AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना आहे की गेला? साताऱ्यातील या तुफान गर्दीचं कारण काय? वाचा सविस्तर

महाराष्ट्रात सर्वात मोठी समजली जाणारी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधनची बगाड यात्रा आज हजारोच्या संख्येने उपस्थित राहून ग्रामस्थांनी पार पाडली (crowd in Satara bagad yatra).

कोरोना आहे की गेला? साताऱ्यातील या तुफान गर्दीचं कारण काय? वाचा सविस्तर
बावधनची बगाड यात्रा
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Apr 02, 2021 | 2:52 PM
Share

सातारा : राज्यात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं असल्याने अनेक भागांमध्ये कडकडीत निर्बंध घालण्यात आले आहेत. धार्मिक कार्यक्रम, यात्रा, लग्न समारंभ यावर काही प्रमाणात बंदी घालण्यात आली आहे. असं असताना महाराष्ट्रात सर्वात मोठी समजली जाणारी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधनची बगाड यात्रा आज हजारोच्या संख्येने उपस्थित राहून ग्रामस्थांनी पार पाडली (crowd in Satara bagad yatra).

प्रशासनासोबत महिनाभर बैठाका होऊनही यात्रेला गर्दी

विशेष म्हणजे गेल्या महिनाभरापासून ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात बैठका सुरू होत्या. पण या सगळ्या बैठकांमध्ये झालेल्या चर्चांना वाटाण्याच्या अक्षदा मिळाल्या आहेत. पहाटेच्या सुमारास गावकऱ्यांनी एकत्र येऊन बगाड यात्रेला सुरुवात केली. बावधन या गावात कंटेंमेंट झोन असून सुद्धा गावकऱ्यांनी प्रचंड गर्दीत यात्रा पार पाडली (crowd in Satara bagad yatra).

प्रशासनाकडून खबरदारी नाही

या यात्रेला जिल्ह्या बाहेरून सुद्धा नागरिक येत असताना प्रशासनाने कोणतीच खबरदारी घेतली नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे हजारोंच्या संख्येने लोक जमले. गेल्यावर्षी सुद्धा अशाच प्रकारे ही यात्रा पार पडली होती. त्यावेळी देखील कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून ही यात्रा पार पडली होती. त्यानंतर प्रशासनाने गुन्हे दाखल केले होते. पण केवळ गुन्हे दाखल होतात. कारवाई होत नाही या गोष्टीचा गैरफायदा घेत या वर्षीही मोठ्या गर्दीत यात्रा पार पडली.

यात्रेत हजारो भाविक, कोराना प्रतिबंधात्मक नियम पायदडी

बगाड यात्रा पार पडल्यानंतर पोलिसांनी गावात यात्रेकरूंची धरपकड केली. अनेक यात्रेकरुंना अटक केली गेली. पण यात्रा निघण्याआधीच जर प्रशासनाने कडक निर्बंध केले असते तर आजची हजारोंच्या संख्येने गोळा झालेली गर्दी रोखण्यात प्रशासनाला यश मिळालं असतं. प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामूळे आता या यात्रेत हजारो भाविक गोळा झाले आणि कोरोनाचे नियम पायदळी तुडवले गेले.

ग्रामस्थांचा प्रशासनावर आरोप

नेत्यांच्या सभांना झालेली गर्दी चालते मग आमच्या धार्मिक कार्यक्रमांना का नाही? असा सवाल या यात्रेनंतर ग्रामस्थांनी उपस्थित केला. आम्ही फक्त मोजक्या लोकांच्या उपस्थिती ही यात्रा पार पाडत होतो. प्रशासनाच्या हलगर्जीपणामूळे ही गर्दी झाली, असा आरोप ग्रामस्थांनी केला.

पोलिसांची भूमिका काय?

बावधन येथील बगाड यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काढू नये, असे आदेश देण्यात आले होते. वारंवार बैठका घेऊन प्रशासनाने गर्दी होईल अशा कार्यक्रमांना निर्बंध घातले होते. पण आज हे सर्व निर्बंध झुगारून मोठ्या प्रमाणात बगाड यात्रा काढण्यात आली. त्यामुळे याबाबत कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

पालकमंत्र्यांची भूमिका काय?

प्रशासनाने वारंवार सूचना देऊन सुद्धा आज वाई तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रा मोठया प्रमाणात पार पडली आहे. दोन दिवसांपूर्वीच ही यात्रा प्राथमिक स्वरूपात करण्याच्या सूचना दिल्या होत्या. गावकऱ्यांनी सुद्धा यात्रा भरवणार नसल्याचे मान्य केले होते. मात्र गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने आता प्रशासन त्यांच्यावर निश्चित कारवाई करणार असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलंय.

आतापर्यंत 50 ग्रामस्थांना बेड्या

सातारा पोलिसांनी आता बावधन गावात नागरिकांची धरपकड सुरु केली आहे. गावातील 50 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. ही बगाड यात्रा करण्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर प्रशासनाने बंधने घातली होती तर रात्री उशिरा अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक गोळा कसे झाले? महिना भरापासून या अनुषंगाने बैठका घेतल्या जात होत्या तरीही प्रशासनाला या गोष्टी समजल्या का नाहीत? जर यात्रा करण्यावरच निर्बंध होते तर प्रशासनाने त्या दिशेने पाऊले का उचलली नाहीत? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा : Pune Lockdown : पुण्यात मिनी लॉकडाऊन, वाचा संपूर्ण नियमावली

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?