AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीड जिल्हा कोणामुळे बदनाम झाला? अजितदादा पहिल्यांदाच स्पष्ट बोलले

गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे,  टोळीयुद्धाची देखील अनेक प्रकरणं समोर आली आहेत. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

बीड जिल्हा कोणामुळे बदनाम झाला? अजितदादा पहिल्यांदाच स्पष्ट बोलले
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 02, 2025 | 8:57 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे,  टोळीयुद्धाची देखील अनेक प्रकरणं समोर आली आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, हे प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. या सर्व मुद्द्यावर आज अजित पवार यांनी भाष्य केलं आहे, ते बीडमध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हणाले अजित पवार? 

काही चुकीच्या लोकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि नको तेवढी मोकळीक दिल्यामुळे बीड जिल्हा बदनाम झाला आहे. मात्र आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला लौकिक मिळून द्यायचा आहे. बीडमधील विकृत लोकांना सरळ करणार म्हणजे करणार. कोणी कितीही मोठ्या बापाचा असो किंवा कोणत्याही नेत्या जवळचा असो त्याला सरळ करणार म्हणजे करणार. नवीन पिढीला आवाहन करतो की आईच्या पोटातून कोणी शिकून येत नाही, पण जिद्द आणि चिकाटीच्या बळावर माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो हे आजच्या लोकांकडून कळतं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी प्रसारमाध्यांचे देखील कान टोचले आहेत. वस्तूस्थितीला धरून बातम्या दिल्या पाहिजेत,  टी आर पी साठी कधी कधी बातम्या रंगवून सांगितल्या जातात, मात्र तसे करू नका. त्यामुळे एखाद्या शहराची बदनामी होऊ नये. बीड आणि बिडकरांची बदनामी थांबवण्यासाठी एकत्र आले पाहिजे. चुकीच्या गोष्टीला समर्थन न करता सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र आले पाहिजे.

ग्रामीण मराठी पत्रकारितेला एक विशेष परंपरा आहे. विविध लढ्यात पत्रकारितेचे मोठे योगदान आहे. ते टिकवले पाहिजे. मीडियाने वाईटाला वाईट आणि चांगल्याला चांगले म्हटलं पाहिजे. मीडिया ट्रायलमुळे एखादा माणूस आयुष्यातून उध्वस्त होतो.  AI चा वापर पत्रकारितेलाही केला पाहिजे. आता ते सगळ्या क्षेत्रात वापरले जाणार आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे, दरम्यान  बीड जिल्ह्यात शहरापासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर विमानतळ उभारणार असं अश्वासन देखीलअजित पवार यांनी यावेळी दिलं आहे.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.