AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EVM मध्ये गडबडीचा विरोधकांकडून आरोप, फडणवीसांनी दिलं विलासरावांच्या कुटुंबाचं उदाहरण, म्हणाले…

मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच विशेष मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

EVM मध्ये गडबडीचा विरोधकांकडून आरोप, फडणवीसांनी दिलं विलासरावांच्या कुटुंबाचं उदाहरण, म्हणाले...
devendra fadnavis
| Updated on: Dec 06, 2024 | 6:50 PM
Share

देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर मंत्रालयामध्ये लगेचच मंत्रिमंडळाची बैठकीचं देखील पार पडली. दरम्यान मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच डीडी वाहिनीला विशेष मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी पुढीच पाच वर्ष हे सरकार महाराष्ट्रासाठी कशापद्धतीनं काम करणार याबाबत आपली भूमिका मांडली. सोबतच ईव्हीएमच्या मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 

लोकसाभ निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठा फटका बसला होता. मात्र त्यातून सावरत विधानसभा निवडणुकीत महायुतीनं मोठं यश मिळवलं, विधानसभा निवडणुकीत महायुतीचे तब्बल 231 उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला मिळून 50 जागाच जिंकता आल्या. त्यानंतर विरोधकांकडून आता ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत  आहे. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ईव्हीएमवर मूर्खतापूर्ण बोलण्यापेक्षा आत्मचिंतन केलं पाहिजे. झारखंड आणि महाराष्ट्रात निवडणूक होते. झारखंडमध्ये जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगली. महाराष्ट्रात ईव्हीएम चांगली नाही. लातूरला धीरज देशमुख हरतात ईव्हीएम चांगली नाही. तर अमित देशमुख जिंकल्यावर ईव्हीएम चांगली आहे. त्यामुळे ईव्हीएमवर दोषारोप करण्यापेक्षा राहुल गांधींनी आत्मचिंतन केलं तर त्यांना चांगल्या जागा मिळतील, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मला अनेकदा ट्रोल केलं गेलं. पण मी ट्रोलर्सचे आभार मानतो. त्यांनी मला सातत्यानं टार्गेट केलं त्यामुळेच लोकांच्या मनात माझ्याबाबत सहानुभूती निर्माण झाली आहे. ट्रोलर्स माझ्याशी चुकीच्या पद्धतीनं वागत असल्याचं दिसून आलं.  माशी शिंकली तरी ते माझ्याशी असभ्य भाषेत बोलायचे. त्यांनी मला लढण्याची ताकद दिली. लढून यांना हरवायचं आहे. यांना यांची जागा दाखवायची आहे, असं मला वाटलं. त्यांच्या वागण्याने मला मानसिक त्रास नक्कीच झाला, पण मी लढलो त्याचा फायाद मला झाला. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय
अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय.
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन...
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन....
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश.
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?.
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले.
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध.
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी...
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी....
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी.
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस.
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट.