AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबाासाहेबांनी दिलेलं आरक्षण कोणीही माई का लाल रद्द करू शकत नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

"आरक्षण रद्द करण्याची भाषा करत आहेत. बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं आहे, तो कुणी रद्द करू शकत नाही", असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. ते वर्ध्यात बोलत होते.

बाबाासाहेबांनी दिलेलं आरक्षण कोणीही माई का लाल रद्द करू शकत नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल
| Updated on: Sep 20, 2024 | 1:16 PM
Share

CM Eknath Shinde On Rahul Gandhi : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. “काही लोक विदेशात जाऊन देशाला बदनाम करत आहेत. आरक्षण रद्द करण्याची भाषा करत आहेत. बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं आहे, तो कुणी रद्द करू शकत नाही”, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. ते वर्ध्यात बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहे. पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा आज वर्ध्यात पार पडत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध योजनांचे लोकापर्ण केले जात आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला.

देशाच्या विकासाला हातभार लागणार

“आता भारताचं २१ वं शतक आहे. मोदी हे देशाचे कर्णधार आहेत. मोदींनी देशातील महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला. दहा वर्षात १० कोटी महिला आत्मनिर्भर झाल्या. आज अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना सुरू होत आहे. त्यासाठी महिलांना २५ लाखाचं अर्थसहाय्य मिळणार आहेत. १ हजार कॉलेजात आचार्य चाणक्य कौशल्य विभाग सुरू करत आहोत. पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कचीही सुरुवात होणार आहे. या पार्कात दोन लाख रोजगार मिळणार आहे. या मुळे परिसराचा मेकओव्हर होणार आहे. देशाच्या विकासाला हातभार लागणार आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

“मायचा लाल आरक्षण रद्द करू शकत नाही”

काही लोक विदेशात जाऊन देशाला बदनाम करत आहेत. आरक्षण रद्द करण्याची भाषा करत आहेत. बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं आहे, तो कुणी रद्द करू शकत नाही. जोपर्यंत मोदी सत्तेत आहेत, तोपर्यंत कोणताही मायचा लाल आरक्षण रद्द करू शकत नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर टीका केली.

“हा विकास तुम्हाला रोखायचा आहे का?”

“काही लोक म्हणतात ३७० कलम पुन्हा बहाल करू. ते दहशतवाद्यांच्या सुरात सूर मिसळत आहेत. हे कलम हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये विकास झाला. हा विकास तुम्हाला रोखायचा आहे का?” असा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला आहे. “सामान्य माणसाचा सन्मान वाढवणं त्यांची ताकद वाढवण्याचं काम मोदी करत आहेत. त्यामुळेच मोदींनी वन नेशन वन इलेक्शन योजना आणली आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत