AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुलढाण्यासह चिखलीत अवकाळी पाऊस; हरभरा, गहू, कांदा पिकांचे होणार नुकसान…

गेल्या तीन ते चार वर्षापासून शेतकऱ्यांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात संकटं आली आहे. सगळ्यात आधी कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांना जगणे मुश्किल झाले होते.

बुलढाण्यासह चिखलीत अवकाळी पाऊस; हरभरा, गहू, कांदा पिकांचे होणार नुकसान...
| Updated on: Jan 26, 2023 | 12:25 AM
Share

बुलढाणाः बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीसह परिसरात अनेक ठिकाणी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसानं शेतकऱ्यांच्या हरभरा, गहू, कांदा सह इतर पिकांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काल रात्रीसुद्धा चिखलीसह परिसरातील अनेक ठिकाणी पाऊस झाला होता. त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

हवामान खात्यानेसुद्धा पावसाची शक्यता वर्तवली होती, त्यानुसार आज पावसाला सुरुवात झाली आहे. बुलढाण्यासह परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे दिवसभरात पाऊस कधीही कोसळ्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत होते.

याआधीच गेल्या दोन वर्षापासून पावसामुळे शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना सगळी पिकं पाण्यात सोडून देण्याची वेळ आली होती. कधी नैसर्गिक संकट तर कधी बाजारभावामुळे शेतकरी नेहमी अडचणीत आला आहे.

गेल्या तीन ते चार वर्षापासून शेतकऱ्यांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात संकटं आली आहे. सगळ्यात आधी कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांना जगणे मुश्किल झाले होते. त्यातच अवकाळी पावसाचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांना फायदा कसा होणार असा सवाल आता शेतकरी उपस्थित करु लागले आहेत.

मागील दोन दिवसांपासून दिल्लीपासून हवामानात बदल झाला आहे. मागील दोन दिवसांपासून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यानंतर आता राज्यातही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे हरभरा, गहू, कांदा या पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.

बुलढाण्यासह परिसरात अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसाना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाकडून वारंवार नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी आता शेतातून पीकपाणी घ्यायचं की नाही असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.