AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वयंपाकाला कोणते तेल वापरू? लाकडी घाण्याचे की रिफाइंड तेल टाकू? वाचा आहारतज्ज्ञ काय सांगतात

कोणत्याही पॅकिंगच्या आणि घाण्याच्या तेलाच्या दरात 150 रुपये प्रति किलोची तफावत येते. मात्र तेल वापरण्याचे प्रमाण कमी ठेवल्यास घाण्याचे तेलही परवडू शकते, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.

स्वयंपाकाला कोणते तेल वापरू? लाकडी घाण्याचे की रिफाइंड तेल टाकू? वाचा आहारतज्ज्ञ काय सांगतात
| Edited By: | Updated on: Oct 01, 2021 | 1:49 PM
Share

औरंगाबाद: दसरा-दिवाळी म्हटलं (Diwali season) की, खमंग कुरकुरीत चकल्या, शेव, शंकरपाळे.. अशा चमचमीत पदार्थांची (Tasty Recipes) रेचलेल असते. तेलकट, तुपकट खाऊ नका, असा डॉक्टरांच्या या सल्ल्याला उत्सवाच्या काळात सर्रास फाटा मारला जातो. पण कोरोना काळानं पुन्हा एकदा लोकांमध्ये आरोग्यप्रती जागृती झाली आहे. आपल्या शरीरप्रकृतीसाठी कोणते पदार्थ आवश्यक आहेत, कोणते तेल खाणे योग्य, याचा लोक कटाक्षाने विचार करू लागलेत. त्यातच बाजारात अनेक प्रकारचे खाद्य तेल विक्रीला आहेत. सध्या तर पारंपरिक पद्धतीच्या लाकडी घाण्यापासून (Wood pressed oil) बनवलेल्या तेलाचीही नव्याने विक्री सुरु झाली आहे. मग हे तेल चांगलं की किराणा दुकानांवर असलेले पॅकिंगचे (Packing oil) तेल चांगले, असा संभ्रम नागरिकांसमोर आहे.

पॅकिंगच्या तेलात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक

आहारतज्ज्ञांच्या मते, नामांकित कंपन्या रिफाइंड तेल आरोग्यासाठी किती चांगले आहे, याची जाहिरात करत असतात. मात्र खाद्य तेल रिफाइंड करताना त्याला तीन वेळा 300 डिग्रीपर्यंत तापवले जाते. यामुळे तेलातील सर्व जीवनसत्वे नष्ट होतात. ही जीवनसत्वे आम्ही नव्याने तेलात टाकतो, असा दावा कंपन्या करतात. पण त्यात कितपत तथ्य असते, हे सांगता येत नाही. अशा तेलात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते. लाकडी घाण्याचे तेल घेतानाही ते सुटे घेत असाल तर विश्वासातील व्यक्तीकडूनच घेणे चांगले. कारण त्यातही पुन्हा भेसळ होण्याचा धोका असतो.

हृदयाची काळजी घ्या, रिफाइंड तेल टाळा

रिफाइंड तेलात हृदयविकारासाठी कारणीभूत असलेल्या घटकांचा समावेश असतो. त्यामुळे जिथे घाण्याचे तेल उपलब्ध असते, तेथील नागरिकांनी शक्यतोवर हेच तेल वापरण्याचा सल्ला हृदयविकार तज्ज्ञांनी दिला आहे. घाण्याच्या तेलात ओमेगा थ्री फॅटी अॅसिड असते, जे हृदयासाठी चांगले असते. यात निसर्गतःच तेलात मिळणारे जीवनस्त्व आढळतात. त्यामुळे घाण्याचे तेल खाणे अधिक फायद्याचे ठरते, असा सल्ला आहारतज्ज्ञ अलका कर्णिक यांनी दिला आहे.

घाण्याचे तेल महाग, मग काय करु?

बाजारात सध्या विविध ठिकाणी घाण्याचे तेल आणि पॅकिंगचे तेल असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. घाण्याचे तेल शरीरासाठी उत्तम असल्याचे डॉक्टर सांगत असले तरीही किंमतीतील प्रचंड तफावतीमुळे सामान्य नागरिक पॅकिंगच्या तेलालाच प्राधान्य देतात. औरंगाबादमध्ये करडई आणि शेंगदाण्याच्या घाण्याच्या तेलाची जास्त विक्री होते. करडईचं घाण्याचं तेल 330 रुपये किलो आहे तर पॅकिंगच्या तेलाची किंमत 220 रुपये लीटर आहे. अशा प्रकारचे कोणत्याही पॅकिंगच्या आणि घाण्याच्या तेलाच्या दरात 150 रुपये प्रति किलोची तफावत येते. मात्र तेल वापरण्याचे प्रमाण कमी ठेवल्यास घाण्याचे तेलही परवडू शकते, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.

एका व्यक्तीने एका महिन्यात किती तेल खावे?

आहातज्ज्ञांच्या मते, एका व्यक्तीने एका महिन्यात अर्धा लीटर तेलच वापरले पाहिजे. अशा रितीने चार माणसांच्या कुटुंबाला महिन्यातून फक्त दोन लीटरच तेल वापरले पाहिजे. योग्य रितीने नियोजन केले तर आपले आरोग्य टिकवणे आपल्याच हाती आहे. अन्यथा जास्त तेल खाणे शरीरासाठी घातक ठरू शकते.

ईट लोकल, ईट नॅचरल, ईट सिझनल

ज्या भागात ज्या तेलबियांचे उत्पादन होते, त्या भागातील नागरिकांनी त्याचेच तेल खावे, हे साधे समीकरण आहे. तसेच हंगामी तेलबियांचेही तेल खाणे उत्तम आहे. औरंगाबादेत करडई, जवस, शेंगदाणा या तेलबियांचे उत्पादन घेतले जाते तर इथल्या नागरिकांनी हेच तेल आहारात वापरले पाहिजेत. खोबरेल तेल, मोहरीचे तेल, तीळाचे तेल थेट आहारात वापरणे आपल्याकडील स्थानिकांच्या आरोग्यासाठी फार प्रभावी ठरत नाही. त्यातच घाण्याचे तेल खाल्ले तर शरीरासाठी हे अपायकारक ठरत नाही. कारण प्लॅस्टिकच्या पॅकिंगमध्ये असलेल्या तेलात प्लॅस्टिकचाही कंटेंट उतरलेला असतो, त्यामुळे हे तेल सहसा टाळलेलेच बरे, असा सल्ला औरंगाबाद येथील आहारतज्ज्ञ प्राची डाकेते, यांनी दिला आहे.

इतर बातम्या- 

सावधान… तुमच्या रोजच्या आहारातील गहू- तांदळाची पौष्टीकता होतेय कमी ?

Skin Care : फेस वॅक्सिंग ट्राय करत आहात? तर ‘या’ टिप्स नक्की फाॅलो करा!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.