AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी स्वत:ला संपवून घेईन’, बजरंग सोनवणे यांची निवडणूक अधिकाऱ्याला धमकी

बजरंग सोनवणे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना स्वत:ला संपवून घेण्याची धमकी दिली. सोनवणे यांनी निवडणूक अधिकारी महेंद्र कांबळे यांना धमकी दिली. "कांबळे साहेब हात आकडू नका. अन्यथा मी स्वत:ला संपवून घेईन", असं वक्तव्य बजरंग सोनवणे यांनी केलं.

'मी स्वत:ला संपवून घेईन', बजरंग सोनवणे यांची निवडणूक अधिकाऱ्याला धमकी
बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे
| Updated on: Jun 02, 2024 | 4:54 PM
Share

बीड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे आज चांगलेच आक्रमक झाले. बजरंग सोनवणे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना स्वत:ला संपवून घेण्याची धमकी दिली. सोनवणे यांनी निवडणूक अधिकारी महेंद्र कांबळे यांना धमकी दिली. “कांबळे साहेब हात आकडू नका. अन्यथा मी स्वत:ला संपवून घेईन”, असं वक्तव्य बजरंग सोनवणे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. स्ट्राँग रुमच्या पाहणीदरम्यान बजरंग सोनवणे यांनी संबंधित वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर बीडच्या राकारणात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बजरंग सोनवणे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. “मी काय बोललो हा विषय नाही. त्यांनी लोकशाही जिवंत ठेवली नाही तर बीड जिल्हा काय म्हणेल? त्यांनी लोकशाही जिंवत ठेवावी, अशी प्रतिक्रिया बजरंग सोनवणे यांनी दिली”, असं बजरंग सोनवणे म्हणाले.

‘…म्हणून स्टाँग रुमला आलो’

“स्ट्राँग रुमला येण्याचं कारण हे की, जिल्हाधिकारी इथे आहेत. त्यांच्याशी मला काही चर्चा करायची आहे. त्यामुळे मी इथे आलो आहे. त्यांनी मला काही गोष्टी विचारल्या आहेत. त्यामुळे त्यांना प्रत्यक्षात येऊन बोलतो, असं म्हणालो. याशिवाय स्टाँग रुमच्या पाहणीसाठी इथे आलो आहे”, अशी प्रतिक्रिया बजरंग सोनवणे यांनी दिलं.

बजरंग सोनवणे आणखीय काय म्हणाले?

  • जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांना मी वयक्तिक पत्र देवून तक्रार केली होती. त्याला आता खूप वेळ झाला आहे.
  •  मतदानाची प्रक्रिया पारदर्शक पार करेल अशी खात्री मला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
  •  जिल्ह्यातील सर्व जातीधर्मातील लोकांनी सलोखा राखून शांततेत राहिले पाहिजे.
  •  41 उमेदवारांपैकी मीच निवडून येणार आहे.
  •  निवडणूक अधिकारी महेंद्र कांबळे यांना मी अनेक तक्रारी केल्या होत्या. ते एकतर्फी वागतात असे माझे मत झाले आहे.
  • कांबळे आणि पोलीस प्रशासनाचे एकमत दिसत नाही.
  •  स्ट्राँग रूममध्ये देखील लोकप्रतिनिधींच्या एजंटसाठी बसण्याची जागा अपुरी आहे.
  • इथे चेंगराचेंगरी झाल्यानंतर जबाबदारी कोणाची आहे? सांगून देखील प्रशासन ऐकत नव्हते म्हणून मला जीव संपविण्याची भाषा करावी लागली.
  • कौल कोणाचा, काय आहे माहीत नाही. मात्र माझा विजय निश्चित आहे. बीड जिल्ह्यातील संस्कृती आणि रसायन वेगळे आहे. खासदार मात्र मीच होणार.

बीडमध्ये नेमकी राजकीय परिस्थिती काय?

बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पंकजा मुंडे या लोकसभेच्या मैदानात आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे आहेत. बजरंग सोनवणे यांनी गेल्या निवडणुकीतही खासदार प्रीतम मुंडे यांना टफ फाईट दिली होती. तसेच या निवडणुकीतही बीडमध्ये चुरशीची लढत झाली आहे. पण एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे या जिंकून येण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांना त्यांचे बंधू मंत्री धनंजय मुंडे यांचीदेखील या निवडणुकीत साथ लाभली. त्यामुळे त्यांची ताकद दुप्पट झाली. आता येत्या 4 तारखेला कोण बीडमध्ये खरी बाजी मारतं ते स्पष्ट होणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.