AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चर्चा तर होणारच: विधिमंडळात घमासान; सभागृहाबाहेर दोस्ती, नार्वेकर-शेलारांचे काय रंगले गुफ्तगू?

नार्वेकर आणि शेलार यांच्यामध्ये काही साटेलोटे झाले असेल का, ते माहिती नाही. काही राजकीय खेळीवर मंथन. कारण येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्यात शेलार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने काही बोलणी झाली असेल का, काहीही असू शकते. मात्र...

चर्चा तर होणारच: विधिमंडळात घमासान; सभागृहाबाहेर दोस्ती, नार्वेकर-शेलारांचे काय रंगले गुफ्तगू?
विधिमंडळाबाहेर मिलिंद नार्वेकर आणि आशिष शेलार यांची चर्चा रंगली.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Mar 03, 2022 | 3:00 PM
Share

मुंबईः भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) या दोन्ही पक्षांमध्ये रंगलेला कलगीतुरा उभा महाराष्ट्र पाहतोय. किरीट सोमय्यांनी केलेले आरोप. या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट मातोश्री बाहेर पत्रकार परिषद घेऊन दिलेले उत्तर. त्यानंतर रंगलेली खडाजंगी. या दोन्ही पक्षाचे मुख्य नेते आपल्याकडे समोरच्याची कुंडली आहेत, असा दावा करतायत. भाजपचे नेते म्हणतात हे मंत्री तुरुंगात जाणार असे म्हणतात. तर शिवसेनेचे नेते, भाजपचे पिता-पुत्र जेलची हवा खाणार म्हणतात. या पार्श्वभूमीवर दुसरीकडे आज गुरुवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाबाहेर भाजप आणि सभागृहाच्या आत महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झालेले पाहायला मिळाले. मात्र, विधिमंडळाच्या बाहेर भाजप नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्यात अशी काही चर्चा रंगली की, कोणालाही वाटेल, हे राजकीय आरोप-प्रत्यारोप केवळ नाटक आहे. खरेच तसे तर नाही ना?

काय झाली चर्चा?

विधिमंडळाच्या बाहेर शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यात चांगलीच चर्चा रंगली. दोघे गंभीरपणे, तर कधी एकदम रिलॅक्स होऊन चर्चा करताना दिसले. त्यांच्या गप्पा सुरू असताना अनेक जण त्यांच्या सभोवताली घुटमळत होते. तिथे उपस्थितांनाही त्यांच्या या चर्चेने आश्चर्याचा धक्का बसला नसला, तर नवलच म्हणावे लागेल. मात्र, हे नवल घडले. ते माध्यमांच्या कॅमेऱ्यानेही आपसुक टिपले. खरेच ही चर्चा कोणाला खिंडीत गाठायचे आणि कोणाला सोडायचे यासाठी होती की, पुढील काही खासगी नियोजन. काहीही असो. चर्चा रंगली.

काही साटेलोटे झाले का?

नार्वेकर आणि शेलार यांच्यामध्ये काही साटेलोटे झाले असेल का, ते माहिती नाही. काही राजकीय खेळीवर मंथन. कारण येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्यात शेलार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने काही बोलणी झाली असेल का, काहीही असू शकते. मात्र, भाजप नेते नारायण राणे ज्यांना लक्ष करतात त्या नार्वेकरांसोबत शेलारांची रंगलेली चर्चा आजच्या दिवसाचे आकर्षण ठरली. यातून काही फलित निघते का, हे काळच सांगेल.

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली