Maharashtra News Live : महाराष्ट्र बंदला जनतेकडून प्रतिसाद- प्रकाश आंबेडकर
Maharashtra News Live : राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनालाचा आज चौथा दिवस आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. रेड, यलो अलर्ट वेगवेगळ्या ठिकाणी देण्यात आले आहेत.

LIVE NEWS & UPDATES
-
मुसळधार पावसाने इगतपुरी तालुक्यातील पिंपरी सदो येथील पूल गेला पाण्याखाली
पुलावरून वाहू लागले मोठ्या प्रमाणात पाणी. भावली, बोर्ली, पिंपरी, जामुंडा, गवांडा, धामाडकीवाडी या गावांचा इगतपुरी शहराशी संपर्क तुटला. पावसाचा जोर ओसरत नाही तोवर पुलावरून प्रवास न करण्याचे प्रशासनाचे आवाहन
-
नालासोपारा पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते जलमय
वसई विरार शहरात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नालासोपारा पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते जलमय झाले आहेत. रेल्वे स्थानकात जाण्यासाठी पाण्यातून मार्ग काडत प्रवाशांना स्थानक गाठावे लागत आहे. शहरात पावसाचा जोर कायम राहिला तर शहरातील जनजीवन विस्कळीत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
-
-
निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून 25 हजार 925 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू
गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीच्या दिशेने सातव प्रकार गेटच्या माध्यमातून पूर पाण्याचा विसर्ग… चांदोरी, सायखेडा, शिंगवे, करंजगाव या गावांना पूर पाण्याचा फटका बसू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना…पावसाचा जोर कायम; नांदूर मधमेश्वर धरणातील विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता…गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा….
-
माझं मुख्यमंत्र्यांसोबत बोलणे झाले नाही- प्रकाश आंबेडकर
माझं मुख्यमंत्र्यांसोबत बोलणे झाले नाही, असे मोठे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले. यादरम्यान त्यांनी काही गंभीर आरोपही केले.
-
वंचितच्या कार्यकर्त्यांना बंद शांतते पाळण्याचे आवाहन
वंचितच्या कार्यकर्त्यांना बंद शांतते पाळण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांच्याकडून करण्यात आले. लोकांना लुटण्याचा अधिकार कोणालाही दिला नसल्याचे मोठे विधा प्रकाश आंबेडकर यांनी केले.
-
-
वंचित बहुजन आघाडीच्या साडेतीन हजार कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले- प्रकाश आंबेडकर
आज राज्यात बहुजन आघाडीकडून आज राज्यात बंद जाहीर करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप केले. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, वंचित बहुजन आघाडीच्या साडेतीन हजार कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
-
अण्णा हजारे मौन आंदोलन करणार
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे मौन आंदोलन करणार. सकाळी 11 ते 1 या वेळेत वाडिया पार्क येथील गांधी स्मारकात आंदोलन करणार. विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रश्न सोडवावेत, अशी अण्णा हजारे यांची मागणी. लोकशाहीत दडपशाहीऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन. आंदोलनस्थळाला प्रतिकात्मक स्वरूपात “नगरचे जंतर मंतर” नाव देणार.अण्णा हजारे यांच्या या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
दिल्ली पोलीस हाय अलर्टवर, धर्मेंद्र प्रधान यांच्या घराकडे जाणारे रस्ते बंद
दिल्ली पोलीस हाय अलर्टवर असून धर्मेंद्र प्रधान यांच्या घराबाहेरचा सुरक्षा बंदोबस्त वाढवला आहे. त्यांच्या घराच्या दिशेने जाणारे रस्ते बंद केले आहेत.
-
नाशिकमध्ये पावसामुळे काय स्थिती
रात्रीपासून पावसाची संततधार सुरू. नाशिकच्या रामकुंड परिसरात पाण्याची पातळी वाढली. रामकुंड परिसरात पूर सदृश्य परिस्थिती. दुतोंड्या मारुतीच्या कमरे पर्यंत आले पुराचे पाणी. गोदा घाट परिसरातील अनेक छोटी-मोठी मंदीरं पाण्याखाली. गोदाघाट परिसरातील टपऱ्या, दुकानं काढून घेण्याच्या सूचना.
-
वसई-विरार नालासोपाऱ्यात पावसाची संततधार
वसई-विरार नालासोपाऱ्यात रात्र भर पावसाने आपली संततधार सुरूच ठेवली आहे. आज हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट दिला असल्याने वसई विरार सह जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी दिली आहे. सततच्या पावसामुळे काही सखल भागात साधारण पाणी साचले आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर कुठेही पाणी साचले नसल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू आहे. विरार चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सुरळीत सुरू आहेत. काही लोकल पाच ते दहा मिनिट उशीराने धावत आहेत. पूर्ण परिसरात आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राजधानी दिल्लीत जंतर-मंतरवर सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. काल रात्री पोलीस आणि आंदोलकांमध्ये झडप झाली. यात काही पोलीस जखमी झाले. दुसरीकडे मुंबईत पावसाची संततधार सुरु आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक घाटमाथा, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या सोसाट्याच्या वारासह मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय तसेच अंगणवाड्यांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.