AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange : जीवे मारण्याचा कट, कोणावर संशय? जरांगे पाटलांच्या गौप्यस्फोटानं महाराष्ट्रात खळबळ

मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचला गेल्याची माहिती समोर आली आहे, या प्रकरणात जालना पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे, यावर आता मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Manoj Jarange : जीवे मारण्याचा कट, कोणावर संशय? जरांगे पाटलांच्या गौप्यस्फोटानं महाराष्ट्रात खळबळ
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 06, 2025 | 5:29 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप बीडच्या एका कार्यकर्त्याकडून करण्यात आला आहे, त्याने यासंदर्भात जालना पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली आहे.  बीडमधूनच हा कट रचला गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ही तक्रार जालना पोलिसांना प्राप्त होताच खळबळ उडाली आहे. दरम्यान यावर आता मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?  

हे सत्य आहे, कट शिजला गेला आहे, हत्या घडवून आणण्याचा किंवा घातपात करण्याचा कट आहे, हे आता उघड होईलच. जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी स्वत: या प्रकरणामध्ये लक्ष घातले आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणात दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. हा कट खूप मोठ्या व्यक्तीनं रचला आहे, असा गौप्यस्फोट यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केल आहे, जरांगे पाटील यांच्या या गौप्यस्फोटामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या सर्व बाबी तपासातून स्पष्ट होतीलच. मी उद्या आकरा वाजता यावर पत्रकारांशी सविस्तर बोलणार आहे, सध्या मी ते सर्व पुरावे पहात आहे,  असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्याविरोधात ज्यांनी कट रचण्याचा प्रयत्न केला, त्यांना देखील इशारा दिला आहे.  बाळ तुला सांगतो तू खूप चुकीच्या ठिकाणी हात घातलास, असे आम्ही खूप बघितले आहेत. तू खूप चुकीचं पाऊल उचललं, ज्यांनी कट रचला त्यांना मी इशारा देत आहे. आम्ही मराठे आहोत एवढं लक्षात ठेवं, मी खंबीर आहे, मराठा बांधवांना मी विनंती करतो की तुम्ही शातं राहा, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान जरांगे पाटील यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक