AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडे पाहून हात जोडले; म्हणाले, कृपया…

नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे, विधानसभेत बोलताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवरून विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला.

देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडे पाहून हात जोडले; म्हणाले, कृपया...
| Updated on: Dec 19, 2024 | 4:04 PM
Share

नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज सभागृहात बोलताना  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवरून विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. निवडणूक जिंकण्यासाठी व्होट जिहाद करता. एक व्यक्ती येतो 17 मागण्या करतो. तुम्ही त्या वाचतही नाही. तुमच्या देशभक्तीवर माझा संशय नाही. आपण वैचारिक विरोधक आहोत. पण विरोधक आपल्या खांद्यावर कुणाला तरी बंदूक ठेवायला देतात, याचं वाईट वाटतं. असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?

निवडणूक जिंकण्यासाठी व्होट जिहाद करता. एक व्यक्ती येतो 17 मागण्या करतो. तुम्ही त्या वाचतही नाही. तुमच्या देशभक्तीवर माझा संशय नाही. आपण वैचारिक विरोधक आहोत. पण विरोधक आपल्या खांद्यावर कुणाला तरी बंदूक ठेवायला देतात, याचं वाईट वाटतं.

भारत जोडो अभियानावर मी बोललो, माझ्यावर टीका केली. मी आज पुराव्यानिशी बोलतो. या अभियानात कोण आहे बघा. या देशात आपण नक्षलवादाच्या विरोधात लढाई पुकारली. नक्षलवाद्याचा संविधान, लोकशाहीवर विश्वास नाही. त्यांना समांतर सरकार हवं आहे. या नक्षलवाद्यांच्या विरुद्ध मोठी लढाई सुरू झाली. त्यामुळे आम नक्षलवादी संपायला लागले. त्यावेळी हा नक्षलवाद सेफ झोन शोधायला लागला, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की,  आर आर पाटील यांच्या काळात 48 संघटनांची यादी होती,  त्या ग्रामीण आणि शहरी भागात सक्रिय असल्याची नोंद आहे. लोकसभेतही १८ फेब्रुवारी २०१४ रोजी मनमोहन सिंगाचं सरकार असताना 72 फ्रंटल संघटनांची नावे जाहीर करण्यात आली होती.  त्यातील सात महाराष्ट्रातील आहेत. त्या तुमच्या भारत जोडोच्या यादीत आहे. महाराष्ट्राच्या एटीएसने त्यावेळी जी माहिती पाठवली होती. लोकसभेत गेलेली ही माहिती आहे, ती माझ्याकडे आहे. त्यात एकूण ४० संघटनांची नावे आहेत. त्यातील १३ संघटना भारत जोडोत काम करत आहेत. तुमच्या देशभक्तीवर प्रश्न नाही. पण निवडणूक जिंकण्यासाठी आपण कुणाचा वापर करत आहोत. कोण आपला खांदा वापरत आहोत याचा विचार केला पाहिजे.

आपण तिसरी आर्थिक शक्ती होत आहोत. अनेक देशांना आनंद नाहीये. त्या देशांना या देशात कारवाई करायची आहे. हात जोडून विनंती करतो कृपया तुमचा खांदा वापरू देऊ नका. कदाचित आमचाही खांदा वापरण्याचा प्रयत्न करतील. एकदा वाजेपयी म्हणाले होते सरकार येतील जातील. पण हा देश , लोकशाही आणि संविधान राहिलं पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.