AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉक्रोच जनता पार्टी प्रकरणात आता आयबीची एन्ट्री? बड्या नेत्याच्या दाव्यानं मोठी खळबळ, नेमकं काय घडतंय?

सध्या देशभरात कॉक्रोच जनता पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे, मात्र या पार्टीचं ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आलं आहे. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना बड्या नेत्यानं मोठा दावा केला आहे.

कॉक्रोच जनता पार्टी प्रकरणात आता आयबीची एन्ट्री? बड्या नेत्याच्या दाव्यानं मोठी खळबळ, नेमकं काय घडतंय?
Cockroach Janata PartyImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 23, 2026 | 5:34 PM
Share

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय तरुणाई झुरळासारखी असल्याचं म्हटलं होतं. सरन्यायाधीश यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मराठी तरुण असलेल्या अभिजीत दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली, या पक्षाला सोशल मीडियावर तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ होत आहे, त्यानंतर या पार्टीचं भारतामधील ट्विटरचं अकाउंट संस्पेंड झालं आहे. दरम्यान यावर बोलताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मोठा दावा केला आहे, पटोले यांच्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यामागे केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा हात आहे, देशातील जनतेच्या उद्रेकाची माहिती आयबीनं केंद्राला दिली, गोपनिय अहवालानंतरच कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट हॅक करण्यात आलं, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले नाना पटोले? 

मला रिपोर्ट आला त्यानुसार आयबीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं की उद्रेक होऊ शकतो. हा उद्रेक थांबवण्यासाठी याला ब्लॉक केलं पाहिजे, अशा पद्धतीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली गेली, त्यानंतर हा निर्णय झाला आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  फक्त सोशल मीडियाचं अकाउंट बंद करून हा प्रश्न सुटणार नाही, तरुणांच्या मनात जो राग आहे, तो राग हे कमी करू शकत नाहीत, यांनी देश विकला आहे, आणि म्हणूनच देश वाचवण्यासाठी या पद्धतीचा आता उद्रेक सुरू झाला आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं  आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा देशात जाणवत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  पेट्रोल-डिझेल, गॅस हा कोणाच्या चुकीच्या विदेश नीतीमुळे माहग झाला? याचं पहिल्यांदा त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. यांच्या धोरणामुळे आपला परंपरागत मित्र असलेला इराण आपल्यापासून दूर झाला, त्यामुळे देशात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असं पटोले यांनी म्हटलं आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा