मोठी बातमी! भाजपचा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का? त्या एका निर्णयामुळे महायुतीत बिघाडीची शक्यता

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा एक दिवस शिल्लक आहे. महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला देखील ठरला आहे. मात्र त्यानंतर राजकारणात मोठा ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे.

मोठी बातमी! भाजपचा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का? त्या एका निर्णयामुळे महायुतीत बिघाडीची शक्यता
महायुतीमध्ये बिघाडी?
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 31, 2026 | 3:10 PM

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहे. एक जून हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. जागा वाटपावरून महायुतीमध्ये गेले अनेक दिवस चर्चेचं गुऱ्हाळ चालू होतं. मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला काही केल्या निश्चित होत नव्हता. मात्र अखेर आता जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भाजप विधान परिषदेच्या 11 जागा लढवणार आहे. तर शिवसेना चार आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 2 जागा लढवणार आहे.  शिवसेना शिंदे गट 6 जागांवर ठाम असल्यामुळे जागा वाटप लांबल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून 6 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 3 जागांची मागणी करण्यात आली होती.

मात्र अखेर आता जागा  वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून, भाजप 11, शिवसेना शिंदे गट 4 आणि अजित पवार गट 2 जागा लढवणार आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची ताकद अधिक असल्यामुळे भाजपने 14 जागा लढवाव्यात अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून सुरू होती, मात्र भाजपने युती धर्म पाळत शिवसेना शिंदे गटाला 4 जागा दिल्या आहेत.

मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर आता यवतमाळ विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुतीमध्ये ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाली आहे. मात्र तरी देखील या जागेसाठी आता  भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, यावरून आता चर्चेला उधाण आलं आहे. यवतमाळमध्ये भाजप -शिवसेनेमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून सूचना आल्याने उमेदवारी दाखल करणार असल्याचं यावेळी भुतडा यांनी स्पष्ट केलं आहे.  जर मला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितलं तर मी परत घेईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. मी बंडखोरी करत नाही, पक्षाचा आदेश आहे तो पूर्ण करत आहे, असं यावेळी भुतडा यांनी म्हटलं आहे. दरम्यान नितीन भुतडा यांच्या उमेदवारीमुळे आता महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे.

 

Follow Us