AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीएमसी निवडणूक : मुंबईकर म्हणतायत भाजपा सर्वात पुढे, ठाकरे गटाचे काय? राज-उद्धव एकत्र आले तर काय ?

येऊ घातलेल्या निवडणूकीत मुंबई महानगर महापालिकेत कोणाला सत्ता मिळणार याबद्दल मुंबईकरांची मते एका सर्वेक्षणात घेण्यात आली आहेत. त्यातून मनोरंजक वेगळी उत्तरे मुंबईकरांनी दिली आहे.

बीएमसी निवडणूक : मुंबईकर म्हणतायत भाजपा सर्वात पुढे, ठाकरे गटाचे काय? राज-उद्धव एकत्र आले तर काय ?
bmc building
| Updated on: Jun 07, 2025 | 9:29 PM
Share

मुंबईतील आगामी बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनमताचा आढावा घेणारे सर्वेक्षण विकली वाईबने केले आहे. या सर्व्हेक्षणातील आकडेवारी मनोरंजक आहे. येऊ घातलेल्या मुंबई महानगर महापालिका निवडणूकांत सत्ता मिळवण्याच्या शर्यतीत भाजपा सर्वात आघाडीवर आहे. तर शिवसेनेत फूट पडून देखील उद्धव ठाकरे यांचा करिष्मा अजूनही कायम असल्याचे आकडेवारी या सर्वेक्षणात पुढे आली आहे. नगरसेवक आणि प्रशासक दोन्हींच्या प्रगती पुस्तकावर मुंबईकरांनी लाल शेरे मारलेले आहेत आणि महत्वाचे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालविण्यासाठी उद्धव आणि राज एकत्र आले तर त्यांना मुंबईकरांचा मोठा पाठिंबा या सर्वेक्षणातून मिळाला आहे.

२८.९ टक्के मुंबईकर असमाधानी

या सर्वेक्षणात तुमच्या स्थानिक नगरसेवकाच्या कामगिरीवर खुश आहात काय ? अशा विचारलेल्या प्रश्नावर तब्बल २८.९ टक्के मुंबईकरांनी संपूर्ण असमाधानी असे म्हटले आहे. तर २०.९ टक्के मुंबईकरांनी नगरसेवकांची कामगिरी संपूर्ण समाधानी असल्याचे म्हटले आहे. १८.७ समाधानीही नाही आणि असमाधानीही नाही असे म्हटले आहे. तर १२.२ टक्के मुंबईकरांनी सांगू शकत नाही असे म्हटेल आहे. वयोगटाचा विचार करता १८-२४ वयोगटातील ३९ टक्के तरुणांनी स्थानिक नगरसेवकांची कामगिरी समाधानकारक असे म्हटले आहे.तर नगरसेवकांची कामगिरी असमाधानकारक असल्याचे २५-३४ वयोगटातील ३६ टक्के तरुणांनी म्हटले आहे.

२०.० टक्के मुंबईकर म्हणतायत प्रशासकीय राजवट वाईट

मुंबई महापालिकेचा शिवसेनेचा महापौर असतानाच्या साल २०१७ ते २०२२ च्या काळाच्या तुलनेत आताची एनडीएची प्रशासकीय राजवट कशी आहे का ? या प्रश्नाला २०.० टक्के मुंबईकरांनी सर्वात वाईट असे म्हटले आहे. तर १९.९ टक्के मुंबईकरांनी बऱ्याच प्रमाणात चांगली म्हटले आहे. तर १७.१ टक्के मुंबईकरांनी सारखीच असल्याचे म्हटले आहे. पालिकेतील एनडीएची प्रशासकीय राजवट आधीपेक्षा चांगली म्हणणाऱ्यात ४३ टक्के पुरुष तर ३२ टक्के महिला आहेत. वाईट म्हणणाऱ्यात पुरुष आणि महिलांचे प्रमाण ३६ टक्के असे समान आहे. वयोगटाचा विचार करता आताची प्रशासकीय राजवट आधीपेक्षा उत्तम असल्याचे ५५ वयोगटाच्या पुढील ५० टक्के नागरिकांनी म्हटले आहे.

३ ) जर बीएमसीच्या निवडणूका सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे लढल्या कोणाला पाठींबा  ?

या प्रश्नावर ३१.० टक्के लोकांनी भाजपाला पाठींबा दिला. तर २३.९ टक्के लोकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठिंबा देणार असे म्हटले आहे. तर एकनाथ शिंदे यांना ६.३ टक्के लोकांना पाठींबा दर्शवला आहे. तर मनसेला ११.२ टक्के लोकांनी पाठींबा दिला आहे.

४ ) मुंबईकरांना कोणती समस्या अधिक महत्वाची वाटतोय ?

अनुक्रमे रस्त्यावरील खड्डे – १९.५ टक्के, पाणी तुंबणे – १४.३ टक्के, वाहतूक समस्या – १०.६ टक्के, अपुरी शौचालय – १६.१ टक्के, पिण्याची पाणी – ११.१ टक्के, झोपडपट्टी – ४.७ टक्के, इतर -९.६ टक्के, सांगू शकत नाही – १४.३ टक्के अशी प्रतिक्रीया दिली आहे.

५ )  बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर पाठींबा द्याल का?

या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला – २६.२ टक्के, राज आणि उद्धव ठाकरे युती – ५२.१ टक्के, काही सांगू शकत नाही असे २१.८ टक्के लोकांनी म्हटले.

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?