AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोबी पिकवायला खर्च आला 60 हजार, त्यातून 60 रुपयेही निघाले नाहीत”; शेतकऱ्याने सरळ…

एकीकडे सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे तर दुसरीरकडे शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी शेतकऱ्यांची आर्थिक कसरत चालू आहे. शेतीमालाला योग्य भाव नसल्यामुळे शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे.

कोबी पिकवायला खर्च आला 60 हजार, त्यातून 60 रुपयेही निघाले नाहीत; शेतकऱ्याने सरळ...
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Feb 28, 2023 | 10:33 PM
Share

बुलढाणाः शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आता शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. पिकासाठी केलेला खर्चही शेतीमालातून येत नसल्याने आता शेतकऱ्यांनी पीकच मातीत घालण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतात पिकवलेल्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने कुणी पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे तर कुणी उभा पिकात जनावरं सोडून देण्यात आली आहे. याबद्दल शेतकऱ्यांना विचारला असता आलेल्या पिकातून साधा खर्चही निघत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव महीं येथील शेतकरी मधुकर शिंगणे यांनी दोन एकर शेतामध्ये लावलेल्या कोबी पिकाला बाजारात योग्य भाव मिळालेा नाही. त्यामुळे त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे.

शेतामध्ये लावलेल्या पिकाचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी आता कोबी शेतात मेंढ्या चरायला सोडल्या आहेत. शेतकऱ्यांच्या या हंगामामध्ये प्रचंड नुकसान झाले आहे.

तरीही शासनाचा एकही प्रतिनिधि पंचनामा करण्यासाठी शेतकऱ्याकडे आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता भाजीपाला शेती करायची की नाही, असा सवाल आता त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

देऊळगाव मही परिसरात अनेक शेतकरी भाजीपाला पिकवतात मात्र बाजारात पिकांना भाव मिळत नाही. शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतातील कोबी पडून असल्याने आता खराब झाली आहे. तर काहींनी शेतात रोटरसुद्धा फिरवला आहे.

शेती पिकामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. एकीकडे सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या शेतीमाला मातीमोल किंमतीने शेतीमाल खरेदी केला जात आहे.

Follow Us
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं