“नितेश राणे बोलण्याच्या लायकीचे नाहीत”; काँग्रेसने नितेश राणे यांच्या आरोपांना उडवून लावलं
भाजपकडून देशाचे संविधान संपवण्याचे काम सुरू असल्याची टीका कत त्यांनी धर्म, जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जातो आहे अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
भंडारा : काँग्रेसचे आमदार राहुल गांधी यांनी केंब्रिज आणि हॉवर्ड विद्यापीठात व्याख्यान दिल्यापासून त्यांच्यावर भाजपकडून त्यांच्यावर प्रचंड टीका केली जात आहे. भाजपकडून त्यांच्यावर परदेशात भारताची प्रतिमा परदेशात मलिन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे आज सिंधुदुर्गमध्ये भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांची तुलना दाऊद इब्राहिम, ओसमा बिन लादेन यांच्याबरोबर केली आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडूनही त्यांच्यावर प्रतिहल्ला करण्यात आला आहे.
आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करताना काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी नितेश राणे हे बोलण्याच्या लायकीचे नाहीत असं म्हणून त्यांनी त्यांना थेट लाथडून लावले आहे.
नाना पटोले यांनी भाजप आमदार निलेश राणे यांच्यावर टीका करताना थेट त्यांची लायकीचे का्ढली आहे. तर दुसरीकडे भाजपवरही त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
भाजपकडून देशाचे संविधान संपवण्याचे काम सुरू असल्याची टीका कत त्यांनी धर्म, जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जातो आहे अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
भारतीय जनता पार्टीकडून इतर ठिकाणी संविधानाचा गवागवा केला जात असला तरी भाजपाकडून संविधानाला संपविण्याचे काम चालू आहे. जातीधर्मात तेढ निर्माण करण्याचे काम भाजपकडून सुरु असल्याची टीका नाना पटोले यांनी सत्ताधारी पक्षावर केली आहे.
ज्या संविधानाने चाय विक्रेत्याच्या मुलाला देशाचे प्रधानमंत्री बनविले त्याच देशाच्या संविधानाला संपविण्याचे काम भाजपाकडून होत असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे. भाजपाचे हैद्राबादचे आमदार टी.राजा सिंग यांनी 2025 मध्ये भारत हिंदूराष्ट्र होणार यावर प्रत्युतर देताना ते बोलत होते.
नाना पटोले यांनी यावेळी केंद्र सरकारसर भाजपवरही जोरदार निशाणा साधत त्यांना नितेश राणे यांच्यावर सडकून टीका केली. तर राष्ट्र्वादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांची जळगाव बैंक निकाल प्रकरणी केलेले वक्तव्यावर नाना पटोले यांनी बोलने टाळले