AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी BJPने दोन नावं दिल्लीला पाठवली, पण पसंती सत्यजीत कदमांना

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दोन नावं दिल्लीला पाठवण्यात आल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. दिल्लीला नाव पाठवत असताना दोन नाव पाठवायचे असतात. यातून कुठलं नाव घ्यावं असं आम्हाला वाटतं असं कळवायचं असतं.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी BJPने दोन नावं दिल्लीला पाठवली, पण पसंती सत्यजीत कदमांना
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी BJPने दोन नावं दिल्लीला पाठवलीImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 18, 2022 | 2:10 PM
Share

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दोन नावं दिल्लीला पाठवण्यात आल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी सांगितलं. दिल्लीला नाव पाठवत असताना दोन नाव पाठवायचे असतात. यातून कुठलं नाव घ्यावं असं आम्हाला वाटतं असं कळवायचं असतं. पण निर्णय दिल्लीला करायचा असतो. दहा नाव पाठवायची नसतात. दोनच नावं पाठवायची असतात. दिल्ली त्यावर विचारते तुम्हाला कोणतं नाव हवंय. पण निर्णय दिल्लीचे नेतेच करतात. त्यामुळे निर्णय झाला नाही. निर्णय रात्री होणाऱ्या पार्लमेंट्री बोर्डात होईल. सत्यजित कदम (styajit kadam) आणि महेश जाधव (mahesh jadhav) यांचं नाव पाठवलं आहे. सत्यजीत कदम यांचं नाव फायनल व्हावं असं आमचं म्हणणं आहे. त्यावर आमचं एकमत झालं आहे. पण निर्णय रात्री दिल्लीच्या पार्लमेंटरी बोर्डात त्यावर निर्णय होईल, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी गप्पा मारल्या. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून पाटील यांनी आघाडी सरकारवर टीका केली. मलिकांचा मंत्रिमंडळात ठेवणं हा अट्टाहास आहे. लोकशाहीची थट्टा आहे. मलिकांचा राजीनामा घेत नाहीत. मग अनिल देशमुख आणि राठोड यांचा राजीनामा कसा घेतला? विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, अशी टीका पाटील यांनी केली.

डोक्यात सत्तेची हवा

भाजपला सत्तेत येऊ देणार नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. युद्ध सुरू होईल तेव्हा बघू. गरजेल तो पडेल काय? भाजपकडून काही तरी शिका असा सल्ला त्यांनी आमदारांना दिला आहे. म्हणजे भाजपकडून काही शिकण्यासारखे आहे हे पवारांनी सुद्धा मान्य केलं आहे, असं ते म्हणाले. आरोप प्रत्यारोप मिटवण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेतला पाहिजे. अपघाताने सत्ता येऊन देखील त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

तर शेट्टींचं भाजपमध्ये स्वागतच

भाजपची काही ध्येय धोरणं राजू शेट्टींना पटली नव्हती. त्यावर चर्चा करू. पण मोदींवर टीका करू नका अशी विनंती आम्ही त्यांना केली होती. पण ते बाहेर पडले. महाविकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी महाविकास आघाडी सोडली आणि भाजपसोबत येण्याचा विचार केला तर आम्ही त्यांचं स्वागत करू, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

संजय राऊतांवर बोलायचं नाही, त्यांना लई मोठं केलं; Chandrakant Patil यांचा टोला

महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी अडीच वर्षे थांबावे लागेल, भुजबळांचा Fadnavis यांना टोला

Holi Festival : “महापालिका निवडणुकीत आम्ही आमचे रंग दाखवू!”, एकनाथ शिंदेंचा होळीच्या दिवशी एल्गार

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.