AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोप निश्चिती 5 ऑगस्टला; सर्व आरोपींना केले जाणार हजर

कोल्हापूरः ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे (Comrade Govind Pansare) यांची हत्या होऊन सात वर्षे गेली तरी अजूनही या गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला नाही. गोविंदराव पानसरे यांचे मारेकरी आजही मोकाटच असल्याचे कोल्हापुरातील (Kolhapur)  पुरोगामी संघटनाकडून बोलले जात आहे. तर आज मात्र कॉम्रेड. गोविंदराव पानसरे यांच्या हत्ये प्रकरणी (Murder Matter) संशयित 9 आरोपींवर आरोपनिश्चितीसाठी नोटीस काढण्यात […]

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोप निश्चिती 5 ऑगस्टला; सर्व आरोपींना केले जाणार हजर
| Updated on: Jul 27, 2022 | 5:09 PM
Share

कोल्हापूरः ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे (Comrade Govind Pansare) यांची हत्या होऊन सात वर्षे गेली तरी अजूनही या गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला नाही. गोविंदराव पानसरे यांचे मारेकरी आजही मोकाटच असल्याचे कोल्हापुरातील (Kolhapur)  पुरोगामी संघटनाकडून बोलले जात आहे. तर आज मात्र कॉम्रेड. गोविंदराव पानसरे यांच्या हत्ये प्रकरणी (Murder Matter) संशयित 9 आरोपींवर आरोपनिश्चितीसाठी नोटीस काढण्यात आली होती. त्या 9 पैकी 3 आरोपींना आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

इतर आरोपींना प्रत्यक्ष हजर केल्यानंतरच सुनावणी

वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि जामिनावर असलेला समीर गायकवाड आज सुनावणीसाठी न्यायालयात हजर होते. मात्र यावेळी न्यायालयाकडून सांगण्यात आले की, इतर आरोपींना प्रत्यक्ष हजर केल्यानंतरच आरोप निश्चितीची सुनावणी घ्या असंही यावेळी सांगण्यात आले.

पुढील सुनावणी 5 ऑगस्टला

या प्रकरणातील इतर आरोपींना ज्यावेळी न्यायालयात हजर केले जाणार आहे त्यावेळी संशयितांवरील आरोप निश्चितीची सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी आरोपींचे वकील समीर पटवर्धन यांनी केली. त्यामुळे वकील समीर पटवर्धन यांच्या मागणीनंतर आता पुढील सुनावणी 5 ऑगस्टला केली जाणार आहे.

वकिलांशी चर्चेला योग्य वेळ मिळावा

गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी वीरेंद्र तावडे यांनी यावेळी न्यायालयाकडे वकिलांशी चर्चेला योग्य वेळ मिळावा अशी मागणी केली आहे.

पुरोगामी संघटनांकडून जाब

पुण्यात नरेंद्र दाभोळकर, धारवाडमध्ये एम. एम. कलबुर्गी तर बेंगळुरूमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर साऱ्या देशाला हादरा बसला होता. विचारवंतांच्या हत्या झाल्याने देशभर मोर्चे, आंदोलने झाली होती, तरीही या प्रकरणातील काही आरोपी अजून मोकाटच असल्याने पुरोगामी संघटनांकडून वारंवार या विचारवंताच्या हत्येबद्दल आंदोलनं आणि मोर्च काढून सरकारला जाब विचारण्यात येतो.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...