AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadanvis : त्यांच्याकडे उमेदवारच नव्हते, मग काय आम्हीच आमच्याविरोधात उमेदवार द्यायचा का? बिनविरोधच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनी विरोधकांना घेरलं

महापालिका निवडणुकीत ६६ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. यात सर्वाधिक उमेदवार महायुतीचे असल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही९ ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिले. विरोधकांना उमेदवारच मिळाले नाहीत, म्हणून ही परिस्थिती उद्भवल्याचा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केला.

Devendra Fadanvis : त्यांच्याकडे उमेदवारच नव्हते, मग काय आम्हीच आमच्याविरोधात उमेदवार द्यायचा का? बिनविरोधच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनी विरोधकांना घेरलं
बिनविरोधच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jan 12, 2026 | 12:26 PM
Share

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आणखी तीन दिवसांनी म्हणजे 15 तारखेला मतदान होऊन 16 ताखेला राज्याच्या 29 महापालिकांचा निकाल लागेल. त्यासारठी सर्वच पक्षांची जय्यत तयारी सुरू असून शहरोसहरी प्रचार सुरू असून मोठमोठ्या नेत्यांच्या सभाही गाजत आहेत. मात्र अद्याप निवडणूक झालेली नसतानाच राज्यातील अनेक ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. राज्यात एकूण 66 उमेदवार हे निवडणूक न लढवताच बिनविरोध निवडून आले असून त्यामध्ये महायुतीचे ,भाजप आणि शिंदे गटाचे सर्वाधिक उमेदवार आहेत. मात्र यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असून विरोधकांनी सत्ताधारी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. दमदाट्या करून, पैसे देऊन उमेदवार निवडून आणल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी टीव्ही9 मराठीला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. टीव्ही9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना बिनविरोध उमेदवारांवरून सवाल विचारला. तुमचे (भाजप) आणि शिंदे गटाचेच उमेदवार निवडणूक न लढवताही, बिनविरोध निवडून आले. दमदाटी करून, पैसे देऊन उमेदवार निवडून आणल्याचा आरोप विरोधक करत आहेत, या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर देत उमेदवारांच्या निवडीबद्दल सांगितलं. तसंच त्यांनी याच मुद्यावरून विरोधकांनाही घेरलं.

जर उमेदवार देणार नसतील तर आम्ही स्वत आणून उभे करायचे ?

या निवडणुकीमध्ये फक्त आमचे उमेदवार निवडून हे म्हणणं चुकीचं आहे. अपक्ष आणि इस्लामिक पार्टीचाही उमेदवार निवडून आलाय ना. अपक्षांची काय ताकद असते ?. पण तोही आला ना ?. किरीट सोमय्यांचे सुपुत्र नील सोमय्यांच्या विरुद्ध काँग्रेसने उमेदवार नाही दिला, उबाठाने नाही दिला. शरद पवारांनी उमेदवार दिला नाही. अपक्ष उमेदवार त्यांच्या पुढे आहे. अनेक ठिकाणी त्यांना उमेदवार नाही सापडले. याचं उदाहरण कल्याण डोंबिवली आहे. कल्याण डोंबिवलीत आमचे मागच्यावेळी १०५ निवडून आले. आमची शक्ती वाढली असं मुख्यमंत्री म्हणाले.

उद्धव ठकरेंची शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडे आली, आता त्यांच्याकडे नेतेच राहिले नाही. आम्ही आघाडी केल्यावर महापालिका वनसाईड झाली. दुसऱ्या पक्षांचं अस्तित्व संपलं. अनेक वॉर्डात यांना उमेदवारच मिळाले नाही. जर उमेदवार देणार नसतील तर आम्ही स्वत आणून उभे करायचे का ? असा रोखठोक सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला.

दीड दोन वर्षात कोणत्या भागात यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलं ? 

याआधी भारताच्या लोकसभेत 35 खासदार बिनविरोध निवडून गेले. त्यातील 32 उमेदवार हे काँग्रेसच्या काळात गेले. पहिल्या तीन निवडणुकीचं सोडून द्या, पण आत्ताचंही उदाहरण आहे. मागच्या निवडणुकीत असे उमेदवार निवडून गेले. जर लोकसभेत बिनविरोध जाऊ शकतात, तर महापालिकेत का जाऊ शकत नाही ? असा थेट सवालही मुख्यमंत्र्यांनी विचारला. हे लोकं मुंबई नाशिकच्या बाहेर कुठे प्रचाराला गेले सांगा. दीड दोन वर्षात कोणत्या भागात जाऊन यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलं ? आपण हरलो तर ब्रँड राहणार नाही. म्हणून घराबाहेर पडलेच नाही अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर, ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?