AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांना 13 तर राज्याला मिळणार 626 कोटी, पीक विम्याच्या बीड पॅटर्नमुळे सरकारचा फायदा : प्रविण दरेकर

सरकारच्या पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांचा फायदा होण्याऐवजी कंपन्यांना 4274 कोटीचा रुपयांचा फायदा झाला. तसेच सरकारच्या बीड पॅटर्नमुळे महाविकास आघाडीच्या वसूली सरकारचं भलं होणार आहे, असे दरेकर म्हणाले.

शेतकऱ्यांना 13 तर राज्याला मिळणार 626 कोटी, पीक विम्याच्या बीड पॅटर्नमुळे सरकारचा फायदा : प्रविण दरेकर
pravin-darekar
| Edited By: | Updated on: Jul 06, 2021 | 10:30 PM
Share

मुंबई : “सरकारच्या पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांचा फायदा होण्याऐवजी कंपन्यांना 4274 कोटीचा रुपयांचा फायदा झाला. तसेच सरकारच्या बीड पॅटर्नमुळे महाविकास आघाडीच्या वसूली सरकारचं भलं होणार आहे. शेतकऱ्यांना 13 कोटी 42 लाख मदत रुपयांची मिळाली. पण राज्य शासनाला मात्र 626 कोटी रुपये मिळणार आहेत. या बीड पॅटर्नमुळे राज्य सरकारचं चांगभलं होणार आहे,” असा घणाघाती आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (BJP leader Pravin Darekar) यांनी केला. ते आज राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनात विधानपरिषद पुरवणी मागणीच्या चर्चेदरम्यान बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारकडे वेगवेगळ्या मागण्या केल्या. (BJP leader Pravin Darekar criticizes state government over crop insurance Beed pattern)

बीड पॅटर्नमुळे राज्य सरकारचं चांगभलं होणार

विधानपरिषदेत सादर केलेल्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेवर बोलताना विरोधी पक्षनेते दरेकर यांनी पीक विम्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बीड पॅटर्नचा विरोध केला. त्यांनी “बीड पॅटर्नमुळे महाविकास आघाडी वसूली सरकारचं भलं होणार आहे. या पॅटर्नच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त 13 कोटी 42 लाख रुपये मिळाले असताना राज्य शासनाला यामध्ये 626 कोटी रुपये मिळणार आहेत. म्हणजेच बीड पॅटर्नमुळे राज्य सरकारचं चांगभलं होणार आहे. जे लाखो शेतकरी क्लेम सादर करू शकले नाहीत, त्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही,” असे सांगत बीड पॅटर्न हा शेतकऱ्यांचा हिताचा नसल्याचा आरोप दरेकर यांनी केला.

सरकारच्या कृपेमुळे विमा कंपन्यांना 4234 कोटी रुपयांचा फायदा

तसेच पुढे बोलताना शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठ्या घोषणा केल्या. पण कोरडवाहू आणि बागायती शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत देण्यात आली नसल्याचा आरोप दरेकर यांनी केला. तसेच पीक विम्याच्या योजनेवर गंभीर टीका केली. “पीक विमा योजनेमध्ये या सरकारच्या काळात 138 लाख शेकऱ्यांचा पीक विमा काढण्यात आला होता. त्यापैकी 15 लाख शेतकऱ्यांना परतावा दिला गेला. जेवढी रक्कम कंपन्यांकडे जमा झाली त्यापैकी फक्त 18 टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळाली. या सरकारच्या कृपेमुळे शेतकऱ्यांचा फायदा होण्याऐवजी कंपन्यांना 4234 कोटी रुपयांचा फायदा झाला,” असे प्रविण दरेकर म्हणाले.

तसेच पुढे बोलताना दरेकर यांनी कृषी, मत्स्यविभाग, सिंचन, गृहनिर्माण, नगरविकास, आदीवासी विकास तसेच बीडीडी चाळींचा पुनर्वसन आदी विविध विषयांवर सरकारला धारेवर धरले. दरेकर यांनी सांगितले की, मृदु व जलसंधारण विभागात घोटाळा झाला. 2 हजार कोटीचे काम एकाच वेळी निविदा काढून कशाप्रकारे केले ? असा सवाल त्यांनी केला.

इतर बातम्या :

Modi Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील 24 तासांत होण्याची शक्यता, महाराष्ट्रातून कुणाची वर्णी?

Modi Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात कपिल पाटलांना स्थान मिळण्याची शक्यता, कसा आहे राजकीय आलेख?

MPSC मार्फत 15 हजार रिक्त पदं भरणार; मराठा, ओबीसी आरक्षणासाठी ठऱाव मंजूर, पावसाळी अधिवेशनात काय काय घडलं ?

(BJP leader Pravin Darekar criticizes state government over crop insurance Beed pattern)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.