AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2026 Result : ठाकरे बंधुंना मुंबईकरांनी का नाकारलं? बावनकुळेंनी दिलं एका वाक्यात उत्तर

BMC Election Result : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा विजय होताना पहायला मिळत आहे. अशातच आता भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या या विजयावर आणि मुंबईतील ठाकरे बंधुंच्या पराभवावर भाष्य केले आहे.

BMC Election 2026 Result : ठाकरे बंधुंना मुंबईकरांनी का नाकारलं? बावनकुळेंनी दिलं एका वाक्यात उत्तर
Thackeray lost in BMCImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 16, 2026 | 3:07 PM
Share

राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीत भाजपने शानदार कामगिरी केली आहे. बहुतांशी महापालिकांवर भाजपचे वर्चस्व पहायला मिळत आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा विजय होताना पहायला मिळत आहे. अशातच आता भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या या विजयावर आणि मुंबईतील ठाकरे बंधुंच्या पराभवावर भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

महायुतीला दोन तृतियांश बहुमत मिळणार

भाजपच्या विजयाबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, ‘डबल इंजिन सरकार म्हणजे मोदीजींचं सरकार, देवेंद्रजींचे सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकते, विकसित महाराष्ट्र बनवू शकतं, ग्रामीण भागातूनही असाच निकाल मागच्या वेळी आला होता. मला असं वाटतं की हे मत विश्वासाचं मत आहे, विकासाचं मत आहे. सध्या हाती आलेला कल आता असाच सुरू राहील आणि महायुती दोन तृतियांश बहुमताने आणि 51 टक्के नगरसेवकांसह भाजप विजय मिळवले असं मला वाटतं.

मुंबईत ठाकरेंना मतदारांनी का नाकारलं ?

मुंबईत ठाकरेंना मतदारांनी का नाकारलं यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, ‘या पराभवाचं एकच कारण आहे. या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाचं व्हिजन,एकनाथ शिंदे आणि भाजपाची महायुती आणि डबल इंजिन सरकारवर सरकारने विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांचा पराभव झाला.’ दरम्यान या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती केली होती. शरद पवारांची राष्ट्रवादीही त्यांच्यासोबत होती. मात्र या आघाडीला आता मुंबईकरांनी नाकारल्याचे समोर आले आहे.

मुंबईकरांची महायुतीला साथ

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सरशी पहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेनेने 130 जागांवर आघाडी घेतली आहे. यातील काही उमेदवार विजयी झाले आहेत. तर ठाकरे बंधू हे 71 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेत भाजपचा महापौर बसण्याची शक्यता आहे. तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्येही भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. कल्याण डोंबिवलीतही भाजप आणि शिवसेना आघाडीवर आहे. तर नाशिकमध्येही भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता राज्यातील बहुतांशी महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकताना दिसणार आहे.

Follow Us
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे  पुण्यात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांनी अवैध दारू अड्ड्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. शहरात कुठेही अवैध मद्यविक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यास तातडीने कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. अवैध दारू विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात विशेष पथक तयार करण्यात आले आहे.  यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दारू अड्ड्यांना माल पुरवणारे, वाहतूक करणारे आणि आर्थिक मदत करणाऱ्यांवरही पोलिसांचा फोकस असणार आहे.  पुण्यातील विविध भागांमध्ये पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली असून संशयित ठिकाणांची झडती घेतली जात आहे. अनेक अवैध अड्ड्यांची माहिती पोलिसांकडे जमा होत असून लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. नागरिकांनीही अवैध दारू विक्रीची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
तिकडे नोटीस आली, इकडे उमेदवारी अर्ज मागे, शिवसेनेच्या उमेदवाराने...
धक्कादायक! तिकडे नोटीस आली, इकडे उमेदवारी अर्ज मागे, शिवसेनेच्या उमेदवाराने...संभाजीनगरात हाय वोल्टेज ड्रामा!