AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदलापूर, अंबरनाथमध्ये अनेक गावांना हादरे, घरांना तडे; नेमकं काय घडलं?

बदलापुरातील नवीन वडवली येथील घनकचरा प्रकल्पाच्या ब्लास्टिंगमुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. घरांना तडे गेले आहेत, आरोग्यावर परिणाम झाले आहेत. नागरिकांनी ब्लास्टिंग थांबविण्याची मागणी केली आहे आणि जर ते थांबवले नाही तर कचरा प्रकल्पाचे काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.

बदलापूर, अंबरनाथमध्ये अनेक गावांना हादरे, घरांना तडे; नेमकं काय घडलं?
badlapur
| Updated on: Mar 24, 2025 | 8:34 PM
Share

बदलापुरातल्या नवीन वडवलीत घनकचरा प्रकल्पासाठी सुरू असलेल्या ब्लास्टिंगमुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. ब्लास्टिंगमुळे नवीन वडवली, अंबरनाथ तसेच साई गावातील अनेक घरांना तडे गेले आहेत. यामुळे इथल्या रहिवाशांचा जीव धोक्यात आला आहे. हे ब्लास्टिंग तात्काळ न थांबवल्यास एकत्रित घनकचरा प्रकल्पाचं काम बंद पाडू, असा इशारा या रहिवाशांनी दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

बदलापूर नगरपालिका हद्दीतील नवीन वडवली या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून घनकचरा प्रकल्पाचं काम सुरू आहे. या ठिकाणी बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. मात्र या कचरा प्रकल्पाच्या नावाखाली इथला डोंगर फोडण्यात येत आहे. त्यासाठी दिवस-रात्र ब्लास्टिंगचं काम केलं जात आहे. जवळपास ६ इंच बोअरवेल मारून हे ब्लास्टिंग करण्यात येतं.

या कामाचा नाहक त्रास नवीन वडवली, नवीन अंबरनाथ तसेच साई गावातल्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. या ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना तडे गेले आहेत. तसेच अनेक लहान मुलं रात्री दचकून जागी होतात. त्यासोबतच विद्यार्थ्यांना अभ्यास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. घरात धूळ येत असल्याने अनेकांना श्वसनाचे आजार देखील झाले आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

तिन्ही गावांमध्ये भीतीचं वातावरण

सध्या नवीन वडवली, नवीन अंबरनाथ तसेच साई या तिन्ही गावांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. या कामसाठी सुरु असलेले हे ब्लास्टिंग तात्काळ न थांबवल्यास कचरा प्रकल्पाचं काम पूर्णपणे बंद पाडू, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी हा प्रकल्प उभारला जात आहे. इथे ब्लास्ट होतात. आमच्या घरांना हादरे बसतात. मुलं दचकून उठतात. याबद्दल शासनाला वारंवार तक्रार करुन अर्ज करुनही ते काहीही दखल घेत नाही. याबद्दल आम्ही महिला आंदोलन करणार आहोत. आम्हाला धुराचा त्रास होतोय. सर्दी-खोकला, जुलाब याचाही त्रास होत आहे. सरकारने याची तात्काळ दखल घ्यायला हवी, अशी प्रतिक्रिया स्थानिक महिलांनी दिली आहे.

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....