाणूला कमी लेखणे जीवावर बेतू शकते. लस घेतलेली असेल तरच विषाणूची लक्षणे सौम्य दिसून येतात, हे नागरिकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच मास्क वापरणे, गर्दी टाळणे आदी नियमांचे पालन करणेही अत्यावश्यक आहे.

इतर बातम्या-

Kiran Mane | कोणतंही सरकार आलं तरी विरोधात पोस्ट लिहिणारच, तो माझा हक्कच; अभिनेता किरण माने भूमिकेवर ठाम

Nanded | नांदेड जिल्हयात गारपिटीसह जोरदार पाऊस, शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान

Follow Us
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....