AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“…तर ती काळी जादू पण बंद होईल”, संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानावर शिवसेना मंत्र्यांचा जबरदस्त टोला

"एकनाथ शिंदे फार मोठ्या मनाचे आहेत. ते नाराज होऊ शकत नाहीत. काही वैयक्तिक कारणांमुळे ते जर उपस्थित राहू शकले नसतील तर त्याचे राजकीय भांडवल होऊ नये, ते विरोधकांनी करू नये", असेही उदय सामंतांनी सांगितले.

...तर ती काळी जादू पण बंद होईल, संजय राऊतांच्या 'त्या' विधानावर शिवसेना मंत्र्यांचा जबरदस्त टोला
खासदार संजय राऊत
| Updated on: Feb 03, 2025 | 9:54 PM
Share

“राज्यात नवीन सरकार येऊन 2 महिने झालेत, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाही”, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी पलटवार करत राऊतांना उत्तर दिले होते. “उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद सोडून वर्षा बंगला सोडला तेव्हा तिथे टोपलीभर लिंबू सापडले, असं एकनाथ शिदेंनी म्हटलं होते. काळी जादू काय ते राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारायला पाहिजे, काळी जादू काय त्यांना अधिक माहिती, कारण त्याचा अनुभव संजय राऊतांना जास्त असेल म्हणून त्यांच्या डोक्यात काळी जादूचं आलं असावं”, असे रामदास कदम यांनी म्हटलं होतं. त्यावर आता मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उदय सामंत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी संजय राऊतांना जबरदस्त टोला लगावला. “सकाळी नऊ वाजताची मुलाखत देणं बंद करा, तर ती काळी जादू पण बंद होईल”, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.

राजकीय आरोपांची आवश्यकता नाही

“याच वर्षा बंगल्याने मागच्या अडीच वर्षात लाखो महाराष्ट्रातील लोक बघितले. जो वर्षा बंगला स्वतःसाठी वापरला जायचा, तो जनतेला बघता आला नाही. तो एकनाथ शिंदे यांचा नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जनतेने बघितला. त्या ठिकाणी जर थोडा मेंटेनन्स सुरु असेल, तर राजकीय आरोपांची आवश्यकता नाही”, असे उदय सामंत म्हणाले.

“सकाळी नऊ वाजताची मुलाखत घेणे, बंद करा तर ती काळू जादू पण बंद होईल. मी पण एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की एकनाथ शिंदे साहेबांची परवानगी घेऊन त्यांच्या अगोदर अर्धा तास मी पत्रकार परिषद सुरू करणार आहे. त्यांना महाराष्ट्राच्या जनतेने मनावर घेतलं नाही”, असेही उदय सामंत म्हणाले.

त्याचे विरोधकांनी भांडवल करू नये

“एकनाथ शिंदे संवेदनशील आहेत. काही वैयक्तिक कारणांमुळे ते जर उपस्थित राहू शकले नाही. तर त्याचे विरोधकांनी भांडवल करू नये. चर्चा सूत्रांच्या माध्यमातून होत आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहिले, ते संवेदनशील आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक झाली आणि महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं. शिवसेनेच्या इतिहासात यंदा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोठं यश मिळालं. नाराजीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. एकनाथ शिंदे फार मोठ्या मनाचे आहेत. ते नाराज होऊ शकत नाहीत. काही वैयक्तिक कारणांमुळे ते जर उपस्थित राहू शकले नसतील तर त्याचे राजकीय भांडवल होऊ नये, ते विरोधकांनी करू नये”, असेही उदय सामंतांनी सांगितले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.