AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Rane | 8 जूनला पांचोलीच्या जुहूच्या घरी लहान मुलं का आणलेली? नितेश राणेंचा आदित्य ठाकरे यांना सवाल

Nitesh Rane | "उद्धव ठाकरे यांचे कपडे कसे फाडायचे हे आम्हाला चांगल माहितीय. जया जाधवला का मारलं? मातोश्रीत काय चुकीच्या गोष्टी चालतात हे आम्हाला माहितीय. हे सर्व पुराव्यासकट महाराष्ट्रासमोर आणू"

Nitesh Rane | 8 जूनला पांचोलीच्या जुहूच्या घरी लहान मुलं का आणलेली? नितेश राणेंचा आदित्य ठाकरे यांना सवाल
Nitesh Rane-Aditya Thackeray
| Updated on: Jul 11, 2023 | 11:09 AM
Share

मुंबई : “मोठ्या संस्काराबद्दल बोलतोस, तुझा तो मुलगा ठाकरे नावावर कलंक आहे. दिशा सालियानला कसं मारलं?. हा दिशा सालियन फक्त याच विषयाला घाबरत नाही. 8 जूनला पांचोलीच्या जुहूच्या घरी लहान मुलं का आणलेली? याचं उत्तर आदित्य ठाकरेंनी द्यावं. लहान मुलं आणि आदित्य ठाकरे यांचा काय संबंध? कुठल्या NGO च्या माध्यमातून मुलं तिथे आलेली?” असे प्रश्न भाजपा आमदार नितेश राणे यांनी विचारले आहेत.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल विदर्भातील एका सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस हे नागपूरला कलंक असल्याच विधान केलं होतं. त्याचा समाचार नितेश राणे यांनी आज घेतला.

‘कलंक लावण्याच काम आदित्य ठाकरेंनी केलं’

नितेश राणे यांनी खूप बोचऱ्या शब्दांचा वापर केला. “बाळासाहेबांनी ठाकरे नाव मोठं केलं. प्रबोधनकार ठाकरेंपासून राज ठाकरेंपर्यंत ठाकरे नाव मोठं केलं. त्याला कलंक लावण्याच काम आदित्य ठाकरे यांनी केलं” अशी टीका नितेश राणे यांनी केली.

‘आदू बाळ लवकर आर्थररोड तरुंगात जाणार’

“आज तुझा जो थयथयाट सुरु आहे. तू घाबरतोयस, फडणवीसांना नाव ठेवत आहेस, तुला माहितीय आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार आहे. भ्रष्टाचार, दिशा सालियान प्रकरणाचे पुरावे आदित्य ठाकरेपर्यंत पोहोचतायत. आदू बाळ लवकर आर्थररोड तरुंगात जाणार आहे” असं नितेश राणे म्हणाले. जया जाधवला का मारलं?

“कोविडमध्ये ज्या-ज्या लोकांची चौकशी झाली, त्यांनी चौकशीत आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं आहे. हे उद्धव ठाकरे यांना माहित आहे” असं नितेश राणे म्हणाले. “यापुढे देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीची टीका केलीस, तर उद्धव ठाकरे यांचे कपडे कसे फाडायचे हे आम्हाला चांगल माहितीय. जया जाधवला का मारलं? मातोश्रीत काय चुकीच्या गोष्टी चालतात हे आम्हाला माहितीय. हे सर्व पुराव्यासकट महाराष्ट्रासमोर आणू” असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.