
आज बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जयंती आहे. तर दुसरीकडे महापौर पदाची सोडत निघाल्यानंतर मुंबईचा महापौर कोण होणार याची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसे-शिंदे युतीवरुन खटके उडाले आहेत. संजय राऊत यांनी याप्रकारावर थेट नाराजी व्यक्त केली आहे. तर पालिका निकालानंतर आज ठाकरे बंधु आज पहिल्यांदाच एकत्र येणार आहे. तर राज्यातील विविध महापालिकेत दावेदारांनी फिल्डिंग लावली आहे. महापौर पदाचे आरक्षण सोडत निघाल्यानंतर काही ठिकाणी दावेदारांची संख्या वाढली आहे. अकोल्यासह चंद्रपूर आणि इतर ठिकाणी बिगर भाजप महापौर बसवण्यासाठी अनेक पक्षांनी एकत्र येण्याचा राज्यात प्रयोग होत आहे.
बदलापूरमधील शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हेमंत चतुरे मारहाण प्रकरण
भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष बंटी म्हसकर यांना अटक
बंटी म्हसकर हे भाजप नगरसेविका हेमांगी म्हसकर यांचे पती
जळगावात दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीत तफावत, जिल्हा परिषदेच्या आणखी ६ कर्मचाऱ्यांवर कारवाई
दिव्यांग तपासणीत तफावत आढळून आल्याने आतापर्यंत निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या १९ वर
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्याकडून सुरू आहे कारवाई
आतापर्यंत कारवाई झालेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये लेखा, शिक्षण विभाग तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश
चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग
जनविकास सेना आणि एमआयएमकडून 4 नगरसेवकांच्या ‘महानगर आघाडी’ गटाची नोंदणी
नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आली नोंदणी
या गटामध्ये जनविकास सेनेचे 3 तर एमआयएमच्या एका नगरसेवकाचा समावेश
जनविकास सेनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांची गटनेते पदी निवड
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील गहूंजे परिसरात भीषण अपघात
मर्सिडीज कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दिली जोरदार धडक
अपघातात कारमधील चार जण गंभीर जखमी
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांची तात्काळ घटनास्थळी धाव
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल
गंगापूर तालुक्यातील अंबेलोहळ परिसरात गोवंश तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोरक्षक तरुणांवर हल्ला आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोवंश वाहतूक होत असल्याची माहिती डायल 112 वर दिल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ला करणाऱ्या पैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील कवलेवाडा ग्रामपंचायतीने पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासह आमदार, खासदार हे लापता असल्याचा फतवा काढला असून जो कोणी त्यांना शोधून देईल त्यांना योग्य तो सन्मान देण्यात येईल अशी घोषणा केली आहे. ग्रामपंचायतच्या हद्दीतील स्मशानभूमी व इतर विकास कामांची अनेक वर्षांपासून मागणी होत आहे मात्र प्रशासन व राजकीय पुढारी याकडे लक्ष देत नसल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी उपोषण करत पालकमंत्री आमदार खासदार हे लापता झाल्याचे पोस्टर लावलेले आहेत.
चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या गट नोंदणीची प्रक्रिया पुढे ढकलण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या गटनेतापदाबाबत एकमत न झाल्यामुळे नोंदणी अडली आहे. विजय वडेट्टीवार यांच्याकडून गटनेता पदासाठी वसंत देशमुख यांचं नाव देण्यात आले होते. मात्र प्रतिभा धानोरकर यांचा देशमुख यांच्या नावाला विरोध आहे. तर धानोरकर यांच्याकडून देण्यात आलेल्या सुरेंद्र अडबाले यांच्या नावाला वडेट्टीवारांचा विरोध असल्याचे आता समोर आले आहे.
महाड नगरपरिषद राड्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हनुमंत जगताप, माजी आमदार माणिक जगताप यांचा मुलगा श्रेयश जगताप, धनंजय देशमुख, निलेश महाडिक आणि जगदीश पवार हे पाचही आरोपी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात शरण आले आहेत. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आरोपींनी थेट महाड पोलिसां समोर हजेरी लावली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
परळी नगरपरिषदेला प्रशासनाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा विसर पडला आहे. त्यामुळे शिवसेनेने नगरपालिका कार्यालयात घोषणाबाजी करत केला निषेध व्यक्त केला.
