AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबाासाहेबांनी दिलेलं आरक्षण कोणीही माई का लाल रद्द करू शकत नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

"आरक्षण रद्द करण्याची भाषा करत आहेत. बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं आहे, तो कुणी रद्द करू शकत नाही", असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. ते वर्ध्यात बोलत होते.

बाबाासाहेबांनी दिलेलं आरक्षण कोणीही माई का लाल रद्द करू शकत नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल
| Updated on: Sep 20, 2024 | 1:16 PM
Share

CM Eknath Shinde On Rahul Gandhi : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. “काही लोक विदेशात जाऊन देशाला बदनाम करत आहेत. आरक्षण रद्द करण्याची भाषा करत आहेत. बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं आहे, तो कुणी रद्द करू शकत नाही”, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. ते वर्ध्यात बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहे. पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा आज वर्ध्यात पार पडत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध योजनांचे लोकापर्ण केले जात आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला.

देशाच्या विकासाला हातभार लागणार

“आता भारताचं २१ वं शतक आहे. मोदी हे देशाचे कर्णधार आहेत. मोदींनी देशातील महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला. दहा वर्षात १० कोटी महिला आत्मनिर्भर झाल्या. आज अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना सुरू होत आहे. त्यासाठी महिलांना २५ लाखाचं अर्थसहाय्य मिळणार आहेत. १ हजार कॉलेजात आचार्य चाणक्य कौशल्य विभाग सुरू करत आहोत. पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कचीही सुरुवात होणार आहे. या पार्कात दोन लाख रोजगार मिळणार आहे. या मुळे परिसराचा मेकओव्हर होणार आहे. देशाच्या विकासाला हातभार लागणार आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

“मायचा लाल आरक्षण रद्द करू शकत नाही”

काही लोक विदेशात जाऊन देशाला बदनाम करत आहेत. आरक्षण रद्द करण्याची भाषा करत आहेत. बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं आहे, तो कुणी रद्द करू शकत नाही. जोपर्यंत मोदी सत्तेत आहेत, तोपर्यंत कोणताही मायचा लाल आरक्षण रद्द करू शकत नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर टीका केली.

“हा विकास तुम्हाला रोखायचा आहे का?”

“काही लोक म्हणतात ३७० कलम पुन्हा बहाल करू. ते दहशतवाद्यांच्या सुरात सूर मिसळत आहेत. हे कलम हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये विकास झाला. हा विकास तुम्हाला रोखायचा आहे का?” असा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला आहे. “सामान्य माणसाचा सन्मान वाढवणं त्यांची ताकद वाढवण्याचं काम मोदी करत आहेत. त्यामुळेच मोदींनी वन नेशन वन इलेक्शन योजना आणली आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Follow Us
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले...
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले, 17 तारखेला...
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... संजय राऊतांची टीका
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट,
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट, आंदोलक आक्रमक
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Inside...
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? अखेर Inside स्टोरी समोर
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं