AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर तुम्हालाही महाराष्ट्रात फिरायचंय; मनोज जरांगेंचा मुंडे बंधू-भगिनीला इशारा

Manoj Jarange Patil on Dhananjay Munde Pankaja Munde : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

...तर तुम्हालाही महाराष्ट्रात फिरायचंय; मनोज जरांगेंचा मुंडे बंधू-भगिनीला इशारा
| Updated on: May 16, 2024 | 5:37 PM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या बीडमध्ये आहेत. बीडमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि मंत्री तसंच राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. नारायण गडावरील सभा पुढे ढकलली. त्यामुळे आता मी लगेच उपोषण सुरू करणार आहे. उपोषणाचा निर्णय चार जून आधीच होणार आहे. मुंडे बहिण-भाऊ कार्यकर्त्यांना भडकावत आहेत. पण तुम्हालाही महाराष्ट्रात फिरायचं आहे, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे बंधू- भगिनीला इशारा दिलाय.

मुंडे बंधू- भगिनीवर टीका

मलाही आता धमक्या येत आहेत. तुझ्याकडे बघून घेऊ. तुला जीवे मारू, असं म्हटलं जात आहे. मला बीडमध्ये पाय ठेवू दिला जाणार नाही, असं देखील म्हटलं जात आहे. परंतु मुंडे बहीण भावाने एक लक्षात घ्यावं की मला बीडमध्ये जरी येऊ दिले नाही, तर त्यांनाही महाराष्ट्रात फिरायचं आहे. माझा लढा माझ्या समाज बांधवांसाठी आहे. त्यासाठी माझी बलिदानाची देखील तयारी आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

8 जूनला बीडच्या नारायणगड इथं होणारी सभा पुढे ढकलली आहे. आता त्या सभेच्या अनुषंगानेच मी चार जूनची उपोषणाची तारीख जाहीर केली होती. परंतु सभा पुढे ढकलली गेल्याने मी त्याच्या आधीच उपोषण सुरू करणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

राजकीय नेत्यांच्या भूमिकेवर भाष्य

बीडच्या केज तालुक्यातील नांदुर घाट इथं झालेल्या दगडफेकीत मराठा समाज बांधव जखमी झाले आहेत. त्यांची भेट त्यांनी बीडच्या जिल्हा रुग्णालयात घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बीडमध्ये हा जो प्रकार सुरू आहे. तो आता निवडणुकीनंतर होणं, मला अपेक्षितच होतं. मराठा मताची यांना गरज आहे. परंतु मराठा समाज बांधवांची यांना गरज नाही. त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या नेत्यांनी नेत्यांनी ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

Follow Us
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.
VSR कंपनीच्या मालकाची CID चौकशी सुरू; जय पवारांच्या ट्विटनंतर कारवाई
VSR कंपनीच्या मालकाची CID चौकशी सुरू; जय पवारांच्या ट्विटनंतर कारवाई.
पंचगंगा नदी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात; नागरिकांमध्ये संताप
पंचगंगा नदी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात; नागरिकांमध्ये संताप.
संजय राऊत आणि रामदास आठवलेंची गळाभेट; राजकीय चर्चांना उधाण
संजय राऊत आणि रामदास आठवलेंची गळाभेट; राजकीय चर्चांना उधाण.