शिवसेनेकडून यावेळी संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी करण्यात आली.
पंचायत समिती निवडणुकीत ठाकरे गटाला कणकवली तालुक्यातून दुसरा धक्का बसला आहे. वरवडे पंचायत समितीमधून भाजपाचे सोनू सावंत बिनविरोध निवडून आले आहेत. ठाकरे गटाच्या सुधीर सावंत आणि मनसेचे शांताराम साद्ये यांनी माघार घेतली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे तिसरा उमेदवार बिनविरोध निवडून आलाय.
बीडच्या नाथापुरमध्ये रात्री उशिरा जुन्या वादातून दोन गट आमनेसामने आले होते. यामध्ये एकमेकांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दोन्ही बाजूचे लोक जखमी झाले. त्यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीच्या घटनेनंतर काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान गावात सध्या शांतता आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलिसांनी केली आहे.
जालना जिल्ह्यातल्या जवळपास 475 ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात संपत आहे. मात्र अशातच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा पेच कायम असल्याने आणि परीक्षांचा हंगाम पाहता या ग्रामपंचायतींच्या निवडणुका चार महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गावांचा कारभार आता प्रशासकांच्या हाती जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. फेब्रुवारी महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक मोठ्या लोकसंख्येच्या गावांचा समावेश आहे. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी निवडणुका होणे अपेक्षित आहे. मात्र या निवडणुकीवर आता दहावी-बारावीच्या परीक्षेचे विघ्न आल्यामुळे इच्छुकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जळगावातील पाचोऱ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचं प्रकरण उघड झालं आहे. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोघांना अटक केली असून एक जण फरार आहे.
तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यात स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. रोहित पाटलांकडून जिल्हा परिषद निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी आतापासून डावपेच सुरू झाले आहे.
77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली-गाझियाबाद-मेरठ कॉरिडॉरवरील सर्व नमो भारत स्थानकांवर सुरक्षा तपासणी कडक करण्यात आली आहे. न्यू अशोक नगर आणि आनंद विहार नमो भारत स्थानकांवरील पार्किंग सुविधा 25 जानेवारी रोजी दुपारी 2 ते 26 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहतील.
व्यवहारादरम्यान रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 91.99 या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून सतत होत असलेली विक्री आणि जागतिक स्तरावर वाढत्या व्यापार तणावामुळे रुपयातील ही घसरण दिसून येत आहे.
केरळमध्ये पंतप्रधान म्हणाले की, आज केरळच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांना नवी गती मिळाली आहे. केरळमध्ये रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत झाली आहे. तिरुवनंतपुरमला देशातील एक प्रमुख स्टार्टअप हब बनवण्यासाठी एक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आज, संपूर्ण देशासाठी केरळमधून गरिबांच्या कल्याणाशी संबंधित एक प्रमुख उपक्रम सुरू करण्यात येत आहे. पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड सुरू करण्यात आले आहे. याचा फायदा देशभरातील रस्त्यावरील विक्रेते आणि पदपथावरील कामगारांना होईल.
आरोग्य आपल्या दारी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करू. या अभियानाअंतर्गत घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली जाईल. पुढील आठवड्यापासून प्लास्टिकमुक्त गडकिल्ले अभियान सुरू होणार आहे. पालिकेच्या माध्यमातून नागरी लोककल्याण अभियान राबवणार आहोत. महापालिका क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट शाळांना बक्षीस देणार, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
बदलापूर प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. तपास अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. अशा घटना घडू नये यासाठी सतर्क राहतोय, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली. बदलापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला.
मराठी माणसाच्या सन्मानासाठी शिवसेनेची स्थापना झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना NDA मध्ये तिसरा पक्ष ठरला आहे. बाळासाहेब ठाकरे हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठे करणारे नेते होते. बाळासाहेब ठाकरेंच्या जनशताब्दीनिमित्त उपक्रमांची घोषणा करतोय. बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी अभियान सुरू करतोय, अशी माहिती शिंदेंनी दिली.
