AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मंत्रिमंडळ विस्ताराच्या आठ दिवसांपूर्वी शपथ घेण्याचा फोन, पण नंतर…’, आमदार रवी राणा यांनी सांगितला पडद्यामागील किस्सा

MLA Ravi Rana: विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना अनेकांना वाटत होत, रवी राणाचा देखील पराभव व्हावा. परंतु मी विजयी झालो. माझी राजकारणात कोणाशी काहीही दुश्मनी नाही. अमरावतीचे नव्हे खासदार बळवंत वानखडे झाले. तेव्हा मी त्यांचा अभिनंदन केले होते.

'मंत्रिमंडळ विस्ताराच्या आठ दिवसांपूर्वी शपथ घेण्याचा फोन, पण नंतर...', आमदार रवी राणा यांनी सांगितला पडद्यामागील किस्सा
Ravi Rana
| Updated on: Jan 12, 2025 | 2:52 PM
Share

विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महायुतीचे २३० आमदार निवडून आले. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी दावेदारी वाढली. भाजपने १३२ जागा मिळवत विक्रम केला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ५७ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. त्यामुळे तिन्ही पक्षात मंत्रीपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अमरावतीचे आमदार रवी राणा यांचे नावही मंत्रिपदासाठी चर्चेत आले. त्याबाबत काय घडले ते रवी राणा यांनी रविवारी सांगितले.

आमदार रवी राणा म्हणाले, मला मंत्रिमंडळ विस्ताराच्या आठ दिवसांपूर्वी सांगितले होते की मंत्रिमंडळ विस्तारासाठी शपथ घ्यावी लागणार आहे. पण मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिवशी सकाळी माझे नेते देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. यावेळी थांबा भरपाई भविष्यात काढून देऊ. त्यामुळे यावेळी आपण मंत्री झाला नाहीआमदार बनून बनून मी त्रासलो आहे. मला देखील वाटते मी मंत्री झाले पाहिजे, असे रवी राणा यांनी म्हटले.

सर्वांनी एकत्र यावे- राणा

आमदार रवी राणा म्हणाले, विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना अनेकांना वाटत होत, रवी राणाचा देखील पराभव व्हावा. परंतु मी विजयी झालो. माझी राजकारणात कोणाशी काहीही दुश्मनी नाही. अमरावतीचे नव्हे खासदार बळवंत वानखडे झाले. तेव्हा मी त्यांचा अभिनंदन केले होते. जिल्ह्यात सर्व द्वेष मिटवून, सर्व माजी आमदारांनी आमदारांना सहकार्य केले पाहिजे. आपण एकमेकांचे पाय खेचत राहिले तर लोकांना न्याय देऊ शकत नाही. सर्वांनी एकत्र येऊन या जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी काम केले पाहिजे.

लोकांच्या मनातील स्थान महत्वाचे

आजच्याच दिवशी माझा राजकीय जन्म झाला आहे. युवा स्वाभिमान पार्टीचा जन्म झाला. निवडणुकीमध्ये मला लोकांनी खूप प्रेम दिले. माझ्या नावाच्या रांगोळ्या महिलांनी काढल्या होत्या. रस्ते सजवले होते. 2024 मध्ये सर्व जनता बडबेरामध्ये निवडणूकमध्ये उभे आहे, असे वाटत होते. मी किती वेळा निवडून आलो, या पेक्षा लोकांच्या मनात माझे स्थान किती आहे, हे महत्वाचे आहे, असे आमदार राणा यांनी सांगितले.

माणूस किती जगला यापेक्षा कोणासाठी जगला हे महत्वाचा आहे. अचलपूर मतदारसंघाचे माजी आमदार असो की तिवसा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच अमरावती जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याने घरी चहा प्यायला बोलवले तर मी जाणार आहे. मी विरोधकानाही आवाहन करतो त्यांनी देखिल माझ्या गंगा सावित्री निवास्थानी चहा घ्यायला यावे, असे सांगत राजकीय मतभेद बाजूला ठेवण्याचा सल्ला आमदार राणा यांनी दिला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.