AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणाला बसणार धक्का? या नेत्याचं नावही केंद्रीय मंत्रिपदाच्या शर्यतीत, शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, राजकारणात मोठा ट्विस्ट

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांनी प्रवेश केल्यापासूनच त्यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

कुणाला बसणार धक्का? या नेत्याचं नावही केंद्रीय मंत्रिपदाच्या शर्यतीत, शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, राजकारणात मोठा ट्विस्ट
एकनाथ शिंदे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 04, 2026 | 4:32 PM
Share

काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं. 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली. त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली. या सहा खासदारांपैकी दोन खासदारांना केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे, अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती देखील समोर आली होती. मात्र आता यामध्ये मोठा ट्विस्ट आल्याचा पहायला मिळत आहे. ओमराजे निंबाळकर यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंडखोरी केली, शिवसेना ठाकरे गटात एकून 9 खासदार आहेत, त्यापैकी 6 जणांनी बंडखोरी केल्यामुळे या खासदारांची संख्या दोन तृतियांश झाली आणि ऑपरेशन टायगर यशस्वी पार पडलं. परंतु जेव्हा खासदारांनी बंडखोरी केली होती, त्यावेळी ऐनवेळी ओमराजे निंबाळकर यांनी तळ्यात -मळ्यात भूमिका घेतल्यानं ऑपरेशन टायगर संकटात सापडलं होतं. आपण अजूनही पक्षप्रवेशाबाबत कोणताही निर्णय घेतला नाही, मी आधी माझ्या मतदारसंघात जाईल, कार्यकर्त्यांशी चर्चा करेल आणि त्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेल असं त्यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं होतं.

जर ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला नसता तर पक्ष सोडलेल्या खासदारांची संख्या पाचच होत असल्यानं ऑपरेशन टायगर संकटात  सापडलं असतं, परंतु ओमराजे निंबाळकर यांचं मन वळवण्यात एकनाथ शिंदे यांना यश आलं आणि ओमराजे निंबाळकर यांच्यासह सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. तेव्हापासूनच ओमराजे निंबाळकर यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. परंतु आता ओमराजे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण मंत्रिपदासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर श्रीरंग बारणे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. दरम्यान मंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे यांचं नाव देखील चर्चेत आहे. जर श्रीरंग बारणे आणि श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळालं तर संजय जाधव आणि ओराजे निंबाळकर यांची मंत्रिपदाची संधी हुकण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले बारणे? 

श्रीरंग बारणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे, यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचं हे शिंदे साहेब ठरवतात. शिंदे साहेब कार्यकर्त्याला न्याय देतात, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान फुटलेले खासदार भाजपमध्येही प्रवेश करू शकत होते, मग त्यांना तुमच्याकडे का घेण्यात आलं असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आला. जे सहा खासदार आहेत. ते मुळात बाळासाहेबांच्या विचाराने कार्य करत आहेत. ते पक्ष प्रमुखाला भेटू शकत नव्हते, त्यांच्या मतदारसंघात विकास कार्य होत नव्हतं, म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, असं यावेळी बारणे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?