AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काल निवडणुका जाहीर होताच आज ठाकरे गटाला मोठं भगदाड… नवी मुंबईत मोठ्या घडामोडी; अखेर त्या चौघांनी…

Maharashtra Politics : राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुका जाहीर होताच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. 4 बड्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काल निवडणुका जाहीर होताच आज ठाकरे गटाला मोठं भगदाड... नवी मुंबईत मोठ्या घडामोडी; अखेर त्या चौघांनी...
Big Blow for uddhav ThackerayImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Dec 16, 2025 | 7:40 PM
Share

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 15 जानेवारीला मतदान पार पडणार अजून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम अवघ्या एका महिन्यात पार पडणार आहे. अशातच आता निवडणूक जाहीर होताच राजकीय पक्षांना रणनीती तयार करण्यास सुरुवात केली आहेत. त्याच बरोबर पक्षांतरालाही सुरुवात झाली आहे. अनेक नेत्यांनी आपल्या सोयीच्या पक्षात प्रवेश करण्यास सुरूवात केली आहे. नवी मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. 4 बड्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नवी मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का

महानगर पालिकांच्या निवडणुका जाहीर होताच नवी मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक मनोहर कृष्णा मढवी (एम के मढवी ) आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यांच्यासोबत 3 नगरसेवक देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मढवी यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक ठाकरे गटाकडून लढवली होती. गणेश नाईक आणि विजय चौगुले यांच्या विरोधात ते ठाकरे गटाकडून मैदानात होते. मात्र त्यांचा पराभव झाला होता.

शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढणार

मनोहर कृष्णा मढवी यांच्याकडे ऐरोली बेलापूर विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख पद आहे. ऐरोली मतदारसंघात त्यांचे मोठे वर्चस्व आहे. त्यांच्या प्रवेशाने महापालिका निवडणुकीत शिवसेनेची ताकद वाढणार आहे. महत्वाचे म्हणजे एम के मढवी यांना 27 एप्रिल 2024 ला ठाणे खंडणी विरोधी पथकाने 2.5 लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक केली होती, मात्र आता ते शिवसेनेचा झेंडा हाती घेणार आहेत. एम के मढवी त्यांच्या सोबत विनया मढवी (पत्नी), करण मढवी (मुलगा) तसेच काँग्रेसच्या माजी नगरसेविका पूनम पाटील, त्यांचे पती मिथुन पाटील यांच्यासह इतर नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

उद्धव ठाकरेंना दोन दिवसात दोन धक्के

उद्धव ठाकरेंना दोन दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वॉर्ड क्रमांक 1 च्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाला रामराम करत भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ‘माझ्या प्रभागात विकासाची कामे करण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. तसेच अभिषेकच्या हत्येप्रकरणी गती येण्यासाठी मी भाजपात प्रवेश केला’ असं तेजस्वी यांनी म्हटले आहे.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.