पालिका निवडणुकीतही शिवसेना भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला आहे. राज्यातील निवडणुकांमध्ये शिवसेना दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरला आहे. शिवसेना सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष हे सिद्ध झालं. चांदा ते बांदा.. शिवसेना घराघरात पोहोचली आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
नागपुरात रात्री दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत दोन हत्येच्या घटना घडल्या आहेत. अजनी पोलीस स्टेशन हद्दीत अलंकार नगर मानेवाडा परिसरात योगेश काकडे नामक युवकाची हत्या करण्यात आली. यात आरोपी मयंक नितीन धबेकर असून तो फक्त 17 वर्षांचा आहे. अजनी परिसरात घडलेली हत्या ही जुन्या वादातून एकमेकांना धमकी देत असताना घडली. आरोपीने धारदार शस्त्राने वार करत ही हत्या केली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरी घटना गिट्टीखदान पोलीस स्टेशन हद्दीत घडली.
हवा प्रदूषणावरून हायकोर्टाने पालिका आयुक्तांवर ताशेरे ओढले आहेत. नवी मुंबई पालिका आयुक्तांचा पगार कोर्टाने थांबवला आहे. तर मुंबई पालिका आयुक्तांचा पगार का थांबवू नये, असा सवाल कोर्टाने केला आहे. मुंबई आणि नवी मुंबई महापालिका आयुक्तांवर हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. 3 तासांत AQI ची आकडेवारी देण्याचे निर्देश कोर्टाने मुंबई मनपाला दिले आहेत.
नाशिकमध्ये आज एअर शोचा दुसरा दिवस आहे. नाशिक जिल्हा प्रशासन आणि हवाई दलाच्या माध्यमातून एअर शो आयोजित करण्यात आला आहे. नाशिकमध्ये आयोजित एअर शो हा भारतातला दुसरा एअर शो आहे.
बदलापुरात विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरण. बालहक्क आयोगाच्या सचिवांनी घेतली शिक्षण विभाग आणि पोलिसांसोबत आढावा बैठक. सदर पीडित मुलगी ही प्री स्कूल मध्ये शिकत होती. प्री स्कूल हे शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येत नाहीत.
बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर नसेल याचं दु:ख. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला पाहिजे. मुंबईवर शिवसेनेचाच झेंडा फडकला पाहिजे अशी भूमिका भास्कर जाधव यांनी मांडली.
बाळासाहेबांची भूमिका नेहमी मराठी माणसांच्या हिताची असायची. बाळासाहेबांनी इतर धर्मीय आणि भाषिकांचा द्वेष केला नाही. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन दर्शन घेतलं. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झालीय.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील विठ्ठल सभागृहात फुलांनी सजवलेल्या मयूर विधिमंडपात श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या शाही विवाह सोहळ्याला सुरुवात झाली आहे.
ठाण्यातील महापौर पदाच्या दावेदार विमल भोईर आणि दर्शना जानकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. काल रात्री किसन नगर येथील गणपतीची आरती झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत दोघींची भेट झाली . ठाण्याच्या महापौर पदी अनुसूचित जातीचे आरक्षण पडल्याने 5 ते 6 नगरसेवक महापौर पदाच्या शर्यतीत आहेत. या दोघींनी काल एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने, त्यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार की तिसऱ्याच कोणाला महापौर केले जाणार याची सर्वांना उत्सुकता आहे.
नाशिक – एकीकडे महापौर साठी भाजपा रस्सीखेच सुरू असताना शिवसेनेत मात्र संभ्रम कायम आहे. भाजपसोबत सत्तेत जायचं की विरोधी बाकावर बसायचं यावर अद्याप निर्णय नाही. यासंदर्भात शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे निर्णय घेतील अशी माहिती शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी दिली. येत्या दोन दिवसात आम्ही गट नोंदणी करू, काही तांत्रिक मुद्द्यांमुळे गटाची नोंद करण्यासाठी उशीर झाला असं त्यांनी नमूद केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा यांचा पुतण्या हरीश दरोडा यांचा मृत्यू झाला आहे. भात खरेदी घोटाळाप्रकरणी हरीश हे तुरूंगात होते. तेथेच त्यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
दावोस येथील गुंतवणुकीवरून अंबादास दानवे यांनी एक्स ( पूर्वीचं ट्विटर) वर पोस्ट करत टीका केली आहे. स्वदेशी गुंतवणूक, विदेशी पॅकेजिंग आणि दावोस फिक्सिंग असं ते म्हणाले आहेत.
