AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अबब! 50 फूटांचा हार, जेसीबीवरून फुलांची उधळण, शीघ्र कवी, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं कुठे झालं स्वागत?

शरद पवार यांनी महाविकास आघाडी सोडून भाजपाला पाठिंबा द्यावा, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे.

अबब! 50 फूटांचा हार, जेसीबीवरून फुलांची उधळण, शीघ्र कवी, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं कुठे झालं स्वागत?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 10, 2023 | 2:58 PM
Share

महेंद्रकुमार मुधोळकर, बीड : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas athawale) बीड (Beed) जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. 50 फुटांचा हार, जेसीबी वरून फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी अशा स्वरूपात या उत्साही कार्यकर्त्यांनी आठवलेंचं स्वागत केले आहे. रिपाईचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या बीड शहरातील नूतन कार्यालयाचं आठवले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी जिल्ह्यातील कामांचा आढावा आठवले यांनी घेतला. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर युती केली असली तरी ती किती टिकेल हे सांगता येत नाही असं भाकीत केलं. प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले असले तरी ते महाविकास आघाडी सरकार मध्ये गेलेले नाहीत. त्यामुळे ते कुठेही गेले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. तर शरद पवार यांनी नागालँड मध्ये जो पाठिंबा दिला तसा महाराष्ट्रातही द्यावा, महाविकास आघाडीतून बाहेर पडाव,असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलंय.

‘वंचित- ठाकरेगटाची युती टिकाणार नाही’

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटासोबत युती केली आहे. महाविकास आघाडी आणि वंचितची युती होईल का, यावरून रामदास आठवले यांनी भाकित वर्तवलं आहे. ते म्हणाले, वंचित-ठाकरेंची युती किती टिकेल हे सांगता येत नाही. महाविकास आघाडीत जातील हे सांगता येत नाही. पण आम्हाला फरक पडत नाही. शिंदे-फडणवीस आणि मी आमच्या तिघांची ताकद आहे. कालच्या निवडणुकीत तिन्ही राज्यात एनडीएचं सरकार आलं आहे. येणारं कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेशात सर्वच ठिकाणी भाजप, एनडीएचं सरकार आणण्याचा प्रयत्न आहे. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कितीही नेते उभे राहिले. तरी त्यांना हरवण्याचं येड्या-गबाळ्याचं काम नाही.

पवारांनी मविआ सोडावी..

शरद पवार यांनी महाविकास आघाडी सोडून भाजपाला पाठिंबा द्यावा, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे. ते म्हणाले, नागालँडमध्ये शरद पवार यांनी एनडीएला पाठिंबा दिला. तसा देशात सर्वच ठिकाणी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला देखील पाठिंबा द्यावा. आपल्यासारखा अनुभवी नेता आमच्या सोबत असला असला पाहिजे, त्यामुळे पवार यांनी महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडावं असं आवाहन आठवले यांनी पवारांना केले आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.