AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज आणि उद्धव यांच्या युतीच्या वावड्यांवर भुजबळ यांचे महत्वाचं वक्तव्य, त्यांचं एकत्र येणं ही…

दक्षिण भारतात अनेक स्थानिक पक्ष आहेत. पंजाब पश्चिम बंगालमध्ये प्रादेशिक पक्ष बलवान झाले आहेत. त्या- त्या राज्याचे प्रादेशिक पक्ष लोकांच्या मागण्या पुढे आणतात. स्थानिक लोकांना नेहमीच ते भावतात असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

राज आणि उद्धव यांच्या युतीच्या वावड्यांवर भुजबळ यांचे महत्वाचं वक्तव्य, त्यांचं एकत्र येणं ही...
Chhagan Bhujbal's important statement on the alliance between Raj and Uddhav
| Updated on: Apr 19, 2025 | 6:44 PM
Share

राज ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिका निवडणूकांचा मुहूर्त साधत उद्धव ठाकरे यांच्या विषयीच्या एका प्रश्नाला महेश मांजरेकर याच्या पॉडकास्टमध्ये उत्तर दिले त्यावर पुन्हा एकदा मराठी माणसांत ठाकरे घराण्यातील हे भाऊ पुन्हा एकत्र येतील का याची चर्चा सुरु झाली आहे. या संदर्भात एकेकाळी शिवसेनेचे मातब्बर नेते असलेल्या छगन भुजबळ यांनी आपले मत मांडले आहे.

उद्धव आणि राज एकत्र येणं शक्य आहे का ?

अजून मला तरी याबाबतीची काही माहीती नाही. पण एकत्र येणे हे चांगले आहे. पूर्वी भाजप सेना युती होती त्यावेळी त्यांना चांगली संधी आली होती. मात्र राजकारणात काहीही होऊ शकते . माझ्या त्यांना शुभेच्छा असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ते दोन्ही एकत्र आलेत तर निश्चितपणे ठाकरेंची पुन्हा सद्दी येईल असेही भुजबळ म्हणाले. मी राज ठाकरे यांची मुलाखत पाहीलेली नाही. मला कल्पना नाही तुम्ही विचारत आहात म्हणून मी ही कमेंट करतोय असेही ते म्हणाले. आता मुंबई महापालिका निवडणूक जवळ आली आहे . दोन्ही एकत्र आले तर त्यांना यश मिळू शकते . मात्र काय अटी शर्ती आहेत आणि त्या एकमेकांना मान्य आहेत नाहीत हे बघावे लागेल असे एका प्रश्नाच्या उत्तर देताना भुजबळ यांनी सांगितले.

राज यांच्या घरी शिंदे यांचा पाहुणचार

शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्याकडे जातात, त्यांचे सहकारी देखील जात असतात. त्यात राजकीय चर्चा झालेली नाही असे म्हणतात. भोजनासाठी कोण कशाला चर्चा करेल. नक्कीच राजकारणावर चर्चा होणार आहे. ठाकरे कुटुंबप्रमाणे पवार कुटुंब एकत्र यावे का ?.याप्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की कुठलेही कुटुंब वा माझे कुटुंब फुटले तर कोणालाही आनंद होणार नाही. राजकारणातील वेगळी झालेली कुटुंबे एकत्रित आली तर आनंदच आहे असे भुजबळ यांनी उत्तर दिले आहे. दोन्ही ठाकरे हे लढवय्ये आहेत. त्यांचं एकत्रित येणे ही काही हतबलता नाही असेही छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.