AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल- डिझेलच्या काळाबाजाराबाबत सरकारचा मोठा निर्णय, गृह विभागाने आदेशच काढले; आता खैर नाही…

सध्या राज्यात इंधन तुटवडा भासू लागल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी पेट्रोलपंपावर लांबच्या लांब रांगा लागल्या असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच इंधनाचा काळाबाजर करणाऱ्यांबाबत आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

पेट्रोल- डिझेलच्या काळाबाजाराबाबत सरकारचा मोठा निर्णय, गृह विभागाने आदेशच काढले; आता खैर नाही...
Price HikeImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 23, 2026 | 12:37 PM
Share

राज्यात इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारने आणि गृह विभागाने आता अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. पेट्रोल आणि डिझेलची अवैध साठवणूक तसेच काळाबाजार करणाऱ्यांवर थेट आणि कठोर कारवाई करण्याचे आदेश गृह विभागाने पोलिसांना दिले आहेत. या नव्या आदेशांमुळे इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, दोषी आढळणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासन ‘अलर्ट’वर

सध्या राज्यात खरीप हंगामाची लगबग सुरू होत आहे. या काळात शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी पेट्रोल आणि डिझेलची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासते. नेमकी हीच संधी साधून काही समाजकंटकांकडून इंधनाचा काळाबाजार होण्याची शक्यता असते. ही बाब गांभीर्याने घेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला कडक सूचना दिल्या आहेत. खरिपाच्या तोंडावर राज्यातील एकाही शेतकऱ्याला इंधनासाठी त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी स्पष्ट केले की, इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी संपूर्ण प्रशासन सध्या हाय अलर्टवर आहे. वर्ध्यात आजच अशा प्रकारच्या अवैध साठवणुकीवर मोठी कारवाई देखील करण्यात आली आहे.

इंधनाच्या काळाबाजारासोबतच शिक्षण क्षेत्रातील गंभीर गैरप्रकारांवरही सरकारने आपला मोर्चा वळवला आहे. अकरावी आणि बारावीमध्ये प्रवेश (ॲडमिशन) घेऊनही अनेक विद्यार्थी मुख्य महाविद्यालयात न जाता थेट खाजगी शिकवणी वर्गांना (कोचिंग क्लासेस) प्राधान्य देतात. यामुळे महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची हजेरी केवळ नावापुरतीच उरते. अशा अनेक तक्रारी राज्य सरकारकडे प्राप्त झाल्या आहेत.

या ‘डमी’ आणि ‘इंटिग्रेटेड’ क्लासेसच्या संस्कृतीला चाप लावण्यासाठी राज्य सरकार लवकरच एक कडक नियमावली तयार करणार आहे. आता अकरावी आणि बारावीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया लागू करण्यात आली असून, विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात बसतात की नाही हे तपासण्यासाठी महाविद्यालयांमध्ये बायोमॅट्रिक हजेरी अनिवार्य केली जाणार आहे.

जागतिक परिस्थितीच्या अनुषंगाने असे निर्णय घेण्यात येत आहे.. इंधन बचतीचा संदेश पंतप्रधानाने देखील दिला आहे.. आणि याला देशातील नागरिकही सहकार्य करत आहे.. मात्र ही परिस्थिती लवकर दुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे असे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी म्हटले आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा