AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी BJPने दोन नावं दिल्लीला पाठवली, पण पसंती सत्यजीत कदमांना

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दोन नावं दिल्लीला पाठवण्यात आल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. दिल्लीला नाव पाठवत असताना दोन नाव पाठवायचे असतात. यातून कुठलं नाव घ्यावं असं आम्हाला वाटतं असं कळवायचं असतं.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी BJPने दोन नावं दिल्लीला पाठवली, पण पसंती सत्यजीत कदमांना
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी BJPने दोन नावं दिल्लीला पाठवलीImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 18, 2022 | 2:10 PM
Share

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दोन नावं दिल्लीला पाठवण्यात आल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी सांगितलं. दिल्लीला नाव पाठवत असताना दोन नाव पाठवायचे असतात. यातून कुठलं नाव घ्यावं असं आम्हाला वाटतं असं कळवायचं असतं. पण निर्णय दिल्लीला करायचा असतो. दहा नाव पाठवायची नसतात. दोनच नावं पाठवायची असतात. दिल्ली त्यावर विचारते तुम्हाला कोणतं नाव हवंय. पण निर्णय दिल्लीचे नेतेच करतात. त्यामुळे निर्णय झाला नाही. निर्णय रात्री होणाऱ्या पार्लमेंट्री बोर्डात होईल. सत्यजित कदम (styajit kadam) आणि महेश जाधव (mahesh jadhav) यांचं नाव पाठवलं आहे. सत्यजीत कदम यांचं नाव फायनल व्हावं असं आमचं म्हणणं आहे. त्यावर आमचं एकमत झालं आहे. पण निर्णय रात्री दिल्लीच्या पार्लमेंटरी बोर्डात त्यावर निर्णय होईल, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी गप्पा मारल्या. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून पाटील यांनी आघाडी सरकारवर टीका केली. मलिकांचा मंत्रिमंडळात ठेवणं हा अट्टाहास आहे. लोकशाहीची थट्टा आहे. मलिकांचा राजीनामा घेत नाहीत. मग अनिल देशमुख आणि राठोड यांचा राजीनामा कसा घेतला? विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, अशी टीका पाटील यांनी केली.

डोक्यात सत्तेची हवा

भाजपला सत्तेत येऊ देणार नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. युद्ध सुरू होईल तेव्हा बघू. गरजेल तो पडेल काय? भाजपकडून काही तरी शिका असा सल्ला त्यांनी आमदारांना दिला आहे. म्हणजे भाजपकडून काही शिकण्यासारखे आहे हे पवारांनी सुद्धा मान्य केलं आहे, असं ते म्हणाले. आरोप प्रत्यारोप मिटवण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेतला पाहिजे. अपघाताने सत्ता येऊन देखील त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

तर शेट्टींचं भाजपमध्ये स्वागतच

भाजपची काही ध्येय धोरणं राजू शेट्टींना पटली नव्हती. त्यावर चर्चा करू. पण मोदींवर टीका करू नका अशी विनंती आम्ही त्यांना केली होती. पण ते बाहेर पडले. महाविकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी महाविकास आघाडी सोडली आणि भाजपसोबत येण्याचा विचार केला तर आम्ही त्यांचं स्वागत करू, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

संजय राऊतांवर बोलायचं नाही, त्यांना लई मोठं केलं; Chandrakant Patil यांचा टोला

महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी अडीच वर्षे थांबावे लागेल, भुजबळांचा Fadnavis यांना टोला

Holi Festival : “महापालिका निवडणुकीत आम्ही आमचे रंग दाखवू!”, एकनाथ शिंदेंचा होळीच्या दिवशी एल्गार

Follow Us
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....
पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने...
पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने....
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं.
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक......
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक.......
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP...
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP....
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ.
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!.
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत.
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो.
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे...
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे....