AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldana River : धोकादायक नदीपात्रातून विद्यार्थी जातात शाळेत, बुलडाण्यातील आमना नदीवरील पुलाचा प्रश्न केव्हा मिटणार?

आतापर्यंत नेत्यांनी हुलकावणी दिली. आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची सामान्य लोकांची सरकार आहे. यांनी दखल घेऊन याठिकाणी पुलाचं बांधकाम करून द्यावं.

Buldana River : धोकादायक नदीपात्रातून विद्यार्थी जातात शाळेत, बुलडाण्यातील आमना नदीवरील पुलाचा प्रश्न केव्हा मिटणार?
धोकादायक नदीपात्रातून विद्यार्थी जातात शाळेतImage Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Jul 17, 2022 | 9:09 PM
Share

बुलडाणा : जिल्ह्यातल्या आमना नदीच्या पुलाचा प्रश्न काही मिटताना दिसत नाही. गावकरी रोज धोकादायक नदीपात्र पार करतात. विद्यार्थ्यांनाही शाळेत जाण्यासाठी नदीपात्र हाच मार्ग आहे. याठिकाणी पूल अद्याप बनला नाही. त्यामुळं हा धोकादायक प्रवास नागरिाकांना करावा लागत आहे. त्यामुळं याठिकाणी पूल केव्हा होणार असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा (Sindkhedaraja) आणि देऊळगाव राजा या दोन्ही तालुक्यातील दोन जवळ-जवळ असलेल्या गावाला आमना नदीची सीमा आहे. जळगाव (Jalgaon) आणि पिंपळगाव (Pimpalgaon) अशी त्या गावाची नावे आहेत. या दोन्ही गावातील ग्रामस्थांना, रुग्णांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना रोज हे नदीपात्र पार करावी लागते.

जळगाव-पिंपळगावदरम्यान आमना नदी

आपला जीव मुठीत घेऊन इकडून तिकडे जावे लागते. त्यामुळे ग्रामस्थ पुरते वैतागले आहेत. नदीपात्र मोठं आणि खोल आहे. इथे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या दोन्ही गावाला जोडणारा पुल करावा, अशी मागणी होतेय. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव आणि पिंपळगाव या दोन्ही गावांमध्ये आमना नदी आहे. एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी या आमना नदीपात्रातून जावे लागते. उन्हाळ्यात काही अडचण नसते. मात्र पावसाळ्यात सुद्धा याच नदीतून ग्रामस्थांना जावे लागत आहे.

नदीपात्रातून पूल बांधण्याची मागणी

शाळकरी विद्यार्थ्यांनासुद्धा याच पात्रातून शाळेत जावे लागते. नदीला पूर आला तर जाताना भीती वाटते. एखादा विद्यार्थी वाहून जाईल का ?, नदीपात्रातून जाण्याची वेळ ही पिढ्यान् पिढ्या चालत आलीय. मात्र याकडे ना अधिकारी लक्ष देतात न राजकीय पदाधिकारी. त्यामुळे या दोन्ही गावांतील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. या नदीपात्रातून जाण्यासाठी पुल बांधावा अशी मागणी ग्रामस्थ करताहेत. हा पूल तयार झाल्यास गावकऱ्यांचा धोकादायक प्रवास थांबणार आहे. आतापर्यंत नेत्यांनी हुलकावणी दिली. आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची सामान्य लोकांची सरकार आहे. यांनी दखल घेऊन याठिकाणी पुलाचं बांधकाम करून द्यावं. विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास टाळावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.