AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबाासाहेबांनी दिलेलं आरक्षण कोणीही माई का लाल रद्द करू शकत नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

"आरक्षण रद्द करण्याची भाषा करत आहेत. बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं आहे, तो कुणी रद्द करू शकत नाही", असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. ते वर्ध्यात बोलत होते.

बाबाासाहेबांनी दिलेलं आरक्षण कोणीही माई का लाल रद्द करू शकत नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल
| Updated on: Sep 20, 2024 | 1:16 PM
Share

CM Eknath Shinde On Rahul Gandhi : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. “काही लोक विदेशात जाऊन देशाला बदनाम करत आहेत. आरक्षण रद्द करण्याची भाषा करत आहेत. बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं आहे, तो कुणी रद्द करू शकत नाही”, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. ते वर्ध्यात बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहे. पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा आज वर्ध्यात पार पडत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध योजनांचे लोकापर्ण केले जात आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला.

देशाच्या विकासाला हातभार लागणार

“आता भारताचं २१ वं शतक आहे. मोदी हे देशाचे कर्णधार आहेत. मोदींनी देशातील महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला. दहा वर्षात १० कोटी महिला आत्मनिर्भर झाल्या. आज अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना सुरू होत आहे. त्यासाठी महिलांना २५ लाखाचं अर्थसहाय्य मिळणार आहेत. १ हजार कॉलेजात आचार्य चाणक्य कौशल्य विभाग सुरू करत आहोत. पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कचीही सुरुवात होणार आहे. या पार्कात दोन लाख रोजगार मिळणार आहे. या मुळे परिसराचा मेकओव्हर होणार आहे. देशाच्या विकासाला हातभार लागणार आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

“मायचा लाल आरक्षण रद्द करू शकत नाही”

काही लोक विदेशात जाऊन देशाला बदनाम करत आहेत. आरक्षण रद्द करण्याची भाषा करत आहेत. बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं आहे, तो कुणी रद्द करू शकत नाही. जोपर्यंत मोदी सत्तेत आहेत, तोपर्यंत कोणताही मायचा लाल आरक्षण रद्द करू शकत नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर टीका केली.

“हा विकास तुम्हाला रोखायचा आहे का?”

“काही लोक म्हणतात ३७० कलम पुन्हा बहाल करू. ते दहशतवाद्यांच्या सुरात सूर मिसळत आहेत. हे कलम हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये विकास झाला. हा विकास तुम्हाला रोखायचा आहे का?” असा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला आहे. “सामान्य माणसाचा सन्मान वाढवणं त्यांची ताकद वाढवण्याचं काम मोदी करत आहेत. त्यामुळेच मोदींनी वन नेशन वन इलेक्शन योजना आणली आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Follow Us
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त.
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड.
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?.
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?.
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर.
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?.
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे.