AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! काँग्रेसच्या महाअधिवेशनानंतर महाराष्ट्रात संघटनात्मक बदलाची शक्यता, पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती

काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत वादावर लवकरच पडदा पडेल, अशी आशा बाळगली जात आहे. पण त्याआधी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) मोठ्या हालचाली घडण्याची दाट शक्यता आहे.

मोठी बातमी! काँग्रेसच्या महाअधिवेशनानंतर महाराष्ट्रात संघटनात्मक बदलाची शक्यता, पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 10, 2023 | 1:40 AM
Share

नवी दिल्ली : काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत वादावर लवकरच पडदा पडेल, अशी आशा बाळगली जात आहे. पण त्याआधी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) मोठ्या हालचाली घडण्याची दाट शक्यता आहे. कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिलीय. काँग्रेसमध्ये संघटानात्मक बदल होणार आहेत, अशी महत्त्वाची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिलीय. “24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान रायपूरमध्ये काँग्रेसचं महाअधिवेशन होणार आहे. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद मोठा नाही”, अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

पृथ्वीराज चव्हाण यांनी नेमकं काय सांगितलं?

“रायपूरला होणारं अधिवेशन हे 24,25 आणि 26 फेब्रुवारीला होणार आहे. मला वाटतं या अधिवेशनानंतर काही संघटनात्मक बदल होतील”, असं चव्हाण यांनी स्पष्ट सांगितलं.

“काही मतभेद असतील तर ते सोडवण्याची आमच्याकडे प्रक्रिया आहे. वाद फार काही मोठे आहेत, असं मला वाटत नाही. फक्त लोकांनी जाहीर वक्तव्य करणं टाळलं पाहिजे”, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.

काँग्रेसमध्ये अंतर्गत कलहाचं कारण काय?

आमदार सत्यजीत तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी काँग्रेसकडून देण्यात आली होती. पण सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही.

याउलट सत्यजीत तांबे यांनी अर्ज दाखल केला आणि सुधीर तांबे यांनी सत्यजीत यांना पाठिंबा जाहीर केला. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर झाला.

देवेंद्र फडणवीस यांच्या विधानामुळे चर्चांना उधाण

याशिवाय आपण भाजपचा देखील पाठिंबा मागू, असं सत्यजीत तांबे म्हणाले होते. तसेच या निवडणुकीआधी सत्यजीत यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला भाजप नेते देवेंद्र फडणवीस आले होते.

यावेळी त्यांनी सत्यजीत तांबे यांना संधी द्या. नाहीतर आमचं त्यांच्याकडे लक्ष आहे, असं विधान केलं होतं. त्यामुळे वेगवेगळे राजकीय कयास बांधले जात होते.

सत्यजीत तांबे यांचे आरोप

याच सगळ्या चर्चांमुळे अखेर काँग्रेस हायकमांडने देखील तांबे पिता-पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. या निवडणुकीत सत्यजीत तांबे निवडून आले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळा घटनाक्रम सांगितला. आपल्याला चुकीचा एबी फॉर्म पाठवण्यात आला होता, असा आरोप त्यांनी केला.

नाना पटोले यांचं प्रत्युत्तर

सत्यजीत तांबे यांच्या आरोपांना नाना पटोले यांनीदेखील उत्तर दिलं. आपल्याकडे सर्व मसाला आहे. त्यामुळे कुटुंबातील वाद पक्षावर आणू नका आणि वादावर पडदा टाका, असं आवाहन नाना पटोले यांनी केलं होतं.

बाळासाहेब थोरात यांचं हायकमांडला पत्र

दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस हायकमांडला पत्र पाठवत नाना पटोले यांची तक्रार केली. नाना पटोले यांच्यासोबत काम करणं आता कठीण होऊन बसलं असल्याचं ते पत्रात म्हणाले.

‘सामना’ अग्रलेखात नाना पटोलेंवर निशाणा

विशेष म्हणजे नाना पटोले यांच्यावर आज शिवसेनेचं मुखपत्र असेलल्या ‘सामना’च्या अग्रलेखातूनही निशाणा साधण्यात आलाय. पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडी सरकारने पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला असता, असा दावा अग्रलेखात केला.

विजय वडेट्टीवार दिल्लीत

दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आज दिल्लीत गेले आहेत. त्यांनी आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. याशिवाय काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन नाना पटोले यांच्याविषयी तक्रार केली होती.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...