स्वदेशी गुंतवणूक, विदेशी पॅकेजिंग आणि दावोसचं ‘फिक्सिंग’! 🌍✈️
अल्टा कॅपिटल, पंचशील, लोढा, रहेजा, सुरजागड इसपात… या कंपन्यांची मुख्यालयं पुणे, मुंबई, गडचिरोलीत! मग यांच्याशी करार करायला स्वित्झर्लंडला जाण्याचं प्रयोजन काय?
🚩 मुद्दे साधे आहेत:
1️⃣ आपल्याच माणसांना विमानात…— Ambadas Danve (@iambadasdanve) January 23, 2026
बीड – संतोष देशमुख खून प्रकरणाची सुनावणी संपली, 7 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. लॅपटॉप मधील डेटा कॉपीज मिळाल्या नाहीत त्या द्याव्यात अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी केली. सरकारी पक्षाने लॅपटॉप मधील डेटा मिळण्यासाठी पंधरा दिवसांचा वेळ लागेल असे सांगितले. गेल्या तीन तारखांपासुन लॅपटॉप डेटा कॉपीज दिल्या जात नसल्याने वारंवार तोच मुद्दा उपस्थित होत आहे.
महाड नगरपालिका निवडणूक राड्या प्रकरणातील आरोपी मंत्री पुत्र विकास गोगावले यांनी अखेर महाड शहर पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठरलेल्या वेळेतच विकास गोगावले पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. त्यांच्या शरणागतीनंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणावर आता राजकीय वर्तुळासह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष केंद्रित झालं आहे.
वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडीची प्रतीक्षा आता संपली असून, येत्या ३० किंवा ३१ जानेवारीला नवीन महापौरांची निवड होणार असल्याचे निश्चित झाले आहे. बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर हे नेहमीच सर्व जाती-धर्मांना न्याय देण्यासाठी ‘सोशल इंजिनिअरिंग’चा वापर करतात, त्यामुळे यंदा ठाकूर कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. सध्या या पदासाठी सहा नावे चर्चेत आहे. त्यामध्ये माजी स्थायी समिती सभापती आजीव पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. आजीव पाटील हे पक्षाचे संघटक सचिव व प्रवक्ते असून रणनीती ठरवण्यात त्यांचा मोठा हातखंडा आहे. त्यांच्यासह माजी महापौर प्रवीण शेट्टी, कन्हैया भोईर, ख्रिश्चन समाजाचे नेते प्रकाश रॉड्रीग्ज, तसेच मुस्लिम समाजातून आलमगीर डायर आणि आफिफ जमील शेख यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीतील निकाल आणि भाजपचे वाढते आव्हान पाहता, महापालिकेत अनुभवी चेहरा देण्यावर ठाकूरांचा भर असण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यातील नाथापूर येथे रात्री उशिरा जुन्या वादातून दोन गट आमनेसामने आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. या दोन्ही गटांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर त्याचे रूपांतर तुफान हाणामारी व दगडफेकीत झाले. या हिंसक घटनेत दोन्ही बाजूंचे अनेक लोक गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हाणामारीचे काही व्हिडीओ समोर आले असून त्यात दोन्ही गट एकमेकांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांतील संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, गावात शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून मोठ्या उत्साहात आणि तितक्याच भावुक वातावरणात सुरुवात झाली आहे. या ऐतिहासिक दिनानिमित्त मुंबईतील शिवतीर्थावरील त्यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक दाखल होत आहेत. यावेळी बाळासाहेबांच्या आठवणीने अनेक जुन्या शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये मुंबईतील सत्ता हातातून गेल्याबद्दल शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “आज बाळासाहेब असते तर मुंबईचा निकाल काही वेगळाच लागला असता, त्यांनी मुंबई कधीच हातातून जाऊ दिली नसती. ज्यांच्यामुळे आज मुंबईवरचे शिवसेनेचे वर्चस्व कमी झाले, त्यांना निसर्ग कधीच माफ करणार नाही,” अशी संतप्त आणि भावुक प्रतिक्रिया स्मृतीस्थळावर आलेल्या शिवसैनिकांनी दिली आहे.
