Gopinath Munde: गोपीनाथ गड गावा-गावात पोहोचवण्याचा संकल्प! गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांचं वक्तव्य

भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज बीडमधील गोपीनाथ गड येथे भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी मोठ्या संख्येने जमलेल्या समर्थकांना आवाहन घेतले.

Gopinath Munde: गोपीनाथ गड गावा-गावात पोहोचवण्याचा संकल्प! गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांचं वक्तव्य
गोपीनाथ गडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे भाषण
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 1:23 PM

बीडः भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या जयंतीनिमित्त आज बीडमधील गोपीनाथ गड येथे भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मोठ्या संख्येने जमलेल्या समर्थकांना आवाहन घेतले. यावेळी त्या म्हणाल्या, नेहमी गोपीनाथ गडावर सगळे नेते, कार्यकर्ते, समर्थक येतात. पण आता यापुढे गोपीनाथ गडावर तुम्ही यायची आवश्यकता नाही. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी गरीबांच्या सेवा करण्याचा जो वारसा दिला आहे, तो आपण गावा-गावापर्यंत पोहोचवू. गरीबातला गरीब, फाटक्यातल्या फाटक्या माणसापर्यंत सेवेचा हा वारसा पोहोचवू. वीटभट्टीवरील कामगार, ऊसतोड कामगार, खडी फोडणाऱ्या सगळ्यांपर्यंत गोपीनाथ गड (Gopinath Gadh) गेला पाहिजे, असा संकल्प आज करू, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी जमलेल्या समर्थकांना केले.

मुंडेसाहेब जन्मले तो दिवस…

पंकजा मुंडे यावेळी भाषणात म्हणाल्या, मी आजीला नेहमी विचारायचे, आजी मुंडेसाहेब जन्मले तो दिवस नेमका कसा होता. तेव्हा आजीने सांगितले, त्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा होती. त्या दिवशी गरीबाच्या घरी गरीबाचां काम करणारा राजा जन्मला. म्हणून तर आज लोक पोवाडे, भारूडाच्या माध्यमातून त्या राजाचं गुणगान करतात. त्यांचं कौतुक करताना लोकांनी माझं नाव घेतलं तेव्हा मला रहावलं नाही. हा दिवस माझा नाही. जनतेच्या सेवेसाठी आम्ही संकल्प केला आहे. देशातील सर्व नेते इथे आले की गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊनच जातात. कारण त्यांनी सगळ्या विचारांशी, जातींशी सलोखा निर्माण केला. त्यांचा हाच वसा पुढे चालवण्याचा दिवस आहे,’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

गरीबांचे पांग फेडण्यासाठी फडात जाणार- पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमात येण्यापूर्वी परळी येथईल वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ केला. दुपारी 12 वाजेच्या सुमारास पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर प्रवेश केला. इथे समर्थकांची मोठी गर्दी जमलेली होती. पंकजा यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी महादेव जानकर, रत्नाकर गुट्टे, नमिता मुंदडा यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर आपण ऊसाच्या फडात जाणार असून तेथील ऊसतोड कामगार कशाप्रकारे काम करतात, कसे दिवसभर कष्ट करतात हे पाहणार, त्यांचे सुख-दुःख समजून घेणार असे नियोजन असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. तसेच आज रक्तदान करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

इतर बातम्या-

तर गोपीनाथ मुंडेंनी केंद्रावर दबाव आणून आरक्षण मिळवून दिलं असतं: छगन भुजबळ

राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यन्वित होणार आहे की नाही?; देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.