AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोंदिया ते हैदराबाद विमानसेवा आजपासून सुरू, श्रेय कुणाचे प्रफुल्ल पटेल की सुनील मेंढे यांचे?

गोंदियातील बिरसी विमानतळावरून इंदोर-गोंदिया-हैदराबाद अशी विमान वाहतूक सेवा रविवार, 13 मार्चपासून सुरू होत आहे. परंतु, ही विमान वाहतूक सेवा कुणामुळं सुरू झाली, यावरून दोन्ही खासदारांमध्ये शितयुद्ध सुरू आहे. माझ्याच प्रयत्नामुळं ही सेवा सुरू झाल्याचं भाजपाचे खासदार सुनील मेंढे म्हणतात, तर व्यवस्था आम्हीच केल्याचं राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांचं म्हणणंय.

गोंदिया ते हैदराबाद विमानसेवा आजपासून सुरू, श्रेय कुणाचे प्रफुल्ल पटेल की सुनील मेंढे यांचे?
खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील मेंढेImage Credit source: tv 9
| Updated on: Mar 13, 2022 | 8:17 AM
Share

गोंदिया : गोंदिया येथील बिरसी विमानतळावरून (Birsi Airport) प्रवासी वाहतुकीचा प्रश्न अखेर सुटला. 13 मार्चपासून प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीला सुरुवात होणार आहे. बिरसी विमानतळावरून इंदोर ते गोंदिया ते हैदराबाद असे पहिले उड्डाण उडेल. या सेवेविषयी भंडारा-गोंदिया (Bhandara-Gondia) जिल्ह्याच्या नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. व्यापार आणि अन्य दृष्टिकोनातून विमान सेवा महत्त्वाची आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ होणार आहे. विशेष म्हणजे रविवारपासून सुरू होणाऱ्या सेवेच्या पार्श्वभूमीवर पहिल्या विमानाचे बुकिंग पूर्ण झाले असल्याची माहिती आहे.

खासदार सुनील मेंढे म्हणतात…

सर्व शहरांना देशाशी जोडण्याच्या विचार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. कमी दरात हवाई प्रवास करण्याची संधी या योजनेअंतर्गत उपलब्ध झाली आहे. बिरसी विमानतळावरून सुरू होत असलेली विमान सेवा त्याचाच एक भाग आहे. खासदार झाल्यानंतर सुनील मेंढे यांनी सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा केला. विमानतळ प्राधिकरण, नागरी उड्डाण मंत्रालयातील सर्व प्रमुख अधिकारी आणि मंत्र्यांना भेटले. खासदारांनी प्रवासी वाहतूक सुरू होणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले. वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी दूर केल्या. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या गेल्या, असं भाजपाचे खासदार सुनील मेंढे यांचे म्हणणे आहे.

खासदार प्रफुल्ल पटेल म्हणतात…

केंद्र सरकारमध्ये नागरी विमान मंत्री असताना गोंदियाच्या भविष्याचा विचार केला. बिरसी येथे असलेल्या इंग्रज काळातील विमानतळाला नवीन स्वरूप दिले. दिवसा तसेच रात्री विमाने उतरतील, अशी व्यवस्था केली. त्याच धावपट्टीवरून 13 मार्च रोजी विमान वाहतूक सेवा सुरू होत आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग व माजी कृषी मंत्री शरद पवार यांचे सरकार असताना या सेवेचे प्लानिंग केले होते. बिरसी येथील विमानतळाला अत्याधुनिक विमानतळाच्या दर्जा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी विमानतळाची व्यवस्था केली. त्यामुळं ही विमानसेवा सुरू होत असल्याचं प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यालयातून जारी झालेल्या पत्रकात म्हटलं आहे.

Video – Nagpur | प्रभाग रचनेची काम पुन्हा राज्याकडे येणार? विजय वडेट्टीवार यांनी नेमकं काय सांगितलं

वर्ध्यातील शेतकरी महिला जिल्हाधिकारी कार्यालयात जप्तीसाठी येते तेव्हा… कशी उडते कार्यालयात धांदल?

भंडाऱ्यात काम न करताच पैशांची उचल, पांदण रस्ते गायब! महालगाव ग्रामपंचायतीचा गैरकारभार?

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.