AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठ्या घडामोडींना वेग, सरकारचे प्रतिनिधी जरांगेंशी बोलणार, मुंबईकडे येणार की मागे फिरणार? फैसला लगेच होणार?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेना रवाना झाले आहेत. मात्र आता रात्रीच सरकारचे प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोठ्या घडामोडींना वेग, सरकारचे प्रतिनिधी जरांगेंशी बोलणार, मुंबईकडे येणार की मागे फिरणार? फैसला लगेच होणार?
Manoj-Jarange-Patil-Devendra-Fadnavis
| Updated on: Aug 27, 2025 | 11:09 PM
Share

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेना रवाना झाले आहेत. आज रात्री ते शिवनेरीवर मुक्कामी असणार आहेत. 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे मुंबईत पोहोचणार असून आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत. मात्र आता रात्रीच सरकारचे प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज रात्री ही भेट होणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सरकारचे प्रतिनिधी रात्रीच जरांगे पाटलांना भेटणार…

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री सरकारचे प्रतिनिधी मनोज जरांगे यांना भेटणार आहेत. मनोज जरांगे यांच्यासोबत वाहनांची संख्याही जास्त आहे, त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळात वाहनांची गर्दी होण्याची शक्यता आहे. याबाबत सरकारचे काही प्रतिनिधी जरांगे पाटलांना भेटण्याची शक्यता आहे. मात्र या प्रतिनिधींमध्ये कोणते नेते असणार याबाबत माहिती समोर येऊ शकलेली नाही. एक वरिष्ठ नेता जरांगे पाटलांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. हा नेता सरकारचा निरोप जरांगे पाटलांनी देणार असल्याचेही बोलले जात आहे.

सरकारकडून प्रस्ताव दिला जाणार?

सरकारच्या प्रतिनिधींकडून मनोज जरांगे पाटील यांच्या समोर आंदोलन मागे घेण्याबाबत प्रस्ताव ठेवला जाणार का? जरांगे पाटलांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला जाणार का? किंवा सरकारकडून काही आश्वासन दिले जाणार का? तसेस सरकारने जर काही प्रस्ताव दिला तर तो जरांगे पाटील स्वीकारणार का? हे आणि यासारखे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. मात्र आता या सर्व प्रश्नांची उत्तर अल्पावधित समोर येणार आहेत.

सरकार चर्चेसाठी तयार – विखे पाटील

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकार मनोज जरांगे पाटलांसोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. ‘चर्चा करण्यासाठी आंदोलनकर्त्यांची तयारी पाहिजे, त्यांची तयारी असेल तर आम्ही देखील तयार आहोत, मात्र त्यासाठी दोन्हीही बाजूने समन्वय झाला पाहिजे. उच्च न्यायालयाच्या निर्देशाबाबत जरांगे पाटलांनी निर्णय घ्यायचा आहे, शासनाची यात कुठलीही भूमिका नाही, सरकारने यापूर्वीही प्रतिष्ठेचा प्रश्न केलेला नव्हता आणि आताही नाही’ असं विधान विखे पाटलांनी केलं आहे.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा