AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या गोंधळातून त्यांचा ओबीसींबद्दलचा द्वेष उफाळून आला : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनानंतर माध्यमांशी बोलताना ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष भाजपवर हल्लाबोल केलाय.

भाजपच्या गोंधळातून त्यांचा ओबीसींबद्दलचा द्वेष उफाळून आला : उद्धव ठाकरे
| Edited By: | Updated on: Jul 06, 2021 | 7:12 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनानंतर माध्यमांशी बोलताना ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष भाजपवर हल्लाबोल केलाय. सोमरवारी (5 जुलै) भाजपने अधिवेशनात जो गोंधळ गेला त्यामुळे राज्याची मान शरमेनं खाली आली. या गोंधळातून भाजपच्या मनातील ओबीसींबद्दलचा द्वेष उफाळून आला, असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच जी माहिती पंतप्रधान मोदींची भेट घेऊन मागितली ती अधिकृत ठराव करुन मागितली. यात चुक काय? असाही सवाल त्यांनी केला (CM Uddhav Thackeray allege that BJP hate OBC).

उद्धव ठाकरे म्हणाले, “विरोधी पक्षाने सोमवारी (5 जुलै) केलेलं वर्तन राज्याची मान शरमेने खाली नेणारं होतं. याला कारण काय होतं तर ओबीसी समाजासाठी जे राजकीय आरक्षण आणलं गेलं त्याबद्दलची माहिती केंद्र सरकारकडे मागितली. ही माहिती मागणं हा गुन्हा आहे का? मी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यासोबत पंतप्रधान मोदींना भेटायला गेलो होतो. आम्ही त्यांना भेटून या माहितीची मागणी केली. राज्यपालांनाही पत्र देऊन मागणी केलीय. भाजपला ती माहिती निरुपयोगी वाटत होती तरी त्यांनी सरकारला वाटतंय तर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर एकजुट दाखवत पाठिंबा द्यायला हवा होता. पण या गोंधळातून भाजपच्या मनातील ओबीसी समाजाबद्दलचा द्वेष उफाळून वर आला.”

“अधिकृत मागणी करुनही राज्य सरकारला जी माहिती मिळत नाही ती विरोधी पक्षनेत्यांना कधी आणि कुणी दिली?”

“आम्ही जी माहिती पंतप्रधान मोदींना भेटून मागितली होती, तीच माहिती अधिवेशनात अधिकृतपणे ठरावाच्या माध्यमातून केली. यात चूक काय? छगन भुजबळांनी ती माहिती कुणीकुणी कशीकशी मागितली त्याचा घटनाक्रम सांगितला. ती माहिती अद्यापही मिळालेली नाही. यावर विरोध पक्षनेत्यांनी या माहितीत 8 कोटी चुका आणि राज्यात 70-75 लाख चुका असल्याचं म्हटलं. मग हा इतका चुकीचा डेटा केंद्र सरकार का जोपासत आहे. त्यांनी सांगून टाकावं की यात चुका झाल्या आहेत. ते केंद्र सरकारने सांगितलं पाहिजे. पण सरकार म्हणून आम्ही अधिकृत मागणी करुनही राज्य सरकारला जी माहिती मिळत नाही ती विरोधी पक्षनेत्यांना कधी आणि कुणी दिली? याचा खुलासा व्हायला पाहिजे,” अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

हेही वाचा :

8 कोटी चुका आहे, मग ही माहिती पंतप्रधानांच्या योजनेसाठी कशी वापरता? : उद्धव ठाकरे

परिस्थिती निवळल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊ : उद्धव ठाकरे

पदोन्नतीसह मुस्लिम आरक्षणासाठी आठवलेंचा एल्गार, उद्या आझाद मैदानात रिपाइंचं आंदोलन

व्हिडीओ पाहा :

CM Uddhav Thackeray allege that BJP hate OBC

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.