AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदा पाऊस कधी? कोणत्या पिकाला सोन्याचा भाव? कोणावर संकट? भेंडवळची भविष्यवाणी जाहीर

३७० वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळच्या घटमांडणीचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. यंदा पावसाची स्थिती कशी राहील, अतिवृष्टीचा धोका कधी आहे आणि कोणत्या पिकांना चांगला भाव मिळेल, याबद्दलची सविस्तर माहिती आणि शेतकऱ्यांसाठी धोक्याचा इशारा या बातमीत वाचा.

यंदा पाऊस कधी? कोणत्या पिकाला सोन्याचा भाव? कोणावर संकट? भेंडवळची भविष्यवाणी जाहीर
Bhendval Bhavishwani
| Updated on: Apr 20, 2026 | 7:29 AM
Share

गेल्या ३७० वर्षांपासून शेतकरी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात, ती भेंडवळची घटमांडणी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडली. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी आज सूर्योदयाच्या वेळी या मांडणीचे निष्कर्ष जाहीर केले. यंदा पाऊस पाणी कसा राहणार? पिकाला भाव मिळणार का? कोणत्या पिकावर रोगराई येणार? अतिवृष्टी होणार का? या सर्व प्रश्नांचे उत्तर देणारी भेंडवळची घटमांडणी आज जाहीर झाली. यंदाच्या भाकितानुसार पावसाची स्थिती संमिश्र राहणार असून, शेतकऱ्यांसाठी आनंदासोबतच चिंतेची बातमी समोर आली आहे.

पाऊस कधी बरसणार आणि कधी झोडपणार?

यंदाच्या भेंडवळाच्या घटमांडणीच्या भाकितानुसार पावसाची स्थिती चढ-उताराची राहणार आहे. पावसाचे चार महिने कसे असतील, याची माहितीही समोर आली आहे पावसाचा पहिला महिना अत्यंत कमी पावसाचा असेल. यामुळे सुरुवातीच्या पेरण्यांना विलंब होऊ शकतो किंवा दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. दुसऱ्या महिन्यात पाऊस साधारण स्वरूपाचा राहील, ज्यामुळे पिकांना उभारी मिळेल.

पण तिसरा महिला हा सर्वात घातक ठरु शकतो. या महिन्यात जलप्रलय होण्याची शक्यता आहे. या काळात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून नद्यांना महापूर येण्याचे संकेत आहेत. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. यानंतर चौथ्या महिन्यातही पावसाची उपस्थिती असेल, मात्र तो काढणीला आलेल्या पिकांसाठी अडथळा ठरू शकतो. यंदा अवकाळीचा मोठा तडाखा पाहायला मिळणार आहे. यंदा पावसाळ्याव्यतिरिक्त अवकाळी पाऊस भरपूर असेल, ज्यामुळे वर्षभर शेतीकामात व्यत्यय येईल.

कोणत्या पिकावर रोगराई येणार?

यंदा पिकांवर रोगराईचे प्रमाण जास्त राहणार असल्याचे भाकीत भेंडवळीच्या भाकितात वर्तवण्यात आले आहे. यंदा कापूस पीक साधारण येईल, मात्र त्याला बाजारभाव चांगला मिळेल. तिळाचे पीक यंदा उत्तम राहील. तूर पिकाची स्थिती अनिश्चित असेल. मूग साधारण येईल, पण भाव चांगले राहतील. उडीद आणि अंबाडीवर रोगराईचा मोठा प्रादुर्भाव दिसेल. बाजरीचे पीक चांगले येईल. ज्वारीचे पीक साधारण असले तरी त्याचे बाजारभाव वाढलेले राहतील. गहू, हरभरा, वाटाणा, मटकी आणि मसूर ही पिके सर्वसाधारण सरासरी राहतील.

दरम्याना एकूणच भेंडवळच्या भाकितानुसार यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी कसोटीचा ठरणार असल्याचे पाहायला मिळत आहे. अतिवृष्टी आणि रोगराई या दोन संकटांशी झुंज देत शेतकऱ्याला शेती करावी लागेल. या काळात चारा-पाण्याची टंचाई भासणार नाही. हाच मोठा दिलासा असेल, असे संकेत या मांडणीतून मिळताना दिसत आहे.

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.