बदलापूरमध्ये ४ वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणामध्ये आता प्रशासकीय पातळीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ज्या खाजगी व्हॅनमध्ये हे संतापजनक कृत्य घडले, ती व्हॅन आरटीओच्या (RTO) कोणत्याही परवानगीशिवाय अवैधरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गंभीर बाबीची दखल घेत आरटीओ विभागाने संबंधित व्हॅनवर २४,००० रुपयांचा दंड ठोठावला असून त्या व्हॅनचा परवाना कायमचा रद्द केला आहे. या कारवाईमुळे अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या घटनेमुळे बदलापूर परिसरात पुन्हा एकदा संतापाची लाट असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आज आपला स्वतंत्र गट स्थापन करणार आहे. या निवडणुकीत मनसेची ताकद घटली असली तरी, प्रभाग क्रमांक १३ मधून मयुरी पवार या एकमेव उमेदवार विजयी झाल्या आहेत. महापालिकेच्या नियमानुसार, एकाच नगरसेवकाचाही स्वतंत्र गट स्थापन करता येतो. त्यानुसाार मयुरी पवार यांची गट नेते म्हणून निवड निश्चित मानली जात आहे. मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी ही माहिती दिली असून, गट स्थापनेनंतर महापालिकेत नेमकी कोणासोबत युती करायची किंवा कोणाला पाठिंबा द्यायचा, याबाबतचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरे घेणार आहेत.
नंदूरबारमध्ये पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री के.सी. पाडवी यांनी राज्यातील आगामी जिल्हा परिषद निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची आग्रही मागणी केली. कर्नाटकने स्थानिक निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात आली असून, बॅलेट पेपर नसल्यास निवडणुकीत केवळ पैसेवाले आणि गुंड लोकांचाच प्रभाव वाढेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच, निवडणूक आयोग भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही पाडवी यांनी यावेळी केला.
सागर अरुण बिऱ्हाडे, असे मयत तरुणाचे नाव. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. एलसीबीच्या पथकाने नातेवाईकांकडून घटनेची माहिती घेत तपासचक्र फिरवली
दोन काळे घोडे घेऊन काही संशयित शहरात फिरत असल्याच्या नागरिकांकडून तक्रारी. जागेवरच नाल तयार करून घोड्यांच्या पायात ठोकल्याचा प्रकार. अंधश्रद्धाळू नागरिकांकडून नाल कोणत्याही किमतीत केली जात होती खरेदी. गेल्या चार दिवसांपासून नाशिकच्या मंगलरूप गोशाळा टीमकडून सुरू होता संशयितांचा शोध. अखेर नाशिकच्या एबीपी सर्कल परिसरात संबंधित व्यक्ती सापडल्या. मंगलरूप गोशाळा टीमकडून संबंधितांचा समाचार, समज व कायदेशीर कारवाई
डोंबिवली भाजप कार्यकर्त्यावर खुनाचा प्रयत्न प्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक नितीन पाटील व त्यांचे बंधू रवी पाटील यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला,.तर इतर चार आरोपींना जामीन मंजूर. डोंबिवलीतील सुनीलनगर–तुकारामनगर परिसरात निवडणुकीदरम्यान झालेल्या मारहाणी प्रकरणी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय भाजप नगरसेविका आर्या नाटेकर यांच्या पती ओमनाथ नाटेकर यांच्यावर धारदार शस्त्र व काठ्यांनी हल्ल्याचा आरोप
बीडच्या परभणी केसापुरी गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनी अंकिता अवचट हिने उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये जिल्हा परिषद शाळेत कुठलीच व्यवस्था नसल्याचे म्हटले होते. तर सरपंचांनी सोयी सुविधांच्या नावाखाली पैसे उचलले मात्र प्रत्यक्षात कुठलीच सुविधा नसल्याचाही आरोप केला होता.
महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलीस संरक्षणात पैसे वाटल्याची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. ती कॉल रेकॉर्डिंग खरी आहे असे म्हणत प्रभाग क्रमांक 24, 25 आणि संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात पैसे वाटले गेले आणि त्याचे हे पुरावे आहेत, असा दावा करत पैसे वाटपाचा एक व्हिडिओ दाखवुन ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या दिपक केदार यांनी आमदार नारायण कुचे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
धाराशिव जिल्ह्यात 165 जागेसाठी 2259 उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात आहेत.यामध्ये जिल्हा परिषदेसाठी 938 तर पंचायत समिती साठी 1321 उमेदवाराने उमेदवारी दाखल केली आहे. दाखल झालेल्या 2327 अर्जापैकी 38 अर्ज छाननी अंती झाले बाद तर तीन अर्जावरती आक्षेप घेण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यात 55 जागा जिल्हा परिषदेसाठी तर पंचायत समितीच्या 110 जागेसाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९व्या जयंतीनिमित्त मातोश्री परिसरात सध्या जोरदार बॅनरबाजी दिसून येत आहे. दोन्ही शिवसेनेकडून बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक असल्याचा दावा करण्यात येत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत यांच्यासह अनेक नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना भारत रत्न देण्याची मागणी केलीये…
अमरावती जिल्ह्यातील 16 ऑक्सिजन प्लांट बंद झाले आहेत. सिलेंडर खरेदीवर शासनाचा कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला आहे. कोरोना काळात हे ऑक्सिजन प्लांट उभारले होते. दिवसाला 13,36 मॅट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीची क्षमता आहे. ऑक्सीजन प्लांट सुरू करण्यासाठी टेक्निशन आणि मनुष्यबळ न मिळाल्याने प्लांट शोभेची वस्तू बनले आहेत.पाच वर्षापासून एकही ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात आला नाही.
मानद व्यापार आयुक्त अशी बेकायदेशीर पदवी धारण करून फसवणूक करणाऱ्याला पुण्यात अटक करण्यात आली. या घटनेची व्याप्ती राज्यभर असल्याचा पोलिसांना संशय आहे. शेतमालाच्या निर्यात व्यवसायात गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची सुमारे १५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत अनिल गवळी असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या घराणेशाहीला मतदार थारा देणार का, याबाबत उत्सुकता आहे. राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पहिल्यांदाच चिरंजीव श्रीराज भरणे यांना निवडणुकीत उतरवले आहे. इंदापूर तालुक्यातील बोरी पंचायत समितीच्या निवडणुकीतून श्रीराज राजकारणातील नशीब आजमावून पाहणार आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील-ठाकरे या सलग दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेच्या बावडा गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे
सोलापुरातील दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये भाजपकडून दोन उमेदवारांना AB फॉर्म दिल्याने काही काळ पेच निर्माण झाला.मंद्रूप पंचायत समिती गणातील भाजपच्या दोन्ही इच्छुक उमेदवारांना AB फॉर्म दिल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता . भाजपचे इच्छुक उमेदवार मळसिद्ध मुगळे आणि रेवणसिद्ध मेंडगुदले या दोघांत संभ्रम निर्माण झाला.दोन्ही उमेदवारांपैकी कोणाचा AB फॉर्म वैध हे ठरवण्यासाठी सुनावणी घेण्यात आली.यामध्ये मळसिद्ध मुगळे यांचा अर्ज अखेर वैध ठरवण्यात आला
२०२२ ते २०२६ या कालावधीमधे राज्य सरकारने प्रशासनाला हाताशी धरून पुणे महानगरपालिकेत केलेला कारभार वेळोवेळी बाहेर काढला जाईल.या भीतीने पुणे महानगरपालिकेत प्रमुख पदांवर काम करणाऱ्या सर्व पक्षीय नगरसेवकांना निवडणुकीत पाडण्यात आले.या भीतीने प्रमुख नगरसेवकांना पाडण्यात आले, शिवसेना उबाठा चे वसंत मोरे यांनी भूमिका मांडली.पुणे महानगरपालिकेत प्रमुख पदांवर काम करणाऱ्या सर्व पक्षीय नगरसेवकांना निवडणुकीत पाडण्यात आले, वसंत मोरे यांनी अशी तक्रार केली.
नाशिक महापौर पदावर खुल्या प्रवर्गातील महिला विराजमान होणार आहे. 26 वर्षानी नाशिकचे महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहे.महापौर पदाच्या खुर्चीसाठी 16 महिलांची नावं चर्चेत आहेत. हिमगौरी आडके, संध्या कुलकर्णी,डॉक्टर दिपाली कुलकर्णी, दीपाली गीते,यांच्यामध्ये विशेष स्पर्धा दिसून येत आहे.उच्च शिक्षित आणि चांगला उमेदवार महापौर साठी देऊ गिरीश महाजन यांचे देखील सूचक वक्तव्य केले आहे.नाशिक महापालिकेत भाजपाला मिळाली एक हाती सत्ता आहे.