AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भगवान भरोसे आहे का क्रांती चौक उड्डाणपूल? औरंगाबादच्या पुलावरील मेख ते प्रशासकीय गोंधळ, वाचा सविस्तर..

एकिकडे शहरात चिकलठाणा ते वाळूज असा अखंड उड्डाणपुलाच्या चर्चा सुरु आहेत तर दुसरीकडे शहरातील प्रमुख क्रांती चौक उड्डाणपुलाची जबाबदारी घेण्यावरून चांगलंच नाट्य रंगलं आहे.

भगवान भरोसे आहे का क्रांती चौक उड्डाणपूल? औरंगाबादच्या पुलावरील मेख ते प्रशासकीय गोंधळ, वाचा सविस्तर..
क्रांती चौक उड्डाणपुलावरील मोठ्या फटीची पाहणी करताना डॉ. भागवत कराड
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jan 08, 2022 | 7:00 AM
Share

औरंगाबादः एकिकडे शहरात चिकलठाणा (Chikalthana) ते वाळूज (Waluj) अशा अखंड उड्डाणपुलाच्या चर्चा सुरु आहेत तर दुसरीकडे शहरातील प्रमुख क्रांती चौक उड्डाणपुलाची जबाबदारी घेण्यावरून चांगलंच नाट्य रंगलं आहे. क्रांती चौक उड्डाण पुलाच्या मधोमध असलेल्या फटीवरून सध्या प्रशासकीय गोंधळ माजला आहे. दररोज सुमारे 40 हजार वाहने ज्या पुलावरून जातात, त्या पुलावर एवढी मोठी फट असणे किती घातक आहे, यासंबंधीचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाले. त्यानंतर ही दुरुस्ती कुणी करायची, यावरून गोंधळ माजला आहे. गुरुवारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी या पुलाची पाहणी केली. त्यांच्यासमोरही या पुलाची जबाबदारी घेण्यास कुणी तयार झाले नाही. महापालिका, MSRDC आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यापैकी कुणाकडे या पुलाचा ताबा आहे, हा गुंता अजूनही सुटलेला नाही.

तूर्तास MSRDC दुरुस्ती करणार

नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे आधी पूलाची दुरुस्ती. या प्रकरणी उच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर MSRDC ने पुलाची दुरूस्ती करून देण्याचे तूर्तास मान्य केले आहे. मात्र पुढील जबाबदारी आपली नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी गुरुवारी यासंबंधी एक बैठक घेतली आणि सर्वच उड्डाणपुलांची जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना दिल्या.

काय आहे नेमका गुंता?

MSRDC ने औरंगाबादेत 2011 ते 2016 या काळाच पाच उड्डाणपूलांचे काम केले. प्रत्येक पुलासाठी दोष निवारण कालावधी पाच वर्षांचा होता. हा कालावधी संपल्यानंतर MSRDC ने हे पूल संबंधित यंत्रणांकडे हस्तांतरीत करणे अपेक्षित असते. मात्र हस्तांतरणाची ही प्रक्रिया अर्धवट असल्याचा आरोप महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. MSRDC म्हणते- 2018 मध्ये क्रांती चौक उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरीत केला. सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणतो– केंद्र सरकारच्या निधीतून रस्ते, पूल आम्हीही बांधतो आणि संबंधित यंत्रणेकडे हस्तांतरीत करतो. मग हा पूल आमच्याकडे येण्याचा प्रश्नच नाही. महापालिका म्हणते– अभियंते सखाराम पानझडे म्हणतात, जालना रोडच आमच्या ताब्यात नाही तर उड्डाणपूल कसा येईल? हस्तांतरणाची प्रक्रियाही अर्धवट आहे. ती पूर्ण करायची असेल तर या पूर्ण रस्त्यावरील, उड्डाणपुलावरील दुरुस्ती करूनच तो महापालिकेच्या ताब्यात द्यायला हवा. त्यानंतरच त्याचे कागदोपत्री हस्तांतरण करावे.

इतर बातम्या-

‘शेतकरी आंदोलनामुळे गेलेली पत सुधारण्यासाठी भाजपने पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली’, पटोलेंची खोचक टीका

Ajinkya Rahane: खासदार गौतम गंभीर यांचा मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर कुठला जुना राग आहे?

Follow Us
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल
संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले...
Sanjay Raut | संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले, बाळासाहेबांचा पक्ष-चिन्ह....
मनीषा कायंदे यांचा संजय राऊतांवर घणाघात; शिंदेंची बाजू घेत सुनावलं...
Manisha Kayande On Sanjay Raut | संजय राऊतांसारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही! मनीषा कायंदेंचा घणाघात; शिंदेंची बाजू घेत राऊतांना सुनावलं
अमरावती आश्रमशाळा वसतीगृहात 48 ऐवजी 110 मुली एका खोलीत
अमरावती आश्रमशाळा वसतीगृह: क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थिनी, जीवाशी खेळ सुरु
सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला,आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर
नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला: एटीएसकडून तपास सुरु, आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर छापा