AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोपीनाथ मुंडे नसते तर पारावर हरिपाठ करत बसलो असतो: रावसाहेब दानवे

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे राजकारणात नसते तर जवखेड्याच्या पारावर बसून हरिपाठ म्हणत बसलो असतो, असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले. (Raosaheb Danve)

गोपीनाथ मुंडे नसते तर पारावर हरिपाठ करत बसलो असतो: रावसाहेब दानवे
रावसाहेब दानवे,केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: | Updated on: Aug 20, 2021 | 12:22 PM
Share

औरंगाबाद: दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे राजकारणात नसते तर जवखेड्याच्या पारावर बसून हरिपाठ म्हणत बसलो असतो, असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले. रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना हे उद्गार काढले. (union minister Raosaheb Danve slams Maha Vikas Aghadi government)

गेली 35 वर्षे या जिल्ह्यातील लोकांनी आमदार, खासदार केलं. तुम्ही मला आमदार, खासदार केलं नसतं तर मी रेल्वे राज्यमंत्री झालो असतो? मी कोयला मंत्री झालो असतो? मी काय ग्राहक संरक्षण मंत्री झालो असतो? तुम्ही निवडून दिलं नसतं आणि गोपीनाथ मुंडे राजकारणात नसते तर जवखेडच्या माऊलीच्या पारावर मी हरिपाठ म्हणत बसलो असतो. मी कलकत्ता, लखनऊ, दिल्ली या कितीही गोष्टी करत असलो, कितीही वर गेलो तरी माझ्या मतदारांना मी विसरणार नाही, अशी ग्वाही रावसाहेब दानवे यांनी दिली.

आमची दोरी तुमच्या हाती

पतंग आकाशात असते पण जमिनीवर उभ्या असलेल्या माणसाच्या हातात तिची दोरी असते. पतंगाला दिशा देण्याचं काम जमिनीवरचा माणूस करतो. जोपर्यंत जमिनीवरच्या माणसाच्या हातात पतंग आहे. तोपर्यंत पतंगाला दिशा आहे. पण जेव्हा पतंगाची दोरी सुटली की तर पतंग कोणत्या गटारेत पडेल सांगता येत नाही. आम्हा पुढाऱ्यांची अवस्था अशी आहे. तुमच्या हातात दोर नीट आहे, म्हणून आमचा खेळ सुरू आहे. तुम्ही दोरा सोडला तर आम्ही कुठे जाऊन पडू सांगता येत नाही. त्याचीच जाणीव ठेवून आम्ही मंत्रिमंडळात काम करत असतो, असं ते म्हणाले.

राष्ट्रपतींना विनंती

यावेळी त्यांनी बैलांच्या शर्यतीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. बैलगाडा शर्यती व्हावी ही भाजपची सुरुवातीपासून भूमिका आहे. बैलांच्या शर्यतीबाबत आम्ही राष्ट्रपतीना विनंती केली आहे. 12 महिने शेतकरी बैलाला जीव लावतात. त्यामुळे बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली पाहिजे, असं ते म्हणाले.

आघाडीवर टीका

तामिळनाडूच्या आरक्षणाला स्थगिती मिळत नाही. पण आमच्या आरक्षणला स्थगिती मिळते याचा अर्थ हे सरकार बाजू मांडण्यात कमी पडलं आहे, अशी टीकाही त्यांनी आघाडी सरकारवर केली.

गलिच्छ राजकारण तेच करू शकतात

केंद्रीय उद्योग मंत्री ठाकरे स्मृती स्थळावर गेल्यावर तिथे गोमूत्र शिंपडण्यात आलं. त्यावरही दानवे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बाळासाहेब ठाकरे हे या राज्यातील मान्यता प्राप्त नेते आहेत. त्यांच्या स्मारकावर कुणालाही बंदी घालता कामा नये. इंदिरा आणि अटलजींच्या स्मारकावर जायला कुणालाही बंदी नाही, इकडे अशा पध्दतीने गलिच्छ राजकारण फक्त तेच करू शकतात, अशी टीका त्यांनी केली. इंदिरा गांधी यांचे स्मारक म्हणण्याऐवजी सोनिया गांधी स्मारक असे म्हणाले होते. त्यांनी नंतर ही चूक सावरून घेतली. (union minister Raosaheb Danve slams Maha Vikas Aghadi government)

संबंधित बातम्या:

शुद्धीकरणसाठी ब्राह्मण लागतो, आम्हाला मागायला हवा होता. आमच्याकडे खूप आहेत; राणेंचा शिवसेनाला खोचक टोला

‘शिवसैनिकांची कृती म्हणजे बुरसटलेली तालिबानी मानसिकता’, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण, आता नारायण राणेंकडून जोरदार प्रत्युत्तर, काय म्हणाले राणे?

(union minister Raosaheb Danve slams Maha Vikas Aghadi government)

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र