AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कबुतरांना दाणे टाकत असाल तर सावधान, आता थेट गुन्हा दाखल होणार

मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यास बंदी घातली आहे. कबुतरांमळे लोकांना त्रास होतो, तसेच सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होतो असं न्यायालयाने म्हटले आहे.

कबुतरांना दाणे टाकत असाल तर सावधान, आता थेट गुन्हा दाखल होणार
pigeon feeding ban
| Updated on: Jul 31, 2025 | 4:10 PM
Share

मंबईसह अनेक शहरांमध्ये लोक कबुतरांना खायला दाणे टाकत असल्याचे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. मात्र आता अशा लोकांवर कारवाई होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यास बंदी घातली आहे. कबुतरांमळे लोकांना त्रास होतो, तसेच सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होतो असं न्यायालयाने म्हटले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

उच्च न्यायालयाने शहरात असलेले कबुतरखाने हटवण्यास बंदी घातली होती, मात्र त्यांना खाद्य टाकण्याची परवानगी दिली नव्हती. आताही ही परवानगी देण्यात आलेली नाही, तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

न्यायालयाने महापालिकेला आदेश देताना म्हटले की, ‘कबुतरांना खाद्य टाकल्याने सार्वजनिक ठिकाणी लोकांना त्रास होतो. यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. अनेकांना कबुतरांमुळे गंभीर आजार होतात, त्यामुळे आता न्यायालयाने महानगरपालिकेला कबुतरांच्या प्रेमापोटी त्यांना खाद्य टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?

प्राणीप्रेमींच्या गटाने याबाबत याचिका दाखल केली होती. यावर न्यायाधीश जी.एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने म्हटले की, ‘हा मुद्दा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आहे. यामुळे सर्व वयोगटातील लोकांच्या आरोग्याला गंभीर आणि संभाव्य धोका निर्माण होत आहे.’

दरम्यान, जुलैच्या सुरुवातीला न्यायालयाने शहरातील जुने कबुतरखाने हटवण्यापासून थांबवले होते. मात्र कबुतरांना खायला घालण्यास परवानगी दिली नव्हती. त्यानंतर आता कोर्टाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे. यामुळे कबुतरांना खाद्य पुरविणे बंद होईल आणि लोकांच्या आरोग्याला असणारा धोका कमी होईल अशी आशा न्यायालयाला आहे.

आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार

न्यायालयाने यावेळी म्हटले की, परवानगी नसतानाही अनेक लोक कबुतरांना खाद्य टाकत आहेत. मात्र आता नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास थेट गुन्हा दाखल होणार आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोषींवर दंडात्नक कारवाई होण्याची शक्यता आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.