AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर शेतकरी आणि दिव्यांगांचा मुद्दा टिकेल…,’ शिवसेना प्रवेशावर काय म्हणाले बच्चू कडू ?

दिव्यांगांसाठी, मजुरांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी शिवसेना पक्ष नव्याने धोरण तयार करेल, शिवसेनेचे शेतकऱ्यांसाठीचे धोरण आहेच पण त्याला आणखी नव्याने नवीन रूप देऊन सक्षमपणे ते धोरण तयार करु, कोणाची पोट दुखी होत असेल त्याची पर्वा आम्ही करत नाही असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

...तर शेतकरी आणि दिव्यांगांचा मुद्दा टिकेल...,' शिवसेना प्रवेशावर काय म्हणाले बच्चू कडू ?
bacchu kadu
| Updated on: May 01, 2026 | 10:15 PM
Share

प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आले आहे.यामुळे आता बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती संघटनेचे काय होणार ? तसेच बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे म्हटले जात आहे.या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी आपली भूमिका मांडली आहे.

बच्चू कडू यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना अनेक मुद्यांवर आपली बाजू मांडली आहे. ते म्हणाले की प्रश्न जबाबदारीचा नाही तर मुद्द्याचा आहे मी मुद्दे घेऊन लढणार आहे. शिवसेनेचा एक नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे, जो शेतकऱ्यांसाठी दिव्यांगांसाठी आणि मजुरांसाठी लढणारा असेल असेही त्यांनी ठासून सांगितले.

मी हाती भगवा घेतला आहे, तो छत्रपती शिवरायांच्या विचाराचा आहे, त्या विचाराने शिवसेनेच्या विचाराने शिवसेनेची ताकद वाढवू, आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत शेतकरी मजूर दिव्यांगांचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत लढू, काही सुटले तरी चालेल पण शेतकऱ्यांपासून आणि दिव्यांगांपासून अलिप्त होणार नाही असेही बच्चू कडू यांनी सांगितले.

आता प्रहारमध्ये ज्यांना काम करायचं आहे ते करणार, ज्यांना राष्ट्रीय काम करायचा ते शिवसेनेत येणार, काही नालायक असतात ते विरोध करतात, त्यांना राहायचं आहे, त्यांनी राहावं मी कोणाला जबरदस्ती करणार नाही अशा शब्दात बच्चू कडू यांनी टीकाकारांना सुनावले आहे.

मी शिवसेनेपासून प्रवास सुरू केला होता

इथून पुढे आमचा राजकीय प्रवास शिवसेनेचा असेल सुरुवातीला मी शिवसेनेपासून प्रवास सुरू केला होता. आता शिवसेनेत आलो. काही बगलबच्चे असतात जे इकडे तिकडे जातात, पण शिवसेना सोडल्यानंतर बच्चू कडू ‘प्रहार’ म्हणून एकटा लढला कुठल्या पार्टीत गेलो नाही. पाच सहा निवडणुका लढलो एकाही पार्टीचा पाठिंबा घेतला नाही असेही बच्चू कडू यांनी सांगितले.

साडेतीनशे गुन्हे दाखल असणारा…

साडेतीनशे गुन्हे दाखल असणारा बच्चू कडू दुसरा महाराष्ट्रात सापडणार नाही. राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादी विलीन होते त्यावर कोणी टीका करत नाही. नगरपालिकेत राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र होतात त्यांच्यावर कोणी टीका करत नाही. उद्धव ठाकरे काँग्रेससोबत बसली, त्यांच्यासोबत वर कोणी टीका करत नाही, त्यांच्यावर फडणवीस सुद्धा टीका करीत नाही, पण बच्चू कडूवर टीका करायला सुरुवात झाली असे बच्चू कडू त्राग्याने म्हणाले.

मला आत्मविश्वास आहे आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांचा बच्चू कडूवर विश्वास आहे, मी थांबणारा बच्चू कडू नाही असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांचा आवाज बुलंद होईल. ट्रोल करणारे 50 पैशांना विकत भेटतात, त्याची आम्ही पर्वा करीत नाही. सगळ्या लोकांच्या कॅबिन त्याच्यासाठी भरल्या आहेत,ट्रोल करणारे अर्धे विकाऊ आहेत. तुम्हाला सांगून देतो की तुमच्या न्यूजवर माझ्या बाजूने किती ट्रोल पाहिजे ते सांगा त्यासाठी एक-दोन लाखाचा खर्च करावा लागतो असेही ते यावेळी म्हणाले.

राजकीय परिस्थिती म्हणून आम्ही निर्णय घेतला

बच्चू कडूवर विश्वास ठेवा. बच्चू कडूचा आत्मविश्वास मोठा आहे, पाखंडी लोकांसोबत चर्चा करू नका, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. कर्जमाफीची घोषणा करून घेणारा बच्चू कडूशिवाय दुसरा कोणी होता का ? या हाताचे बंधन जीआर काढल्याशिवाय सुटणार नाही. जीआर पंधरा दिवसात निघणार आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन केल्यानंतर प्रहार सोडून कोणी आमचे आभार मानले आहे का ? राजकीय परिस्थिती म्हणून आम्ही निर्णय घेतला आहे, याही परिस्थितीत आम्ही टिकू तर शेतकरी आणि दिव्यांगांचा मुद्दा टिकेल. आमची इमानदारी आहे, ट्रोल करणारे भामटे लोक आहेत त्यांच्यापासून आम्ही पळत नाही यांचे मायबाप दहा असतात अशी टीका बच्चू यांनी केली आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी